शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

"आई, कसं करायचं गं..पीक वाया गेलं"; आईनं धीर दिला पण मुलानं टोकाचा निर्णय घेतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 12:01 IST

पीक जोमात असतानाच किडीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे संपूर्ण पीक वाया गेले. त्यामुळे तो निराश होता.

सिरोंचा : तालुक्यातील टेकडा ताल्ला येथील एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना ६ ऑक्टोबरला घडली. नापिकीमुळे त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे दरम्यान, त्याच्या लग्नासाठी मुलीचा शोध सुरू असतानाच त्याने मरण जवळ केल्याने कुटुंब शोकमग्न झाले आहे.

नागेश मल्लय्या दुर्गम (वय २१, रा. टेकडा ताल्ला), असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. नागेश हा शेती व्यवसाय करतो. यंदा त्याने शेतात मिरचीची लागवड केली होती; परंतु अतिवृष्टीमुळे दोन एकरांवरील पीक नष्ट झाले. त्यानंतर न खचता त्याने पुन्हा व्याजाने पैसे घेऊन मिरचीची रोपे आणून लागवड केली. पीक जोमात असतानाच किडीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे संपूर्ण पीक वाया गेले. त्यामुळे तो निराश होता. फवारणी करूनही पिकामध्ये सुधारणा न दिसल्याने हतबल झालेल्या नागेशने दुपारी ४ वाजता घरी गळफास घेऊन आत्महत्या केली

त्याच्या वडिलांचे वर्षभरापूर्वी निधन झाले होते. त्याला दोन भाऊ असून, ते स्वतंत्र राहतात, तर तीन बहिणींचा विवाह होऊन त्या सासरी नांदत आहेत.. नागेश आईसह राहत होता. नागेशचे दिवाळीनंतर लग्न करायचे होते, त्यासाठी वधूशोधमोहीम सुरू होती. अशातच त्याने आत्महत्या केल्याने कुटुंबाला धक्का बसला आहे.

धीर दिला; पण......

मिरचीचे पीक दोनदा वाया गेल्यावर आई, कसे करायचे, काय करायचे, असे प्रश्न तो विचारत असे. त्यावर मी त्यास खचून जाऊ नको, आपण दुसरे पीक घेऊ, असे म्हणत धीर देण्याचा प्रयत्न केला होता, अशा शब्दांत त्याची आई पोसक्का मलय्या दुर्गम यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. 'फवारणीसाठी शेतातील विहिरीत पाणी आहे का पाहण्यासाठी मला पाठवले व घरी त्याने असे केले', असे म्हणत त्यांनी हंबरडा फोडला

टॅग्स :Farmerशेतकरी