शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

सरत्या वर्षात जिल्ह्यात ३५ खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 23:34 IST

२०१७ या सरत्या वर्षात वर्षभराच्या कालावधीत सुमारे ३५ नागरिकांचा खून झाला. यामध्ये सुमारे १३ नागरिकांचे खून नक्षल्यांकडून झाले आहेत. पोलीस विभागाने नक्षल्यांवर बराच नियंत्रण मिळविला असला तरी नागरिकांच्या होणाऱ्या हत्या थांबविण्यात पोलीस विभागाला अजूनपर्यंत पूर्णपणे यश मिळाले नाही.

ठळक मुद्देविनयभंगाचे ४४ गुन्हे दाखल : १ हजार ७७४ दारू अड्ड्यांवर पोलीस विभागातर्फे धाड

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २०१७ या सरत्या वर्षात वर्षभराच्या कालावधीत सुमारे ३५ नागरिकांचा खून झाला. यामध्ये सुमारे १३ नागरिकांचे खून नक्षल्यांकडून झाले आहेत. पोलीस विभागाने नक्षल्यांवर बराच नियंत्रण मिळविला असला तरी नागरिकांच्या होणाऱ्या हत्या थांबविण्यात पोलीस विभागाला अजूनपर्यंत पूर्णपणे यश मिळाले नाही.गडचिरोली जिल्हा आदिवासी बहूल व मागास असला तरी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत या जिल्ह्यात गुन्ह्यांचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे मागील काही वर्षांच्या गुन्ह्याच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, दिसून येते. २०१७ या वर्षात गडचिरोली जिल्ह्यात ४४ विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले आहेत. ३३ बलात्काराची प्रकरणे घडली आहेत. ९१ चोऱ्या झाल्या आहेत. चार ठिकाणी मोठे दरोडे पडले आहेत. ६३ नागरिकांवर खूनाचा प्रयत्न झाला आहे. १६ ठिकाणी दंगा निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलीस विभागाच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली. १५५ नागरिकांना अपघातांमुळे दुखापत झाली आहे. ९२ जुगार अड्ड्यांवर पोलीस विभागाच्या वतीने धाड टाकण्यात आली आहे. या धाडीमध्ये कोंबड बाजारांचा सर्वाधिक समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यात कोंबड बाजाराच्या माध्यमातून मोठा जुगार खेळला जातो. त्यामुळे कोंबड बाजारावर पोलिसांकडून धाड टाकली जाते.सणासुदीच्या कालावधीत कोणतीही मोठी घटना घडू नये, यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींना तडीपार केले जाते. २०१७ या वर्षभराच्या कालावधीत सुमारे १२ आरोपींना तडीपार करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे. तरीही तेलंगणा, छत्तीसगड राज्य नजीकच्या भंडारा व गोंदिया जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात दारू आणली जाते. तडीपार केलेल्या एकूण गुन्हेगारांमध्ये दारूच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या गुन्हेगारांचा समावेश अधिक आहे.गुन्ह्यांचे प्रमाण तुलनेत कमीगडचिरोली जिल्ह्याचा आकार इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वसाधारण आहे. लोकसंख्या सुध्दा ११ लाख एवढी आहे. मात्र इतर जिल्ह्यांच्या तुलनेत या ठिकाणी गुन्हे घडण्याचे व त्याची नोंद होण्याचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे. नक्षलचे गुन्हे सोडले तर इतर गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे. काही जिल्ह्यांच्या एका तालुक्यामध्ये जेवढे गुन्हे घडतात. तेवढे गुन्हे पूर्ण गडचिरोली जिल्हाभरात घडतात. ही येथील नागरिकांची असलेली संयमी व शांत वृत्ती दिसून येते. आजपर्यंत मोठमोठे मेळावे, मोर्चे, निदर्शने झाली आहेत. हजारोंच्या संख्येने नागरिक गोळा होतात. मात्र अपवाद वगळता विपरित घटना आजपर्यंत कधीच घडली नाही.