शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

"आई, कसं करायचं गं..पीक वाया गेलं"; आईनं धीर दिला पण मुलानं टोकाचा निर्णय घेतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 12:01 IST

पीक जोमात असतानाच किडीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे संपूर्ण पीक वाया गेले. त्यामुळे तो निराश होता.

सिरोंचा : तालुक्यातील टेकडा ताल्ला येथील एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना ६ ऑक्टोबरला घडली. नापिकीमुळे त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे दरम्यान, त्याच्या लग्नासाठी मुलीचा शोध सुरू असतानाच त्याने मरण जवळ केल्याने कुटुंब शोकमग्न झाले आहे.

नागेश मल्लय्या दुर्गम (वय २१, रा. टेकडा ताल्ला), असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. नागेश हा शेती व्यवसाय करतो. यंदा त्याने शेतात मिरचीची लागवड केली होती; परंतु अतिवृष्टीमुळे दोन एकरांवरील पीक नष्ट झाले. त्यानंतर न खचता त्याने पुन्हा व्याजाने पैसे घेऊन मिरचीची रोपे आणून लागवड केली. पीक जोमात असतानाच किडीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे संपूर्ण पीक वाया गेले. त्यामुळे तो निराश होता. फवारणी करूनही पिकामध्ये सुधारणा न दिसल्याने हतबल झालेल्या नागेशने दुपारी ४ वाजता घरी गळफास घेऊन आत्महत्या केली

त्याच्या वडिलांचे वर्षभरापूर्वी निधन झाले होते. त्याला दोन भाऊ असून, ते स्वतंत्र राहतात, तर तीन बहिणींचा विवाह होऊन त्या सासरी नांदत आहेत.. नागेश आईसह राहत होता. नागेशचे दिवाळीनंतर लग्न करायचे होते, त्यासाठी वधूशोधमोहीम सुरू होती. अशातच त्याने आत्महत्या केल्याने कुटुंबाला धक्का बसला आहे.

धीर दिला; पण......

मिरचीचे पीक दोनदा वाया गेल्यावर आई, कसे करायचे, काय करायचे, असे प्रश्न तो विचारत असे. त्यावर मी त्यास खचून जाऊ नको, आपण दुसरे पीक घेऊ, असे म्हणत धीर देण्याचा प्रयत्न केला होता, अशा शब्दांत त्याची आई पोसक्का मलय्या दुर्गम यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. 'फवारणीसाठी शेतातील विहिरीत पाणी आहे का पाहण्यासाठी मला पाठवले व घरी त्याने असे केले', असे म्हणत त्यांनी हंबरडा फोडला

टॅग्स :Farmerशेतकरी