शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

पहिली ते चवथीचे ४६ हजार विद्यार्थी घरी राहून कंटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:35 IST

काेराेना महामारीच्या समस्येमुळे मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून शासनाच्या निर्देशानुसार शाळांचे सर्व वर्ग बंद करण्यात आले. काेराेनाचा संसर्ग आटाेक्यात ...

काेराेना महामारीच्या समस्येमुळे मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून शासनाच्या निर्देशानुसार शाळांचे सर्व वर्ग बंद करण्यात आले. काेराेनाचा संसर्ग आटाेक्यात आल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने नाेव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू केले. त्यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांची उपस्थितीही ६५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. एकाच वाॅर्डात घराजवळ राहणारे, शेजारचे इयत्ता पाचवी ते बारावीचे विद्यार्थी शाळेत जात आहेत; मात्र इयत्ता पहिली ते चवथीचे विद्यार्थी घरी राहत असल्याने ते कंटाळले आहेत. लहान मुलांचे मन चंचल असते. त्यांच्यामध्ये माेठ्या प्रमाणात ऊर्जा असते. या ऊर्जेचा चांगल्या बाबींसाठी उपयाेग झाला तर मुले शिक्षणाच्या माध्यमातून जीवनात यशस्वी हाेतात. त्यामुळे इयत्ता पहिली ते चवथीच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास हाेण्यासाठी तसेच त्यांचे व्यक्तिमत्त्व विकास हाेण्यासाठी पहिली ते चवथीचे वर्ग सुरू हाेणे गरजेचे आहे.

बाॅक्स...

जिल्ह्यातील पहिली ते चवथीचे शाळा - १५२२

विद्यार्थी संख्या - ४६२५२

काेट.....

शाळेमध्ये गेल्यावर अनेक वर्गमित्र भेटतात. त्यांच्यासाेबत खेळायला मिळते. घरी राहून कंटाळा आल्यामुळे आम्हाला शाळेत जायचे आहे. माझे माेठे भाऊ व बहीण शाळेत जात आहेत; मात्र माझी शाळा बंद असल्याने मला घरी राहावे लागत आहे. शाळा सुरू हाेण्याची प्रतीक्षा आहे.

- स्वरूप मडावी, विद्यार्थी, इयत्ता पाचवी.

---------------------------

माेठ्या मुला, मुलींच्या शाळा सुरू झाल्या. ते शाळेत जात आहेत. माझ्या वर्गातील व शाळेतील मुले, मुली काेराेना संसर्गाच्या कारणामुळे घरीच राहत आहेत. शाळा सुरू न झाल्याने घरी राहून अभ्यास करावा लागत आहे. घरी राहून कंटाळा आला असून, शाळेकडे मन ओढले आहे.

- प्राजक्ता भांडेकर, विद्यार्थिनी, इयत्ता तिसरी.

------------------------------

स्मार्ट फाेनच्या माध्यमातून माझ्या पाल्याला शिक्षकांकडून गृहपाठ दिला जात आहे. मुलाला साेबत घेऊन अभ्यास करून घ्यावा लागत आहे; मात्र प्रत्यक्ष शिक्षण व ऑनलाइन शिक्षणात बराच फरक आहे. प्रत्यक्ष वर्ग सुरू झाल्याशिवाय विद्यार्थी शिक्षण प्रक्रियेत पूर्वपदावर येणार नाही.

- महेश काेठारे, पालक.

------------------

ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून माझ्या पाल्याला व त्याच्या वर्गमित्रांना स्मार्ट फाेनची ओढ निर्माण झाली आहे. अर्धा ते एक तास हाेमवर्क व इतर अभ्यास केल्यावर ताे व्हिडिओ गेम पाहण्याचा प्रयत्न करीत आहे. इयत्ता पहिली ते चवथीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान हाेत आहे.

- विनाेद चाैधरी, पालक

बाॅक्स...

पालक झाले त्रस्त

इयत्ता पहिली ते चवथीचे विद्यार्थी म्हटले की त्यांच्याकडे पालकांना बारकाईने लक्ष ठेवावे लागते. त्यांच्या दरराेजच्या सवयी, अभ्यास, गृहपाठ आदी सर्व पालकांना पाहावे लागते. शाळा सुरू हाेऊन प्रत्यक्ष वर्ग भरत असले की, चार ते पाच तास विद्यार्थी शाळेत राहतात. शाळेमुळे विद्यार्थ्यांना शिस्त लागते; मात्र गेल्या १० महिन्यांपासून लहान मुलांची शाळा पूर्णत: बंद असल्याने मुले, मुली घरी राहून मस्ती करीत आहेत. त्यांचा खाेडकरपणा वाढल्यामुळे बरेच पालक त्रस्त झाले आहेत. इयत्ता पहिली ते चवथीचे वर्ग सुरू व्हावे, अशी मागणी पालकांकडून हाेत आहे.