आवश्यक कामासाठी जाणाऱ्यांना गावबंदीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 06:00 IST2020-03-29T06:00:00+5:302020-03-29T06:00:31+5:30
कोरोनाचा प्रभाव सद्य:स्थितीत प्रामुख्याने शहरांमध्ये आढळून येत आहे. ही साथ भविष्यात ग्रामीण भागातही पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. संपर्क टाळणे हा कोरोनाचा प्रभाव रोखण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी गावाच्या सीमांवर काठ्या किंवा इतर वस्तू टाकून मार्ग अडविण्यास सुरूवात केली आहे. जो रस्ता केवळ एका गावापुरता मर्यादित आहे.

आवश्यक कामासाठी जाणाऱ्यांना गावबंदीचा फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दुसऱ्या गावातील कोरोनाग्रस्त गावात येऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून काही गावकऱ्यांनी गावाकडे जाणारे रस्ते अडविले आहेत. यातील काही रस्ते मुख्य रस्ते असून ते गावातून जातात. गावकऱ्यांनी रस्ता अडविल्यामुळे आवश्यक कामांसाठी जाणाºयांची अडचण निर्माण होत आहे. प्रशासनाने याची दखल घेण्याची गरज आहे.
कोरोनाचा प्रभाव सद्य:स्थितीत प्रामुख्याने शहरांमध्ये आढळून येत आहे. ही साथ भविष्यात ग्रामीण भागातही पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. संपर्क टाळणे हा कोरोनाचा प्रभाव रोखण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी गावाच्या सीमांवर काठ्या किंवा इतर वस्तू टाकून मार्ग अडविण्यास सुरूवात केली आहे. जो रस्ता केवळ एका गावापुरता मर्यादित आहे. अशा गावाचा रस्ता अडविला तर फारसा फरक पडणार नाही. गावकºयांची परवानगी घेतल्यानंतर सदर व्यक्ती गावात जाऊ शकते. मात्र काही गावांच्या अगदी मधून मुख्य रस्ते गेले आहेत. सदर रस्ते पुढे अनेक गावांना जोडतात. त्यामुळे या रस्त्यांनी अनेक गावची शेकडो नागरिक ये-जा करतात. संचारबंदी लागू केली असली तरी आवश्यक कामासाठी बाहेर पडण्याची मुभा नागरिकांना दिली आहे. तसेच सिलिंडर भरणे, भाजीपाला, किराणा, पेट्रोल खरेदी, दवाखाना आदी कामांसाठी बाहेर पडता येते. मात्र गावकऱ्यांनी मुख्य रस्ता अडविल्याने इतर गावातील नागरिकांसाठी अडचणीचे ठरत आहे. या प्रकाराकडे प्रशासनाने लक्ष घालून मुख्य मार्ग अडविले जाणार नाही, याची खबरदारी घेण्याची गरज आहे.
जिल्हा सीमांवर कडक नाकेबंदी
एका जिल्ह्यातील व्यक्ती दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ नये, यासाठी जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. जिल्हा सीमांवर दोन्ही जिल्ह्यांच्या बाजुने पोलीस चौक्या उभारण्यात आल्या आहेत. तहसीलदार यांची परवानगी असल्याशिवाय एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ दिले जात नाही. रूग्ण गंभीर असल्याशिवाय तहसीलदार परवानगी देत नाही. त्यामुळे जिल्हा बंदीची कडक अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत आहे.