शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

908 अग्निरक्षक राेखणार वणवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 05:00 IST

आगींवर नियंत्रण राहावे, यासाठी वन विभागाने नियाेजन केले आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पाचही वन विभागात एकूण ९०८ अग्निरक्षकांची नेमणूक केली आहे. त्यांना प्रति दिवस जवळपास ४०० रुपये मजुरी दिली जाते. १५ फेब्रुवारी ते १५ जूनपर्यंत जवळपास चार महिने कायमस्वरूपी राेजगार उपलब्ध हाेतो. अग्निरक्षक हा वनरक्षकाला आग नियंत्रणात आणण्यासाठी मदत करणार आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जंगलात लागणाऱ्या आगींमुळे जैवविविधतेचे माेठे नुकसान हाेते. त्यामुळे आगींवर नियंत्रण ठेवण्यासाठी वन विभागामार्फत विविध प्रयत्न केले जातात. यावर्षी वणव्यांवर आळा घालण्यासाठी सुमारे ९०८ अग्निरक्षकांची नेमणूक केली आहे. साधारणत: फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून आगी लागण्यास सुरुवात हाेते. मात्र, महिनाभरापूर्वी झालेल्या दमदार पावसामुळे आगी लागण्यास उशिर हाेत आहे. मात्र, माेह व तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम सुरू झाल्यानंतर जंगलाला आगी लागण्यास सुरुवात हाेणार आहे. आगींवर नियंत्रण राहावे, यासाठी वन विभागाने नियाेजन केले आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पाचही वन विभागात एकूण ९०८ अग्निरक्षकांची नेमणूक केली आहे. त्यांना प्रति दिवस जवळपास ४०० रुपये मजुरी दिली जाते. १५ फेब्रुवारी ते १५ जूनपर्यंत जवळपास चार महिने कायमस्वरूपी राेजगार उपलब्ध हाेतो. अग्निरक्षक हा वनरक्षकाला आग नियंत्रणात आणण्यासाठी मदत करणार आहे. 

मागील वर्षी ६,८३४ हेक्टर आगीच्या विळख्यातमागील वर्षी जंगलात आग लागण्याच्या २ हजार ४४१ घटनांची नाेंद झाली. या घटनांमध्ये ६ हजार ८३४ हेक्टर क्षेत्रावर आग पसरली. आगीमुळे जंगल व जैवविविधतेचे माेठे नुकसान झाले. 

१३ हजार किमी फायरलाईन जाळणार

वणव्याचा विस्तार थांबविण्यात फायरलाईनचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे वनविभाग जास्तीत जास्त फायरलाईन जाळण्याचा प्रयत्न करते. यावर्षी वनविभागाने केलेल्या   नियाेजनानुसार १२ हजार ७२५ किलोमीटर एवढी फायरलाईन जाळली जाणार आहे. 

जंगलातून जाणारे रस्ते, पायवाटांवरचे गवत वन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत जाळले जाते. या ठिकाणचे गवत अगाेदरच जळले असल्याने उन्हाळ्यात आग लागली तरी ती आग  पुढे पसरत नाही. काही जागा समांतर रेषेत जाळली जाते. त्याला फायरलाईन (जाळरेषा) असे म्हटले जाते.

ग्रामसभांना ताकीद-   तेंदूपत्त्यासाठी कंत्राटदाराने आग लावण्यास ग्रामसभांनी प्रतिबंध घालावा, अन्यथा संबंधित ग्रामसभा तसेच कंत्राटदार यांच्या विरूध्द कारवाई केली जाणार आहे. तसेच आग लागू नये, यासाठी संबंधित ग्रामसभेने अग्निरक्षक नेमावे, असे निर्देश ग्रामसभेला देण्यात आले आहेत.

काय आहे फायर अलर्ट?

वणव्याचा विस्तार थांबविण्यात फायर अलर्ट अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. आकाशात असलेले सॅटेलाईट आगीच्या घटनेची नाेंद घेते व तसा संदेश वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठविते. हा संदेश लगेच वनरक्षकाला प्राप्त होतो. वनरक्षक व त्याची यंत्रणा त्या ठिकाणी पाेहाेचून आग आटोक्यात आणणतात. त्यामुळे आगीचा विस्तार थांबण्यास माेठी मदत हाेते. 

 

टॅग्स :fireआगforestजंगल