शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
5
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
6
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
7
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
8
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
9
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
10
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
11
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
12
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
13
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
14
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
15
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
16
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
17
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
18
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
19
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
20
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा

पावसाअभावी पºहे करपले, जमिनीला भेगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 10:17 PM

गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाचा पत्ता नसल्याने यंदाचा खरीप हंगाम धोक्यात आला आहे. शेतकऱ्यांनी टाकलेले धान पऱ्हे करपले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी मोटारपंपच्या सहाय्याने पाणी पुरवठा करून रोवणी आटोपली, अशा रोवणी झालेल्या शेतजमिनीला पाण्याअभावी भेगा पडल्या आहेत.

ठळक मुद्देजिल्हा दुष्काळाच्या छायेत : शेतकरी चिंताग्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाचा पत्ता नसल्याने यंदाचा खरीप हंगाम धोक्यात आला आहे. शेतकऱ्यांनी टाकलेले धान पऱ्हे करपले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी मोटारपंपच्या सहाय्याने पाणी पुरवठा करून रोवणी आटोपली, अशा रोवणी झालेल्या शेतजमिनीला पाण्याअभावी भेगा पडल्या आहेत. पाऊस पडत नसल्याने जिल्हा दुष्काळाच्या छायेत सापडला असून जिल्हाभरातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.मृग, रोहिणी व आर्द्रा या तीन नक्षत्रात अपेक्षित पाऊस जिल्ह्यात झाला नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी निम्मा पाऊस पडला. अपेक्षेच्या तुलनेत पावसाची सरासरी फारच कमी आहे. त्यामुळे तलाव, बोड्या तसेच नदी, नाल्यांमध्ये फारसा पाणीसाठा उपलब्ध नाही. मानापूर, देलनवाडी, वैरागड भागासह देसाईगंज, कुरखेडा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात अशाच प्रकारची दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.ज्या शेतकऱ्यांचे धान पऱ्हे रोवणीयोग्य झाले, असे शेतकरी मोटारपंपच्या सहाय्याने शेतजमिनीला पाणी पुरवठा करून रोवणीचे काम हाती घेतले आहे. तसेच काही शेतकरी धान पºह्यांना वाचविण्याची सातत्याने धडपड करीत आहेत. काही शेतकºयांनी शेत जमिनीत पाणी पाहून रोवणी करण्यासाठी पऱ्हे खोदून पेंड्या बांधले. मात्र दुसऱ्यांच दिवशी शेतजमिनीतील पाणी आटल्याने खोदलेल्या पेंड्या तशाच कायम आहेत. एकूणच पावसाअभावी जिल्ह्यातील धान पऱ्हे करपले असून रोवणीचे काम खोळंबले आहे.गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. जवळपास पावणेदोन लाख हेक्टरवर दरवर्षी धान पिकाची लागवड रोवणी व आवत्या स्वरूपात होत असते.यावर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीला मुसळधार पाऊस बरसला नाही. मृग व रोहिणी हे दोन नक्षत्र कोरडे गेले. आर्द्रा नक्षत्रात सुरूवातीला चार दिवस दमदार पाऊस बरसला. या पावसानंतर काही शेतकºयांनी लगबगीने धानाचे पऱ्हे टाकले. तर काहिंनी रोवणीचे काम सुरू केले. मात्र गेल्या १५ ते २० दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत नसल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत.मानापूर भागात गंभीर स्थितीपावसाळ्याचे दिवस असून सूर्य आग ओकत आहे. दिवसेंदिवस उकाडा वाढत असून पावसाचा पत्ता नाही. वरूण राजाची वक्रदृष्टी दिसून येत असल्याने मानापूर, देलनवाडी, तुलतुली भागातील धानपीक हंगाम धोक्यात आला आहे. शेतजमिनीतील पऱ्हे पावसाअभावी करपले असून धानाची रोवणी केलेल्या जमिनीला भेगा पडत आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून बि-बियाण्यांची व्यवस्था केली. नांगरणी करून रोवणीची तयारी केली. मात्र पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. या भागात पीक परिस्थिती गंभीर आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती