शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

२५१ वनहक्क दावे प्रलंबित

By admin | Updated: October 27, 2016 01:48 IST

तालुक्याच्या जारावंडी परिसरातील शेतकऱ्यांचे २५१ वनहक्क दावे प्रलंबित आहेत. वारंवार निवेदने व शासनाकडे पाठपुरावा करूनही दावे ...

शेतकऱ्यांचे एसडीओंना निवेदन : दावे निकाली न काढल्यास आंदोलन करणारएटापल्ली : तालुक्याच्या जारावंडी परिसरातील शेतकऱ्यांचे २५१ वनहक्क दावे प्रलंबित आहेत. वारंवार निवेदने व शासनाकडे पाठपुरावा करूनही दावे निकाली न निघाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी उपविभागीय अधिकारी एस. राममूर्ती यांना निवेदन सादर करून वनहक्क दावे निकाली काढण्याची मागणी केली. दावे निकाली न निघाल्यास आंदोलन करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. तालुक्यातील जारावंडी, दोलदा, दिंडवी, भापडा, जांभुळगट्टा, गर्तावाही, मंजिगड, इरपनपायली, मालेनगट्टा, हनपायली, वेडमागड, टेक्का, कसूरवाही, सरखेडा व वंडोली येथील शेतकरी नक्षलग्रस्त भागात वास्तव्य करून मागीत तीन पिढ्यांपासून वन जमिनीवर अतिक्रमण करून शेती करीत आहेत. महसूल विभाग, वन विभागात अतिक्रमित शेतकऱ्यांच्या नोंदी आहेत. सध्या या जमिनींवर शेतकरी पीक काढत आहेत. आपल्या कुटुंंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. त्यामुळे २५१ वनहक्क दावे तत्काळ निकाली काढावे, अशी मागणी तालुका शेतकरी संघटना जारावंडी-कसनसूरच्या वतीने करण्यात आली. राकाँचे प्रदेश उपाध्यक्ष माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम एटापल्ली दौऱ्यावर आले असता त्यांनासुद्धा तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन सादर करून प्रलंबित दावे तत्काळ निकाली काढण्याची मागणी करण्यात आली. निवेदन देताना तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हरिदास टेकाम, उपाध्यक्ष केशव पेदापल्लीवार, सचिव देविदास मोहुर्ले, सहसचिव जग्गू देहारी, धनराज गुरनुले, नसीरखॉ पठाण, रैजी पदा, लक्ष्मण चन्नेवार यांच्यासह शेतकरी बंडू नाईक, प्रेमसाय लकडा, बंडू हिचामी, सन्नू हिचामी, मल्लाजी येनगंटीवार, श्रावण कांबळे, प्रकाश गुरनुले, संपत चौधरी, नलेश मडावी, नाजू येरमे, देवाजी पोटावी, मनकू कातवो, बाजू नरोटे, जग्गू वड्डे, मयाराम हिचामी, नरसू नरोटे, सुरेश खलको, सोमा हलामी, कोरसे पावे, सीताराम नैैताम हजर होते.