शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

एका एकरात ३० क्विंटल मिरची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2019 12:52 AM

तालुक्यात शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे. या तालुक्यातील बहुतांश शेतकरी धानपिकासोबतच भाजीपाला पिकाकडे वळले आहे. तालुक्याच्या एकोडी येथील एका शेतकºयाने आपल्या एक एकरच्या शेतात मिरची पिकाची लागवड केली.

ठळक मुद्देएकोडीतील शेतकऱ्याची यशोगाथा : दीड लाखांचे उत्पन्न मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : तालुक्यात शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे. या तालुक्यातील बहुतांश शेतकरी धानपिकासोबतच भाजीपाला पिकाकडे वळले आहे. तालुक्याच्या एकोडी येथील एका शेतकºयाने आपल्या एक एकरच्या शेतात मिरची पिकाची लागवड केली. त्या मिरच्या आता निघण्यास सुरूवात झाली असून एका एकरातून ३० क्विंटल मिरचीचे उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यातून त्यांना दीड लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे.तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर वैनगंगा नदीशेजारी एकोडी हे खेडेगाव आहे. येथील शेतकरी रवी धोटे यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. धोटे यांना लहानपणापासून शेती कामाची आवड निर्माण झाली. वडीलोपार्जीत शेतजमिनीत दरवर्षी नवनवीन प्रयोग आपल्या कल्पनेतून करण्याचे धाडस ते दाखवितात. यावर्षी धोटे यांनी आपल्या एक एकरात मिरची पिकाची लागवड केली. यासाठी त्यांना ३० हजार रुपयांचा खर्च आला. मिरची पिकाची चांगली देखभाल करून काळजी घेतल्यामुळे जवळपास ३० क्विंटल उत्पादन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. धोटे यांच्या शेतातील मिरची पीक आता तोडणीला आले आहे. ३० क्विंटल मिरची विक्रीतून जवळपास १ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न धोटे यांना मिळणार आहे. दिवसेंदिवस युवा पिढी शेती व्यवसायाकडे पाठ फिरवित आहे. मात्र काही मोजके सुशिक्षित युवा शेतकरी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण करीत आहे. यामध्ये रवी धोटे हे एक आहेत. शेतकºयांनी धानपिकासोबतच विविध प्रकारच्या भाजीपाला पिकाची शेती केल्यास शेती व्यवसाय फायदेशिर ठरू शकतो, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी