शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

बारावीची परीक्षा रद्द, पदवीचे प्रवेश कसे हाेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:27 IST

सर्वप्रथम केंद्रीय परीक्षा मंडळाने बारावीची परीक्षा रद्द केली. त्यानंतर राज्याच्या परीक्षा मंडळानेही परीक्षा रद्द केली आहे. बारावीच्या परीक्षेनंतर विविध ...

सर्वप्रथम केंद्रीय परीक्षा मंडळाने बारावीची परीक्षा रद्द केली. त्यानंतर राज्याच्या परीक्षा मंडळानेही परीक्षा रद्द केली आहे. बारावीच्या परीक्षेनंतर विविध शाखांमध्ये प्रवेश घेतला जातो. त्यामुळे बारावीच्या परीक्षेला अत्यंत महत्त्व आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय आदी शाखांच्या प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी घेतली जाते. मात्र बी. एस्सी., बी. काॅम., बी.ए., बी.एस.डब्ल्यू. आदी अभ्यासक्रमांना प्रवेश देताना बारावीचे गुणच लक्षात घेतले जातात. परीक्षा रद्द झाल्याने सर्वांनाच भरमसाठी गुण मिळण्याची शक्यता असल्याने हुशार विद्यार्थ्यांचे फार माेठे नुकसान हाेणार आहे. कशापद्धतीने गुणदान केले जाते, याकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले आहे.

बाॅक्स

बाारावीनंतरच्या संधी

- बारावीनंतर विद्यार्थी विविध शाखांमध्ये त्याच्या आवडीनुसार प्रवेश घेतात, त्यामुळे बारावीच्या परीक्षेला विशेष महत्त्व आहे.

- बारावीनंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी शाखांना प्रवेश मिळतो.

- ग्रामीण भागातील विद्यार्थी बी.ए., बि.एस.डब्ल्यू., बी.काॅम., बी.एस्सी. आदी शाखांमध्ये प्रवेश घेऊन पदवीचे शिक्षण पूर्ण करतात.

काेट

इयत्ता १२ वीचा निकाल हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे निकाल तयार करताना अकरावीच्या गुणांसोबत विद्यार्थ्यांचे दहावीचे गुणसुद्धा विचारात घेणे गरजेचे आहे. ५० टक्के गुण दहावीचे घेण्यात यावेत व बाकी पन्नास टक्क्यांमध्ये अकरावी व शाळेच्या स्तरावरील गुण विचारात घेण्यात यावे. या पद्धतीने सर्वार्थाने निकाल तयार केल्यास त्यामध्ये हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.

डॉ. पंकज चव्हाण, प्राचार्य, श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालय, आष्टी

काेट

बारावीचे गुणदान करताना दहावीचे २५ गुण, अकरावीचे २५ गुण, ३० गुणांचे स्वाध्याय व २० गुणांची तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण विचारात घ्यावे. पदवीच्या प्रवेशाला बारावीच्या गुणांच्याआधारे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा. अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा इतर तांत्रिक अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र सीईटी घेतली जाते. यात बारावीच्या गुणांचा विचार हाेत नाही. मला बारावीमधे कमी गुण मिळाले, असे एखाद्या विद्यार्थ्याला वाटत असेल, तर शासनाने परिस्थिती सुरळीत झाल्यावर त्याची परीक्षा घ्यावी, जेणे करून त्याच्या मनात कोणताच संशय राहणार नाही.

दिलीप डांगे, प्राचार्य, विश्वशांती विद्यालय तथा ज्युनिअर काॅलेज, भेंडाळा

काेट

विद्यार्थी काय म्हणतात

काेराेनाचे संकट लक्षात घेता, बारावीची परीक्षा रद्द केली, हे जरी मान्य असले, तरी याेग्य पद्धतीने मूल्यांकन करून हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान हाेणार नाही, याची खबरदारी परीक्षा मंडळ व शिक्षकांनी घेण्याची गरज आहे.

सचिन बारापात्रे, विद्यार्थी

बारावीच्या परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळावे, यासाठी आपण वर्षभर अभ्यास केला. ऑनलाईन पद्धतीने शिकून अभ्यासक्रम समजून घेताना अनेक अडचणी येत हाेत्या. तरीही अभ्यास केला. परीक्षा देऊन जे गुण मिळाले असते त्या निकालाचा आनंद काही वेगळाच असता.

हेमंत मडावी, विद्यार्थी

बारावीतील एकूण विद्यार्थी

मुले - ६७९८

मुली - ६४३०