शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

रबी शिवार फेरीत ३५० शेतकऱ्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2017 02:18 IST

कृषी संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालय, कृषी विज्ञान केंद्र व आत्मा, जिल्हा नाविन्यता परिषद, राष्ट्रीय

कृषी मेळावा : विविध पीक पद्धतीबाबत केले मार्गदर्शन; कृषी महाविद्यालयातील पिकांची पाहणी गडचिरोली : कृषी संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालय, कृषी विज्ञान केंद्र व आत्मा, जिल्हा नाविन्यता परिषद, राष्ट्रीय केमिकल्स फर्टीलायझर्स लिमिटेड, महाबिज व व्हीसीएमएफ यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी संशोधन केंद्र सोनापूर येथे कृषी मेळावा व रबी शिवार फेरीचे आयोजन २४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले होते. या मेळाव्यादरम्यान जिल्हाभरातील ३५० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. शिवार फेरीचे उद्घाटन आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनीय समारोहाला कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अमरशेट्टीवार, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. व्ही. जे. तांबे, आत्माच्या उपसंचालक प्रिती हिरडकर, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा चौधरी, बाबुराव सारवे आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनानंतर मार्गदर्शन करताना डॉ. प्रकाश पवार यांनी शेतकऱ्यांचा आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी प्रचलित पीक पध्दतीत आमुलाग्र बदल करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी, असे झाल्यास शेती निश्चितच फायद्याची ठरेल. नवीन संकल्पना, नवीन तंत्रज्ञान वापरण्याचे कौशल्य शेतकऱ्यांनी आत्मसात केले पाहिजे, असे मार्गदर्शन केले. प्रगतशील शेतकरी बाबुराव सारवे यांनी सगुणा राईस पध्दतीबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रम समन्वयक डॉ. व्ही. जे. तांबे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे कर्मचारी नेहमी तत्पर राहतात. शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन आवश्यक असल्यास त्यांनी प्रत्यक्ष कृषी केंद्रात येऊन सल्ला विचारावा, असे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. अमरशेट्टीवार, संचालन आर. डब्ल्यू. वाघमारे, आभार प्रा. डी. एन. अनोकार यांनी मानले. यशस्वीतेसाठी डॉ. सुधीर बोरकर, डॉ. मनोहर इंगोले, डॉ. शुभांगी अलेक्झांडर, डॉ. डी. टी. उंद्रतवाड, डॉ. एच. एफ राठोड यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी) निवडक शेतकऱ्यांनाच बोलावल्याचा आरोप कृषी विज्ञान केंद्रात विविध मेळावे व मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र या कार्यक्रमाला जिल्ह्यातील काही निवडकच शेतकऱ्यांना बोलाविले जाते. त्यामुळे या कार्यक्रमांचा लाभ काही निवडकच शेतकऱ्यांना मिळतो, असा एका प्रश्न शेतकऱ्याने उपस्थित केला. यावर प्रतिक्रिया देताना कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. व्ही. जे. तांबे यांनी प्रत्येक मेळावा आयोजनाची माहिती वृत्तपत्रातून दिली जाते. त्यामुळे निवडक शेतकऱ्यांना कार्यक्रमाला बोलविले जाते. हा आरोप चुकीचा असल्याचे सांगितले.