शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

‘नवसंजीवनी’तील २५३ गावे मोफत धान्यास मुकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 05:00 IST

लॉकडाऊनच्या काळात एप्रिल ते जून या तीन महिन्यात मोफत देण्यात आलेले प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य (तांदूळ आणि गहू) आता जुलै ते सप्टेंबर या काळासाठीही देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यामुळे रेशन दुकानातून मिळणाऱ्या नियमित नियतनासोबतच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या ५ किलो मोफत धान्याचा लाभ अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना मिळणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देअनेक गावे संपर्काबाहेर : ७० हजार नागरिक राहणार वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लॉकडाऊनच्या काळामुळे गोरगरीब नागरिकांच्या दैनंदिन मिळकतीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यांना आणखी तीन महिने मोफत धान्य देण्याचा आदेश केंद्र सरकारने काढला. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील २५३ गावांमध्ये आता धान्याचे वाहन पोहोचणेच शक्य नसल्यामुळे त्या गावातील ७० हजार नागरिकांना तूर्त तरी या मोफत धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे.जून महिन्यात पावसाला सुरूवात झाली की जिल्ह्यातील धानोरा, मुलचेरा, एटापल्ली, सिरोंचा, अहेरी आणि भामरागड या सहा तालुक्यातील २५३ गावांचा संपर्क तुटतो. अनेक नदी-नाल्यांवर पूल नसल्यामुळे कोणतेही वाहन त्या गावांमध्ये जाऊ शकत नाही. त्यामुळे नवसंजीवनी योजनेअंतर्गत त्या गावांमधील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील ७० हजार १३४ नागरिकांसाठी मे महिन्यातच जून ते सप्टेंबर या चार महिन्यांचा धान्यसाठा गावात पोहोचवून दिला जातो. यावर्षीही ते धान्य त्या गावांशी संबंंधित १२७ रास्त भाव दुकानांमध्ये पोहोचवण्यात आले.दरम्यान लॉकडाऊनच्या काळात एप्रिल ते जून या तीन महिन्यात मोफत देण्यात आलेले प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य (तांदूळ आणि गहू) आता जुलै ते सप्टेंबर या काळासाठीही देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यामुळे रेशन दुकानातून मिळणाऱ्या नियमित नियतनासोबतच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या ५ किलो मोफत धान्याचा लाभ अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना मिळणे गरजेचे आहे. पण पावसाळा सुरू झाल्यामुळे नवसंजीवनी योजनेतील २५३ गावांना आता ते ५ किलो मोफत धान्य कसे पोहोचविणार, अशी मोठी समस्या निर्माण झाली आहे. यावर प्रशासन कशा पद्धतीने तोडगा काढते याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.उशिरा आलेल्या आदेशामुळे अडचणनवसंजीवनी योजनेतील २५३ गावांना पावसाळा सुरू होण्याआधीच चार महिन्यांचा धान्य पुरवठा झाला आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत तीन महिने मोफत धान्य वाटपाचा आदेश जुलैच्या दुसºया आठवड्यात मिळाला. त्यामुळे त्या २५३ गावांना आता हे धान्य पुरवणे कठीण होणार आहे. तरीही शक्य तितक्या गावांना धान्य पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी व्ही.के.सहारे यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या