शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

३५ हजार क्विंटल बियाण्यांचा पुरवठा

By admin | Updated: June 22, 2017 01:33 IST

पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना बियाणांचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी कृषी विभागाने उन्हाळ्यातच नियोजन केले होते.

कृषी केंद्र चालकांकडे पुरेसा साठा : ख्ररेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना बियाणांचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी कृषी विभागाने उन्हाळ्यातच नियोजन केले होते. त्यामुळे पेरणीच्या पूर्वीच जवळपास ३५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहेत. कृषी विभागाने ३४ हजार ५६५ क्विंटल बियाणांचे नियोजन केले होते. त्यापेक्षा अधिक बियाणांचा पुरवठा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही दुकानदाराला अधिकची किमत बियाणांसाठी मोजू नये असे आवाहन कृषी विभागाच्या मार्फत करण्यात आले आहे. खरीप हंगामात सुमारे दोन लाख हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली जाते. यातील धान हे प्रमुख पीक आहे. सुमारे एक लाख हेक्टरवर धान पिकाची लागवड होते. त्यामुळे सर्वाधिक बियाणे धान पिकाचे लागते. या बियाणांचा तुटवडा निर्माण झाल्यास शेतकऱ्यांना अधिकची किम्मत देऊन बियाणे खरेदी करावे लागते. त्याचबरोबर बियाणांचा काळाबाजार फोफावण्याची शक्यता राहते. बियाणांचा काळाबाजार थांबून शेतकऱ्यांची लूट थांबण्यासाठी कृषी विभागाच्या मार्फत नियोजन केले होते. पेरणीपूर्वीच बियाणे कृषी केंद्रांमध्ये दाखल होतील यादृष्टीने पाठपुरावा केला. त्यामुळे पेरणीपूर्वी मागणीपेक्षा अधिक बियाणे उपलब्ध झाले आहेत. जिल्ह्याच्या काही भागात पुरेसा पाऊस झाल्याने पेरण्यांना वेग आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रांमध्ये गर्दी करण्यास सुरूवात केली आहे. बियाणांचा सार्वजनिक कंपन्या व खासगी कंपन्या यांच्या मार्फत बियाणांचा पुरवठा केला जातो. कृषी विभागाने केलेल्या नियोजनाच्या अधिक प्रमाणात बियाणांचा पुरवठा झाला आहे. मात्र काही ठिकाणची माहिती कृषी विभागाला प्राप्त झालेली नाही. कृषी विभागाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार कृषी विभागाने ३४ हजार ५६५ क्विंटल बियाणांचे नियोजन केले होते. त्यापैकी २३ हजार ४२९ क्विंटल बियाणे उपलब्ध झाल्याची आकडेवारी प्राप्त झाली आहे. प्रत्यक्षात मात्र यापेक्षा अधिक प्रमाणात पुरवठा झाला असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. कृषी विभागाने धान पिकाच्या बियाणांचा ३१ हजार ८३७ क्विंटल बियाणांचा पुरवठा होण्याच्या दृष्टीने नियोजन केले होते. त्याबरोबर सोयाबीन २ हजार १०० क्विंटल, तूर ३५० क्विंटल, कापूस १३९ क्विंटल, मका १२५ क्विंटल, उडीद ३ क्विंटल, तीळ ११ क्विंटल बियाणांचा पुरवठा होण्याच्या दृष्टिने नियोजन केले होते. मात्र यापेक्षाही अधिक प्रमाणात कृषी केंद्र चालकांकडे बियाणे उपलब्ध झाले आहेत. कृषी केंद्र व कृषी कार्यालयांमध्ये धान बियाणांसाठी शेतकऱ्यांची गर्दी असल्याचे दिसून येत आहे. सध्या धान पेरणीलाही वेग आलेला आहे. खासगी कंपन्यांमध्ये लागली स्पर्धा पाच वर्षांपुर्वी बियाणांचा पुरवठा करणाऱ्या काही निवडकच कंपन्या होत्या. त्यामुळे या कंपन्यांची मनमानी चालत होती. त्यांच्याच हातात पुरवठ्याचे सुत्र असल्याने पुरवठा नियंत्रित करून भाववाढ करीत होते. बियाणे उपलब्ध होणार नाही अशी भिती शेतकऱ्यांमध्ये असल्याने दुकानदार सांगेल तेवढी किम्मत शेतकरी मोजण्यास तयार होत होता. यामध्ये शेतकऱ्यांची मोठी लूट होत होती. कंपन्यांचे बियाणे परवडत नसल्याने शेतकरी स्वत:कडचेच बियाणे वापरत होते. आता मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. बियाणे विक्रीच्या क्षेत्रात अनेक कंपन्यांनी उडी घेतली आहे. त्यामुळे त्यांच्यामध्येच स्पर्धा निर्माण झाली आहे. स्पर्धेमुळे बियाणांचा पुरवठा वाढला आहे. त्याचबरोबर वाजवी किमतीत बियाणेसुद्धा उपलब्ध झाली आहेत. बियाणांचा होणारा काळाबाजार आता काही प्रमाणात थांबला आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही दुकानदाराला अधिकची किम्मत देऊ नये. अधिकची किंमत मागीतल्यास याबाबतची तक्रार कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे करावी असे आवाहन करण्यात आले आहे.