शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

पहिली ते चवथीचे ४६ हजार विद्यार्थी घरी राहून कंटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:35 IST

काेराेना महामारीच्या समस्येमुळे मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून शासनाच्या निर्देशानुसार शाळांचे सर्व वर्ग बंद करण्यात आले. काेराेनाचा संसर्ग आटाेक्यात ...

काेराेना महामारीच्या समस्येमुळे मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून शासनाच्या निर्देशानुसार शाळांचे सर्व वर्ग बंद करण्यात आले. काेराेनाचा संसर्ग आटाेक्यात आल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने नाेव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू केले. त्यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांची उपस्थितीही ६५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. एकाच वाॅर्डात घराजवळ राहणारे, शेजारचे इयत्ता पाचवी ते बारावीचे विद्यार्थी शाळेत जात आहेत; मात्र इयत्ता पहिली ते चवथीचे विद्यार्थी घरी राहत असल्याने ते कंटाळले आहेत. लहान मुलांचे मन चंचल असते. त्यांच्यामध्ये माेठ्या प्रमाणात ऊर्जा असते. या ऊर्जेचा चांगल्या बाबींसाठी उपयाेग झाला तर मुले शिक्षणाच्या माध्यमातून जीवनात यशस्वी हाेतात. त्यामुळे इयत्ता पहिली ते चवथीच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास हाेण्यासाठी तसेच त्यांचे व्यक्तिमत्त्व विकास हाेण्यासाठी पहिली ते चवथीचे वर्ग सुरू हाेणे गरजेचे आहे.

बाॅक्स...

जिल्ह्यातील पहिली ते चवथीचे शाळा - १५२२

विद्यार्थी संख्या - ४६२५२

काेट.....

शाळेमध्ये गेल्यावर अनेक वर्गमित्र भेटतात. त्यांच्यासाेबत खेळायला मिळते. घरी राहून कंटाळा आल्यामुळे आम्हाला शाळेत जायचे आहे. माझे माेठे भाऊ व बहीण शाळेत जात आहेत; मात्र माझी शाळा बंद असल्याने मला घरी राहावे लागत आहे. शाळा सुरू हाेण्याची प्रतीक्षा आहे.

- स्वरूप मडावी, विद्यार्थी, इयत्ता पाचवी.

---------------------------

माेठ्या मुला, मुलींच्या शाळा सुरू झाल्या. ते शाळेत जात आहेत. माझ्या वर्गातील व शाळेतील मुले, मुली काेराेना संसर्गाच्या कारणामुळे घरीच राहत आहेत. शाळा सुरू न झाल्याने घरी राहून अभ्यास करावा लागत आहे. घरी राहून कंटाळा आला असून, शाळेकडे मन ओढले आहे.

- प्राजक्ता भांडेकर, विद्यार्थिनी, इयत्ता तिसरी.

------------------------------

स्मार्ट फाेनच्या माध्यमातून माझ्या पाल्याला शिक्षकांकडून गृहपाठ दिला जात आहे. मुलाला साेबत घेऊन अभ्यास करून घ्यावा लागत आहे; मात्र प्रत्यक्ष शिक्षण व ऑनलाइन शिक्षणात बराच फरक आहे. प्रत्यक्ष वर्ग सुरू झाल्याशिवाय विद्यार्थी शिक्षण प्रक्रियेत पूर्वपदावर येणार नाही.

- महेश काेठारे, पालक.

------------------

ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून माझ्या पाल्याला व त्याच्या वर्गमित्रांना स्मार्ट फाेनची ओढ निर्माण झाली आहे. अर्धा ते एक तास हाेमवर्क व इतर अभ्यास केल्यावर ताे व्हिडिओ गेम पाहण्याचा प्रयत्न करीत आहे. इयत्ता पहिली ते चवथीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान हाेत आहे.

- विनाेद चाैधरी, पालक

बाॅक्स...

पालक झाले त्रस्त

इयत्ता पहिली ते चवथीचे विद्यार्थी म्हटले की त्यांच्याकडे पालकांना बारकाईने लक्ष ठेवावे लागते. त्यांच्या दरराेजच्या सवयी, अभ्यास, गृहपाठ आदी सर्व पालकांना पाहावे लागते. शाळा सुरू हाेऊन प्रत्यक्ष वर्ग भरत असले की, चार ते पाच तास विद्यार्थी शाळेत राहतात. शाळेमुळे विद्यार्थ्यांना शिस्त लागते; मात्र गेल्या १० महिन्यांपासून लहान मुलांची शाळा पूर्णत: बंद असल्याने मुले, मुली घरी राहून मस्ती करीत आहेत. त्यांचा खाेडकरपणा वाढल्यामुळे बरेच पालक त्रस्त झाले आहेत. इयत्ता पहिली ते चवथीचे वर्ग सुरू व्हावे, अशी मागणी पालकांकडून हाेत आहे.