शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

सरत्या वर्षात जिल्ह्यात ३५ खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 23:34 IST

२०१७ या सरत्या वर्षात वर्षभराच्या कालावधीत सुमारे ३५ नागरिकांचा खून झाला. यामध्ये सुमारे १३ नागरिकांचे खून नक्षल्यांकडून झाले आहेत. पोलीस विभागाने नक्षल्यांवर बराच नियंत्रण मिळविला असला तरी नागरिकांच्या होणाऱ्या हत्या थांबविण्यात पोलीस विभागाला अजूनपर्यंत पूर्णपणे यश मिळाले नाही.

ठळक मुद्देविनयभंगाचे ४४ गुन्हे दाखल : १ हजार ७७४ दारू अड्ड्यांवर पोलीस विभागातर्फे धाड

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २०१७ या सरत्या वर्षात वर्षभराच्या कालावधीत सुमारे ३५ नागरिकांचा खून झाला. यामध्ये सुमारे १३ नागरिकांचे खून नक्षल्यांकडून झाले आहेत. पोलीस विभागाने नक्षल्यांवर बराच नियंत्रण मिळविला असला तरी नागरिकांच्या होणाऱ्या हत्या थांबविण्यात पोलीस विभागाला अजूनपर्यंत पूर्णपणे यश मिळाले नाही.गडचिरोली जिल्हा आदिवासी बहूल व मागास असला तरी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत या जिल्ह्यात गुन्ह्यांचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे मागील काही वर्षांच्या गुन्ह्याच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, दिसून येते. २०१७ या वर्षात गडचिरोली जिल्ह्यात ४४ विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले आहेत. ३३ बलात्काराची प्रकरणे घडली आहेत. ९१ चोऱ्या झाल्या आहेत. चार ठिकाणी मोठे दरोडे पडले आहेत. ६३ नागरिकांवर खूनाचा प्रयत्न झाला आहे. १६ ठिकाणी दंगा निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलीस विभागाच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली. १५५ नागरिकांना अपघातांमुळे दुखापत झाली आहे. ९२ जुगार अड्ड्यांवर पोलीस विभागाच्या वतीने धाड टाकण्यात आली आहे. या धाडीमध्ये कोंबड बाजारांचा सर्वाधिक समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यात कोंबड बाजाराच्या माध्यमातून मोठा जुगार खेळला जातो. त्यामुळे कोंबड बाजारावर पोलिसांकडून धाड टाकली जाते.सणासुदीच्या कालावधीत कोणतीही मोठी घटना घडू नये, यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींना तडीपार केले जाते. २०१७ या वर्षभराच्या कालावधीत सुमारे १२ आरोपींना तडीपार करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे. तरीही तेलंगणा, छत्तीसगड राज्य नजीकच्या भंडारा व गोंदिया जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात दारू आणली जाते. तडीपार केलेल्या एकूण गुन्हेगारांमध्ये दारूच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या गुन्हेगारांचा समावेश अधिक आहे.गुन्ह्यांचे प्रमाण तुलनेत कमीगडचिरोली जिल्ह्याचा आकार इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वसाधारण आहे. लोकसंख्या सुध्दा ११ लाख एवढी आहे. मात्र इतर जिल्ह्यांच्या तुलनेत या ठिकाणी गुन्हे घडण्याचे व त्याची नोंद होण्याचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे. नक्षलचे गुन्हे सोडले तर इतर गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे. काही जिल्ह्यांच्या एका तालुक्यामध्ये जेवढे गुन्हे घडतात. तेवढे गुन्हे पूर्ण गडचिरोली जिल्हाभरात घडतात. ही येथील नागरिकांची असलेली संयमी व शांत वृत्ती दिसून येते. आजपर्यंत मोठमोठे मेळावे, मोर्चे, निदर्शने झाली आहेत. हजारोंच्या संख्येने नागरिक गोळा होतात. मात्र अपवाद वगळता विपरित घटना आजपर्यंत कधीच घडली नाही.