शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

यांना आवरा हो...

By admin | Updated: August 24, 2014 23:30 IST

सण व उत्सवाच्या काळात उत्साहाला उधाण येऊन जाते. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून उत्सव साजरे करण्याची परंपरा विसरण्याचा प्रकार गेल्या काही वर्षात रूढ होऊ लागला आहे.

डेसीबल मर्यादेची ऐशीतैशी : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही पोलीस प्रशासन सुस्तगडचिरोली : सण व उत्सवाच्या काळात उत्साहाला उधाण येऊन जाते. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून उत्सव साजरे करण्याची परंपरा विसरण्याचा प्रकार गेल्या काही वर्षात रूढ होऊ लागला आहे. उत्सवाच्या नावाखाली नंगानाच समाजात सुरू झाला आहे. सार्वजनिक उत्सवाचे आयोजन करून लाखो रूपयाच्या वर्गणी गोळा करण्याचे काम करणारे सार्वजनिक मंडळ हे या बाबीसाठी जबाबदार आहेत. सामाजिक बांधिलकीचे भान नसणारे लोक असे प्रकार करीत असतात. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला उत्सवाच्या काळात वाजविले जाणारे वाद्य किती मर्यादेपर्यंत वाजविले जावे, याचे दिशानिर्देश देण्याची वेळ आली आहे. याला गडचिरोली शहरही अपवाद राहिलेले नाही. गडचिरोली शहरात विविध भागात मोठ्या प्रमाणावर गोपाल कृष्णापासून ते गणपती, दुर्गा, शारदा आदी सर्व उत्सव साजरे केले जातात. उत्सव साजरा करण्याला कुणाचीही मनाई नाही. परंतु हे सर्व साजरे करतांना सामाजिक भान लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक उत्सवाचा कालावधी निश्चित आहे. परंतु १० दिवसाचा गणपती १५ व २० दिवसही विसर्जीत केला जात नाही. गणपतीच्या मंडपातच गणराजाच्या साक्षीने सार्वजनिक वर्गणीतून सकाळ आणि संध्याकाळी शेकडो गणेशभक्त जुगार खेळतात. गणपती विसर्जनासाठी किमान एक ते दीड लाखाचा डीजे आणला जातो व दिवसभर व रात्री १० नंतरही तो बदडला जातो. त्या तालावर मद्याच्या धुंदीत बेभान होऊन भारताचा आधार म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, ती तरूणाई नाचते. त्यावेळी रस्त्यावरून वाहतूक आपल्यामुळे अडली आहे, याचे भानही त्यांना राहत नाही. रस्त्यावरून आई, बहिणी दुचाकीने जातात. त्यांना रस्ता मोकळा करून दिला पाहिजे, याचाही विसर या मंडळींना पडतो. ज्या मिरवणुकांसाठी पोलिसांची परवानगी घेतली जाते. म्हणून मिरवणुकासोबत एक ते दोन पोलीस व तेवढेच गृहरक्षक दलाचे जवान असतात. त्यांच्या साक्षीने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या डेसीबल मर्यादेपेक्षाही अधिक आवाजात वाद्य वाजविले जातात. प्रत्येक चौकात किमान अर्धा तास हा गोंगाट सुरू असतो. यांना कुणीतरी आवरण्याची गरज आहे. उत्सवातील सामाजिक भान आम्ही के व्हाच विरून गेलो आहो. आता उत्सव केवळ मौजमजेसाठी साजरे केले जात आहे.परप्रांतातून डीजे आणून तो बदडला जात आहे. पोलीस प्रशासनही या बाबीला तेवढेच जबाबदार आहे. येत्या चार दिवसानंतर गणरायाचे आगमन होणार आहे. येथून किमान दिवाळीपर्यंत हे उत्सव साजरे केले जाणार आहे. त्यामुळे आवाजाच्या मर्यादेबाबत सर्वांनाच कडक सूचना देण्याची गरज आहे. मुळातच डीजे वाजविण्याला परवानगीच देऊ नये, महाराष्ट्रातील अनेक शहरांनी यंदा डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा वसा उचलला आहे. गडचिरोलीकरांनीही असा नवा पायंडा पाडून आपल्या मंडळाच्या पैशाची बचतही करावी. याऐवजी साध्या बॅडच्याही गजरात गणरायाचे आगमन व विसर्जन करता येऊ शकते, याचे भान ठेवावे. पोलीस प्रशासन केवळ मंडळांना परवानगी देऊन मोकळे होऊन जाते. ते किती आवाजात वाद्य वाजवित आहेत, हे पाहण्याची फुरसदही पोलीस प्रशासनाला नाही. जोपर्यंत पोलीस याबाबतीत पुढाकार घेणार नाही, तोपर्यंत कुणालाही कायदा समजत नाही. डीजे भाड्याने देणाऱ्यांवर व वाद्य जोराने वाजविणाऱ्यांवर कारवाई झाल्यास सर्व सुधारणा होते, असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे आता हा प्रकार आवरण्यासाठी कडक अंमलबजावणीची आवश्यकता आहे. अन्यथा सर्वसामान्य माणसाचा उद्रेक या ध्वनीप्रदुषणाच्या विरोधात झाल्याशिवाय राहणार नाही, याची जाणीव सर्वांनिच ठेवायला हवी. उत्सवातील बिभत्सरपणा वाढीस लागत आहे, असे खेदाने म्हणावे लागते. (जिल्हा प्रतिनिधी)