शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

908 अग्निरक्षक राेखणार वणवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 05:00 IST

आगींवर नियंत्रण राहावे, यासाठी वन विभागाने नियाेजन केले आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पाचही वन विभागात एकूण ९०८ अग्निरक्षकांची नेमणूक केली आहे. त्यांना प्रति दिवस जवळपास ४०० रुपये मजुरी दिली जाते. १५ फेब्रुवारी ते १५ जूनपर्यंत जवळपास चार महिने कायमस्वरूपी राेजगार उपलब्ध हाेतो. अग्निरक्षक हा वनरक्षकाला आग नियंत्रणात आणण्यासाठी मदत करणार आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जंगलात लागणाऱ्या आगींमुळे जैवविविधतेचे माेठे नुकसान हाेते. त्यामुळे आगींवर नियंत्रण ठेवण्यासाठी वन विभागामार्फत विविध प्रयत्न केले जातात. यावर्षी वणव्यांवर आळा घालण्यासाठी सुमारे ९०८ अग्निरक्षकांची नेमणूक केली आहे. साधारणत: फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून आगी लागण्यास सुरुवात हाेते. मात्र, महिनाभरापूर्वी झालेल्या दमदार पावसामुळे आगी लागण्यास उशिर हाेत आहे. मात्र, माेह व तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम सुरू झाल्यानंतर जंगलाला आगी लागण्यास सुरुवात हाेणार आहे. आगींवर नियंत्रण राहावे, यासाठी वन विभागाने नियाेजन केले आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पाचही वन विभागात एकूण ९०८ अग्निरक्षकांची नेमणूक केली आहे. त्यांना प्रति दिवस जवळपास ४०० रुपये मजुरी दिली जाते. १५ फेब्रुवारी ते १५ जूनपर्यंत जवळपास चार महिने कायमस्वरूपी राेजगार उपलब्ध हाेतो. अग्निरक्षक हा वनरक्षकाला आग नियंत्रणात आणण्यासाठी मदत करणार आहे. 

मागील वर्षी ६,८३४ हेक्टर आगीच्या विळख्यातमागील वर्षी जंगलात आग लागण्याच्या २ हजार ४४१ घटनांची नाेंद झाली. या घटनांमध्ये ६ हजार ८३४ हेक्टर क्षेत्रावर आग पसरली. आगीमुळे जंगल व जैवविविधतेचे माेठे नुकसान झाले. 

१३ हजार किमी फायरलाईन जाळणार

वणव्याचा विस्तार थांबविण्यात फायरलाईनचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे वनविभाग जास्तीत जास्त फायरलाईन जाळण्याचा प्रयत्न करते. यावर्षी वनविभागाने केलेल्या   नियाेजनानुसार १२ हजार ७२५ किलोमीटर एवढी फायरलाईन जाळली जाणार आहे. 

जंगलातून जाणारे रस्ते, पायवाटांवरचे गवत वन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत जाळले जाते. या ठिकाणचे गवत अगाेदरच जळले असल्याने उन्हाळ्यात आग लागली तरी ती आग  पुढे पसरत नाही. काही जागा समांतर रेषेत जाळली जाते. त्याला फायरलाईन (जाळरेषा) असे म्हटले जाते.

ग्रामसभांना ताकीद-   तेंदूपत्त्यासाठी कंत्राटदाराने आग लावण्यास ग्रामसभांनी प्रतिबंध घालावा, अन्यथा संबंधित ग्रामसभा तसेच कंत्राटदार यांच्या विरूध्द कारवाई केली जाणार आहे. तसेच आग लागू नये, यासाठी संबंधित ग्रामसभेने अग्निरक्षक नेमावे, असे निर्देश ग्रामसभेला देण्यात आले आहेत.

काय आहे फायर अलर्ट?

वणव्याचा विस्तार थांबविण्यात फायर अलर्ट अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. आकाशात असलेले सॅटेलाईट आगीच्या घटनेची नाेंद घेते व तसा संदेश वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठविते. हा संदेश लगेच वनरक्षकाला प्राप्त होतो. वनरक्षक व त्याची यंत्रणा त्या ठिकाणी पाेहाेचून आग आटोक्यात आणणतात. त्यामुळे आगीचा विस्तार थांबण्यास माेठी मदत हाेते. 

 

टॅग्स :fireआगforestजंगल