शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

शेतकरी अपघात विमा योजनेला त्रुटींचे ग्रहण, १३२ पैकी ८७ प्रस्ताव प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 5:09 AM

प्रत्येक सातबाराधारक शेतकऱ्याचा विमा राज्य सरकार परस्पर कंपनीकडे भरते. शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास संबंधित गावातील कृषी सहायक कागदपत्रांची पूर्तता करून ...

प्रत्येक सातबाराधारक शेतकऱ्याचा विमा राज्य सरकार परस्पर कंपनीकडे भरते. शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास संबंधित गावातील कृषी सहायक कागदपत्रांची पूर्तता करून तालुका कृषी अधिकाऱ्यामार्फत जिल्हास्तरावर प्रस्ताव पाठवितात. त्या प्रस्तावांत संबंधित विमा कंपनीकडून विविध त्रुटी काढून त्याची पूर्तता करण्यास सांगितले जाते. जुने फेरफार, तलाठ्याकडील कागदपत्रे, पोलीस ठाण्यातील रिपोर्ट, शवपरीक्षण अहवाल अशा अनेक बाबींसह वारसाधारकांकडील कागदपत्रेही सादर करावी लागतात. यातील कोणताही कागद नसेल तर प्रस्ताव थांबविला जातो.

(बॉक्स)

कोणाला किती मिळते मदत?

शेतकऱ्याचा विविध कारणाने आकस्मिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना आधार म्हणून विमा कंपनीमार्फत २ लाखांची आर्थिक मदत दिली जाते. याशिवाय कायम अपंगत्व (४० टक्के) आल्यास १ लाखाची मदत मिळते. सातबाराधारक प्रत्येक शेतकरी यासाठी पात्र असतो. त्यासाठी उत्पन्नाची मर्यादा किंवा इतर कोणत्याही अटी नाहीत. १० ते ७५ वर्ष वयोगटातील कोणत्याही शेतकऱ्याच्या आकस्मिक मृत्यूसाठी त्यांच्या कुटुंबियांना योजनेचा लाभ दिला जातो.

(कोट)

... म्हणून प्रस्ताव प्रलंबित आहेत

या योजनेच्या लाभासाठी संबंधित शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर तीन महिन्याच्या आत विमा दाव्याचा प्रस्ताव सादर करणे गरजेचे असते. त्यामुळे जेवढे कागदपत्र उपलब्ध होतील त्यावरून प्रस्ताव सादर केला जातो. त्रुटींची पूर्तता मागाहून केली जाते. आता नागपूर येथे विभागीय सहसंचालकांकडे दर आठवड्याला याबाबतचा आढावा घेतला जात आहे. त्यामुळे प्रस्ताव लवकर मंजूर होण्याची शक्यता आहे.

- जी.बी.बादाडे

तंत्र अधिकारी, कृषी विभाग, गडचिरोली

रस्त्यावरील अपघातात सर्वाधिक मृत्यू

- जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आकस्मिक मृत्यूमागे अनेक कारणे असली तरी त्यात सर्वाधिक मृत्यू हे रस्त्यावरील अपघातात झालेले आहेत. त्यामुळे दुचाकीवरून जाताना हेल्मेटचा वापर करणे गरजेचे आहे.

- तसेच सर्पदंश आणि पाण्यात बुडून मरण पावणाऱ्यांचीही संख्या बरीच आहे. पावसाळ्याच्या दिवसात शेतातून येताना नदी-नाले ओलांडण्याच्या प्रयत्नात वाहून जाऊन दरवर्षी अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू होतो.