शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

धगधगत नष्ट होतेय भामरागड तालुक्यातील जंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:42 PM

जिल्ह्याच्या दक्षिण-पूर्व भागातील भामरागड तालुक्यात असलेले जंगल म्हणजे मोठी वनसंपत्ती. पण आता अनेक गावालगतचे जंगल झपाट्याने नष्ट होत आहे. कुठे कुºहाडीच्या घावांनी घायाळ झालेली तर कुठे बुंध्यापासून जीवंत पेटवून दिलेली शेकडो झाडे या जंगलातील भयावह परिस्थितीचे दर्शन घडवत आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । ताडगाव वनपरिक्षेत्र; वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारीही जंगलातून गायब

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याच्या दक्षिण-पूर्व भागातील भामरागड तालुक्यात असलेले जंगल म्हणजे मोठी वनसंपत्ती. पण आता अनेक गावालगतचे जंगल झपाट्याने नष्ट होत आहे. कुठे कुºहाडीच्या घावांनी घायाळ झालेली तर कुठे बुंध्यापासून जीवंत पेटवून दिलेली शेकडो झाडे या जंगलातील भयावह परिस्थितीचे दर्शन घडवत आहे. पण अशा परिस्थितीतही संबंधित जंगलाचे रक्षणकर्ते असणारे वन अधिकारी किंवा कर्मचारी झोपेचे सोंग घेऊन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे संतापजनक चित्र पहायला मिळत आहे.भामरागड वनविभागाअंतर्गत येणाºया ताडगाव वनपरिक्षेत्रातील काही भागात फेरफटका मारला असता वनसंपत्तीचा होत असलेला हा ºहास उघड्या डोळ्यांनी पहायला मिळतो. वनविभागाच्या दुर्लक्षामुळे या जंगलातील शेकडो झाडांची कत्तल झाली आहे. झाडाखालील पालापाचोळ्याला लागलेल्या आगीने आतापर्यंत कितीतरी जंगल आपल्या कवेत घेतले आहे. पण या भागात आग नियंत्रित ठेवण्यासाठी ना फायर लाईन दिसून येते, ना फायर ब्लोअर घेऊन आग विझविणारे वनरक्षक दिसून येतात. एकूणच हे जंगल बेवारस झाल्यासारखी स्थिती पहायला मिळत आहे.ताडगाव ते जिंजगाव या ११ किलोमीटरच्या अंतरात अनेक ठिकाणी झाडे बुंध्यापासून कापलेली आणि काही ठिकाणी झाडांना बुंध्यापासून पेटवून दिल्याचे चित्र पहायला मिळाले. या आडमार्गावर त्या मार्गावरील गावकऱ्यांशिवाय कोणीही फिरकत नाही. रस्ता खराब असल्यामुळे अधिकारी किंवा वन कर्मचारीही जात नसावे. त्यामुळेच जंगलाच्या कायद्यांना न जुमानता सर्रास जंगलाची कत्तल केली जात आहे.जंगल नष्ट करून करायची शेती?गावापासून काही अंतरावरील जंगल दिवसागणिक विरळ होत आहे. अनेक झाडांना बुंध्याजवळ कुºहाडीने घाव घालून ठेवले जाते. नंतर त्याच ठिकाणी ते झाड पोटवून दिले जाते. जंगलात पेटलेल्या वणव्यामुळे झाडाला आग लागली असेल असे प्रथमदर्शन भासते. परंतू जवळ जाऊन पाहिल्यास पेटलेल्या अनेक झाडांच्या सभोवताल वणवा पेटल्याचे लक्षणही दिसत नाही. असे असताना झाड पेटते कसे? हा प्रश्न कायम राहतो. गावालगतचे लोक एकतर सरपण म्हणून वापरण्यासाठी झाडे कापून पुरावा नष्ट करण्यासाठी बुंधा पेटवून देत असावेत.दुसरी शक्यता म्हणजे गावातील शेतकºयांना शेतीसाठी जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे हळूहळू जंगल नष्ट करून त्या ठिकाणी शेती करण्यासाठी हे सर्व उपद्व्याप सुरू असण्याची शक्यता दबक्या आवाजात ऐकायला मिळत आहे. काहीही असले तरी हा प्रकार गंभीर असून वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी त्याकडे डोळेझाकपणा करत असल्याने हे त्यापेक्षाही गंभीर मानले जात आहे.अधिकारी निरूत्तरयासंदर्भात ताडगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी एन.के. तामाणे यांना विचारले असता, राऊंड आॅफिसरची जंगलात चक्कर नेहमी असले असे ते म्हणाले. मग जंगल नष्ट करण्याचा हा प्रकार दिसला नाही का, असे विचारले असता त्याबाबत ते कोणतेही उत्तर देऊ शकले नाही. अधिकाºयांची ही चुप्पी बरेच काही सांगून जाते. केवळ काही मर्यादित भागात फेरफटका मारल्यानंतर हे भयावह चित्र दिसले, अजून आतमधील जंगलात काय स्थिती असेल याची कल्पनाच केलेली बरी.

टॅग्स :forestजंगल