शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
3
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
4
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
5
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
6
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
7
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
8
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
10
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
11
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
12
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
13
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
14
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
15
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
16
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
17
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
18
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
19
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
20
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?

देसाईगंजमधील शासकीय जागा हडपण्याचा प्रयत्न?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 10:10 PM

देसाईगंजच्या गुलमोहर कॉलनीतील गांधी वॉर्डमध्ये असलेल्या शासनाच्या खुल्या जागेवर काही बेघर गरीब कुटुंबांनी बांधलेल्या झोपड्या नगर परिषदेच्या वाहनांची मदत घेत पोलिसांनी रात्री ११ वाजता उठविल्या. यावेळी त्या कुटुंबांना शिवीगाळ आणि मारहाणही झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

ठळक मुद्देझोपडीधारकांना मारहाण : रात्री ११ वाजता केले बेघर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देसाईगंजच्या गुलमोहर कॉलनीतील गांधी वॉर्डमध्ये असलेल्या शासनाच्या खुल्या जागेवर काही बेघर गरीब कुटुंबांनी बांधलेल्या झोपड्या नगर परिषदेच्या वाहनांची मदत घेत पोलिसांनी रात्री ११ वाजता उठविल्या. यावेळी त्या कुटुंबांना शिवीगाळ आणि मारहाणही झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दुसऱ्या कोणाला ती शासकीय जागा हडपण्यास मदत करण्यासाठी आम्हाला तेथून हटविण्यात आले असून आम्हाला हक्काचा निवारा देऊन न्याय द्यावा, अशी मागणी बेघर कुटुंबियांनी उपविभागीय अधिकाºयांमार्फत जिल्हाधिकाºयांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.सदर निवेदनात नमुद केल्यानुसार, देसाईगंजच्या गुलमोहर कॉलनी परिसरात महसूल व वनविभागाची काही जागा अनेक वर्षांपासून रिकामी पडून आहे. ती जागा हडपण्याच्या उद्देशाने कोणीतरी त्या जागेत बांधकाम साहित्य आणले होते. दरम्यान आतापर्यंत कुठेतरी आडोशाने राहणाºया गोरगरीब २५ कुटुंबांनी या शासकीय जागेत (सर्व्हे नं.४३२) काही दिवसांपूर्वी आश्रय घेतला. मात्र दि.२२ आॅक्टोबरच्या रात्री ११ च्या सुमारास अचानक पोलिसांचा ताफा आला आणि त्यांनी काहीही सूचना न करता त्यांच्या काठ्यांनी मारणे सुरू केले. आमचा गुन्हा काय, अशी विचारणा केली असता ते काहीही ऐकायला तयार नव्हते. विशेष म्हणजे पोलिसांच्या ताफ्यासोबत नगर परिषदेचा कर्मचारी व ट्रॅक्टरसुद्धा झोपडीवाल्यांचे साहित्य नेण्यासाठी होता. त्यामुळे त्या जागेसंदर्भात नगर परिषदेचा संबंध काय? ती जागा नगर परिषदेच्या मालकीची नाही किंवा शासनाने कोणत्या कारणासाठी ती जागा कोणाला दिलेली नाही. मग असे असताना आम्हाला हटविण्यात नगर परिषदेने पुढाकार घेण्याची गरज काय? असा सवाल तक्रारकर्त्यांनी केला आहे.झोपडीधारकांवरील कारवाई नियमबाह्यवास्तविक कोणत्याही शासकीय जागेतील अतिक्रमण हटविताना संबंधितांना आधी नोटीस द्यावी लागते. त्यानंतरही ते स्वत:हून हटले नाही जबरीने अतिक्रमण काढता येते. पण सायंकाळी ६ वाजताच्या नंतर राहत्या घराचे अतिक्रमण हटविता येत नाही. असे असताना या प्रकरणात रात्री ११ वाजता कारवाई करून गोरगरीब कुटुंबांना बेघर कसे केले? असा प्रश्न तक्रारकर्त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी विमल बोरडे, पुष्पा रामटेके, राणी बन्सोड, शालू मेश्राम, विणा मेश्राम, तारा मडावी, विमल कनोजिया, कल्पना भोयर, सुशिला गजभिये, अन्वरी अंसारी, कनिजा शेख आदी अनेक महिला व पुरूषांनी केली आहे.