शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

रेतीघाटांचा लिलाव वांद्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 05:00 IST

दरवर्षी रेतीघाटांच्या लिलावातून जिल्हा प्रशासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. पण गेल्या दोन वर्षात रेंगाळत जाणाऱ्या लिलाव प्रक्रियेमुळे अपेक्षित महसूल मिळालेला नाही. यावर्षी तर ही प्रक्रियाच पूर्ण होते किंवा नाही याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची रेती असणारे घाट आहेत. परंतु लिलावासाठी पात्र ठरविण्यात आलेल्या ५५ रेती घाटांमध्ये मोजक्याच रेती उपशाला परवानगी देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे५५ घाट पात्र । कोट्यवधीच्या महसुलावर सोडावे लागणार पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पावसाचे दिवस सुरू होण्यास जेमतेम महिनाही शिल्लक नसताना यावर्षी रेतीघाटांच्या लिलावाची प्रक्रिया होऊ शकली नाही. भूजल सर्व्हेक्षण विभागाने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार यावर्षी रेती उपशासाठी ५५ घाट पात्र आहेत. पर्यावरण विभागानेही हिरवी झेंडी दाखविली आहे. पण पावसाळ्याच्या तोंडावर यापैकी किती घाटांचे लिलाव होणार यावर प्रश्नचिन्ह लागले आहे.गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील रेतीघाटांच्या प्रक्रियेत अडथळे येत आहे. न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने दोन वर्षांपूर्वी सर्वच जिल्ह्यांमधील रेतीघाटांची लिलाव प्रक्रिया रखडली होती. त्यानंतर भूजल सर्व्हेक्षण विभागासोबतच रेतीघाटांच्या लिलावासाठी पर्यावरण विभागाचीही परवानही आवश्यक करण्यात आली. या प्रक्रियेत रेतीघाटांचा लिलाव लांबत गेला. यावर्षी त्यात जनसुनावणी प्रक्रियेची भर नव्याने पडली आहे.दरवर्षी रेतीघाटांच्या लिलावातून जिल्हा प्रशासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. पण गेल्या दोन वर्षात रेंगाळत जाणाऱ्या लिलाव प्रक्रियेमुळे अपेक्षित महसूल मिळालेला नाही. यावर्षी तर ही प्रक्रियाच पूर्ण होते किंवा नाही याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे.विशेष म्हणजे, जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची रेती असणारे घाट आहेत. परंतु लिलावासाठी पात्र ठरविण्यात आलेल्या ५५ रेती घाटांमध्ये मोजक्याच रेती उपशाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे कोट्यवधीच्या रेती घाटांची किंमत अवघ्या काही लाखांवर येऊन पोहोचली आहे. एकाही रेती घाटाची किंमत पाच लाखापेक्षा जास्त नाही.पावसाळा सुरू झाल्यानंतर घाटातून रेतीचा उपसा करणे शक्य होत नाही. त्यामुळे उपलब्ध दिवसात जेवढी रेती काढणे शक्य आहे, त्या आधारावर घाटांचा लिलाव होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात गोदावरी, प्राणहिता, पोटफोडी, कठाणी, पोहार, खोब्रागडी, गाढवी, सती, मेडाराम नाला, बांडीया, टिपागडी, बिना आणि कारवाफा आदी नदी व नाल्यांच्या घाटांचा लिलावासाठी पात्र ठरलेल्या ५५ घाटांमध्ये समावेश आहे.४ जूनला ऑनलाईन जनसुनावणीलिलावासाठी पात्र ठरविलेले रेतीघाट ज्या गावांच्या हद्दीत येतात त्या गावातील लोकांची जनसुनावणीही घेतली जाणार आहे. यावर्षी कोरोनामुळे ही जनसुनावणी येत्या ४ जून रोजी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. अर्थात, संबंधित गावातील लोकांना जिल्हा प्रशासनाच्या वेबसाईटवर त्यासाठी ऑनलाईन आक्षेप नोंदवून आपले म्हणणे मांडता येईल. जिल्ह्यातील इंटरनेट सुविधेसह ग्रामीण भागातील स्थिती पाहता हा प्रयोग केवळ औपचारिकताच ठरण्याची शक्यता आहे.

टॅग्स :sandवाळू