शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

‘नवसंजीवनी’तील २५३ गावे मोफत धान्यास मुकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 05:00 IST

लॉकडाऊनच्या काळात एप्रिल ते जून या तीन महिन्यात मोफत देण्यात आलेले प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य (तांदूळ आणि गहू) आता जुलै ते सप्टेंबर या काळासाठीही देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यामुळे रेशन दुकानातून मिळणाऱ्या नियमित नियतनासोबतच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या ५ किलो मोफत धान्याचा लाभ अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना मिळणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देअनेक गावे संपर्काबाहेर : ७० हजार नागरिक राहणार वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लॉकडाऊनच्या काळामुळे गोरगरीब नागरिकांच्या दैनंदिन मिळकतीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यांना आणखी तीन महिने मोफत धान्य देण्याचा आदेश केंद्र सरकारने काढला. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील २५३ गावांमध्ये आता धान्याचे वाहन पोहोचणेच शक्य नसल्यामुळे त्या गावातील ७० हजार नागरिकांना तूर्त तरी या मोफत धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे.जून महिन्यात पावसाला सुरूवात झाली की जिल्ह्यातील धानोरा, मुलचेरा, एटापल्ली, सिरोंचा, अहेरी आणि भामरागड या सहा तालुक्यातील २५३ गावांचा संपर्क तुटतो. अनेक नदी-नाल्यांवर पूल नसल्यामुळे कोणतेही वाहन त्या गावांमध्ये जाऊ शकत नाही. त्यामुळे नवसंजीवनी योजनेअंतर्गत त्या गावांमधील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील ७० हजार १३४ नागरिकांसाठी मे महिन्यातच जून ते सप्टेंबर या चार महिन्यांचा धान्यसाठा गावात पोहोचवून दिला जातो. यावर्षीही ते धान्य त्या गावांशी संबंंधित १२७ रास्त भाव दुकानांमध्ये पोहोचवण्यात आले.दरम्यान लॉकडाऊनच्या काळात एप्रिल ते जून या तीन महिन्यात मोफत देण्यात आलेले प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य (तांदूळ आणि गहू) आता जुलै ते सप्टेंबर या काळासाठीही देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यामुळे रेशन दुकानातून मिळणाऱ्या नियमित नियतनासोबतच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या ५ किलो मोफत धान्याचा लाभ अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना मिळणे गरजेचे आहे. पण पावसाळा सुरू झाल्यामुळे नवसंजीवनी योजनेतील २५३ गावांना आता ते ५ किलो मोफत धान्य कसे पोहोचविणार, अशी मोठी समस्या निर्माण झाली आहे. यावर प्रशासन कशा पद्धतीने तोडगा काढते याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.उशिरा आलेल्या आदेशामुळे अडचणनवसंजीवनी योजनेतील २५३ गावांना पावसाळा सुरू होण्याआधीच चार महिन्यांचा धान्य पुरवठा झाला आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत तीन महिने मोफत धान्य वाटपाचा आदेश जुलैच्या दुसºया आठवड्यात मिळाला. त्यामुळे त्या २५३ गावांना आता हे धान्य पुरवणे कठीण होणार आहे. तरीही शक्य तितक्या गावांना धान्य पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी व्ही.के.सहारे यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या