शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
5
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
6
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
7
Success Story : शेतकऱ्याच्या मुलानं बनवलं Nirmaला मोठा ब्रँड; सायकलवरुन ₹३ किलोनं विकली पावडर; वाचा करसनभाईंची कहाणी
8
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
9
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
10
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
11
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
12
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
13
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
14
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
15
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
16
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
17
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
18
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
19
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
20
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल

चार वर्षात वज्राघाताने ३५ नागरिकांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 11:45 PM

गडचिरोली जिल्ह्यात जंगल असल्याने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत विजा पडण्याचे प्रमाण अधिक आहे. २०१३ ते २०१७ या कालावधीत वीज पडून सुमारे ३५ नागरिक व शेकडो पाळीव जनावरांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देजनावरांचाही मृत्यू : वीज पडण्याचे प्रमाण तुलनेने अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात जंगल असल्याने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत विजा पडण्याचे प्रमाण अधिक आहे. २०१३ ते २०१७ या कालावधीत वीज पडून सुमारे ३५ नागरिक व शेकडो पाळीव जनावरांचा मृत्यू झाला आहे.गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात धानाची शेती केली जाते. ऐन पावसाळ्यात धान रोवणीची कामे केली जातात. धो-धो पाऊस पडत असला तरी रोवणी सुरू होते. त्यामुळे शेतकरी वर्ग पावसाळ्याच्या दिवसात शेतात राहतात. परिणामी वीज पडून मृत्यूमुखी पडण्याच्या घटना घडतात. बहुतांश गावे जंगलाने व्यापली आहेत. वीज झाडाकडे आकर्षित होते. त्यामुळेही जीवितहानी होते. मेघगर्जना होत असल्यास कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत नागरिकांमध्ये पाहिजे, त्या प्रमाणात जागृती नाही. त्यामुळेही जीव गमवावा लागतो. २०१३ ते २०१७ या चार वर्षांच्या कालावधीत जिल्हाभरातील ३५ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. मानवाबरोबरच पाळीव प्राण सुध्दा विजांचे शिकार बनतात. मागील चार वर्षात शेकडो जनावरांना जीव गमवावा लागला आहे.विजेपासून संरक्षण करण्यासाठी वीज रोधक यंत्र लावला जातो. मात्र या यंत्राची विजेला अटकाव करण्याची क्षमता फार कमी राहते. वीजरोधक यंत्रापासून ५० ते ६० मीटर अंतरावर वीज पडणार असेल तर तेवढ्या अंतरावरील वीज स्वत:कडे खेचून वीजरोधक यंत्र वीज पडण्यापासून होणारी हानी थांबवू शकते. वीजरोधक यंत्राची ही मर्यादा आहे. विजेपासून संरक्षण करायचे असल्यास मेघगर्जना होत असताना शक्य तो घराबाहेर न पडणे हाच एकमेव उपाय आहे.विजा चमकत असताना शक्यतो लहान टेकडी, एकाकी झाड, झेंड्याचा खांब, प्रक्षेपण मनोरा यासारख्या उंच असलेल्या जागांचा आश्रय टाळावा. विजेपासून संरक्षण मिळण्यासाठी कोणतीही जागा पूर्ण सुरक्षित नसते. तरीही बंदीस्त इमारत, चारचाकी वाहन, ट्रक, बस, कार ही साधने बरीच सुरक्षित मानली जातात व आसरा घेण्यास काहीच हरकत नाही. वादळादरम्यान जनावरे झाडाखाली एकत्र गोळा होतात आणि विजेच्या कोसळण्याने एकाचवेळी अनेक जनावरांना प्राण गमवावा लागतो. वीज नेहमी सर्वात उंच जागेवर कोसळते. धातूची वस्तू जेवढी मोठी तेवढी वीज कोसळण्याची शक्यता जास्त असते. जेवढे झाड उंच तेवढा धोका अधिक असतो, त्यामुळे झाडापासून दूर राहावे.जर तुमच्या आसपास एखाद्या व्यक्तीवर वीज पडली असेल तर त्याच्यावर त्वरित प्रथमोपचार करा. श्वासोच्छवास थांबला असेल तर त्या व्यक्तीच्या तोंडावर तोंड ठेवून कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा. त्यामुळे त्या व्यक्तीचा श्वासोच्छवास नैसर्गिकरित्या सुरू होण्यास मदत होईल.हृदयाचे ठोके थांबले असल्यास सीपीआरचा उपयोग करावा. नाडीचा ठोका चालू असेल तर अंगावर भाजल्याच्या खुणा, हाडांच्या इजा याबाबत तपासणी व नोंद करा. दृष्टी ठिक आहे किंवा नाही, ऐकू येते किंवा नाही तसेच इतर हालचालींची नोंद घ्या.नागरिकांमध्ये जनजागृतीचा प्रयत्नआपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत विजेपासून बचाव करण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत नागरिकांमध्ये विविध माध्यमातून जनजागृती केली जात आहे. त्यामुळे विजा पडून मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. २०१८ मध्ये वीज पडून एकाही नागरिकाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही. मेघगर्जना होत असताना शक्यतो जवळपासच्या इमारतीचा आसरा घेणे हा सर्वाधिक चांगला उपाय आहे. मेघगर्जना सुरू असताना शक्यतो घराबाहेर पडू नये, असा सल्ला आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे.

टॅग्स :Rainपाऊस