अपघाताचे प्रमाण कमी व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 05:00 IST2020-01-02T05:00:00+5:302020-01-02T05:00:25+5:30

जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक २९ डिसेंबर रोजी शनिवारला जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्यासह पोलीस, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, नगर परिषद, आरोग्य विभाग, राज्य परिवहन महामंडळ आदी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Accident should be reduced | अपघाताचे प्रमाण कमी व्हावे

अपघाताचे प्रमाण कमी व्हावे

ठळक मुद्देउपजिल्हाधिकारी : जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत नियोजन व उपाययोजनांवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : २०१९ या वर्षात गडचिरोली जिल्ह्यात १४० अपघातांची नोंद झाली. नव्या वर्षात रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक, पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्तरित्या नियोजन करून उपाययोजना कराव्या, जेणेकरून अपघाताची आकडेवारी कमी होईल, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांनी केले.
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक २९ डिसेंबर रोजी शनिवारला जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्यासह पोलीस, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, नगर परिषद, आरोग्य विभाग, राज्य परिवहन महामंडळ आदी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा रस्ता सुरक्षा समिती गठीत केली आहे. या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांनी रस्ते दुरूस्तीबाबत राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तातडीने विविध माहिती, अपघात सूचना व उपाययोजनांसंदर्भात माहिती मिळण्यासाठी जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्याच्या सूचना दिल्या. वाहनचालकांची मानसिकता बदलण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. ११ ते १८ जानेवारी २०२० या कालावधीत ३१ वा रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जाणार आहे. त्याअनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग, निमसरकारी संस्था व सेवाभावी संस्थांमार्फत जनप्रबोधनाचे व्यापक कार्यक्रम जिल्हाभर राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

वर्षभरात १४० जणांचा मृत्यू, १६५ जण जखमी
सन २०१९ या सरत्या वर्षात गडचिरोली जिल्ह्यात एकूण १४० अपघाताची नोंद प्रशासनाच्या दरबारी आहे. या अपघातांमध्ये १४० नागरिक मृत्यूमुखी पडले असून १६५ जण जखमी झाले. मोटारवाहन कायद्याचे उल्लंघन करणाºया चालकांमुळेच हे अपघात घडले आहेत.
रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाºया चालकांविरूद्ध पोलीस व परिवहन विभागाने मोहीम राबवावी. असंरक्षित वाहनावर कठोर कारवाई करावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांनी दिले.

Web Title: Accident should be reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात