३०० आदिवासी नागरिकांना मिळाले जात प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:36 IST2021-02-13T04:36:07+5:302021-02-13T04:36:07+5:30
चामाेर्शी : तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या गावांमधील आदिवासींना जात प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी उपविभागीय अधिकारी उत्तम ताेडसाम यांनी पुढाकार ...

३०० आदिवासी नागरिकांना मिळाले जात प्रमाणपत्र
चामाेर्शी : तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या गावांमधील आदिवासींना जात प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी उपविभागीय अधिकारी उत्तम ताेडसाम यांनी पुढाकार घेतला. सिंगमपल्ली, चाैडमपल्ली, चपराळा व चंदनखेडी आदी गावांतील ३०० आदिवासी नागरिकांना जात प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आले. चंदनखेडी परिसरातील अनेक आदिवासी नागरिक जात प्रमाणपत्रापासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांना विविध शासकीय याेजनांचा लाभ मिळण्यासाठी अडचणी येत आहेत. ही बाब लक्षात येताच उपविभागीय अधिकारी उत्तम ताेडसाम यांनी पुढाकार घेऊन नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर विशेष शिबिर घेऊन सुमारे ३०० आदिवासी नागरिकांना जात प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले. त्याबद्दल चारही गावांतील नागरिकांच्या वतीने ११ फेब्रुवारी रोजी सिंगनपल्ली येथे सामूहिक कार्यक्रम घेऊन एसडीओ ताेडसाम यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला एसडीओ कार्यालयातील अव्वल कारकून किशाेर येरगुडे, आष्टीचे मंडल अधिकारी नारायण सरपे, पुरवठा निरीक्षक गाैरव भांडेकर, सेतू केंद्राचे संचालक रूपेश करडे, सेवानिवृत्त पाेलीस पाटील माराेती आदे, चंदनखेडीचे पाेलीस पाटील बालाजी तलांडे, चाैडमपल्लीचे देवकुमार मेश्राम, सिंगनपल्लीचे अशाेक तलांडे, कुनघाडा मालच्या मंदा तलांडे, माजी सरपंच शीला तलांडे, ग्रामसेवक वासुदेव बारसागडे व नागरिक उपस्थित हाेते.