शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

रबी शिवार फेरीत ३५० शेतकऱ्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2017 02:18 IST

कृषी संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालय, कृषी विज्ञान केंद्र व आत्मा, जिल्हा नाविन्यता परिषद, राष्ट्रीय

कृषी मेळावा : विविध पीक पद्धतीबाबत केले मार्गदर्शन; कृषी महाविद्यालयातील पिकांची पाहणी गडचिरोली : कृषी संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालय, कृषी विज्ञान केंद्र व आत्मा, जिल्हा नाविन्यता परिषद, राष्ट्रीय केमिकल्स फर्टीलायझर्स लिमिटेड, महाबिज व व्हीसीएमएफ यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी संशोधन केंद्र सोनापूर येथे कृषी मेळावा व रबी शिवार फेरीचे आयोजन २४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले होते. या मेळाव्यादरम्यान जिल्हाभरातील ३५० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. शिवार फेरीचे उद्घाटन आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनीय समारोहाला कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अमरशेट्टीवार, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. व्ही. जे. तांबे, आत्माच्या उपसंचालक प्रिती हिरडकर, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा चौधरी, बाबुराव सारवे आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनानंतर मार्गदर्शन करताना डॉ. प्रकाश पवार यांनी शेतकऱ्यांचा आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी प्रचलित पीक पध्दतीत आमुलाग्र बदल करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी, असे झाल्यास शेती निश्चितच फायद्याची ठरेल. नवीन संकल्पना, नवीन तंत्रज्ञान वापरण्याचे कौशल्य शेतकऱ्यांनी आत्मसात केले पाहिजे, असे मार्गदर्शन केले. प्रगतशील शेतकरी बाबुराव सारवे यांनी सगुणा राईस पध्दतीबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रम समन्वयक डॉ. व्ही. जे. तांबे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे कर्मचारी नेहमी तत्पर राहतात. शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन आवश्यक असल्यास त्यांनी प्रत्यक्ष कृषी केंद्रात येऊन सल्ला विचारावा, असे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. अमरशेट्टीवार, संचालन आर. डब्ल्यू. वाघमारे, आभार प्रा. डी. एन. अनोकार यांनी मानले. यशस्वीतेसाठी डॉ. सुधीर बोरकर, डॉ. मनोहर इंगोले, डॉ. शुभांगी अलेक्झांडर, डॉ. डी. टी. उंद्रतवाड, डॉ. एच. एफ राठोड यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी) निवडक शेतकऱ्यांनाच बोलावल्याचा आरोप कृषी विज्ञान केंद्रात विविध मेळावे व मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र या कार्यक्रमाला जिल्ह्यातील काही निवडकच शेतकऱ्यांना बोलाविले जाते. त्यामुळे या कार्यक्रमांचा लाभ काही निवडकच शेतकऱ्यांना मिळतो, असा एका प्रश्न शेतकऱ्याने उपस्थित केला. यावर प्रतिक्रिया देताना कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. व्ही. जे. तांबे यांनी प्रत्येक मेळावा आयोजनाची माहिती वृत्तपत्रातून दिली जाते. त्यामुळे निवडक शेतकऱ्यांना कार्यक्रमाला बोलविले जाते. हा आरोप चुकीचा असल्याचे सांगितले.