शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय; अंतिम फेरीत पटकावले स्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 9:03 PM

स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने पाकिस्तानला 3-1 असे नमवत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला.

ठळक मुद्दे सामन्याच्या 48व्या मिनिटाला भारताच्या महावीर सिंगने गोल करत भारताच्या गोलचे खाते उघडले.

बांगलादेश : भारताने आज पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तावर दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. बांगलादेशमध्ये सॅफ फुटबॉल स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतानेपाकिस्तानला 3-1 असे नमवत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत अकराव्यांदा प्रवेश केला आहे, त्याबरोबर या स्पर्धेचे जेतेपद भारताने आतापर्यंत सातवेळा पटकावले आहे.

 

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशनची (सॅफ) स्पर्धेची उपांत्य  फेरी झाली.  या सामन्याच्या पहिल्या अर्ध्या तासामध्ये दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले होते. पण सामन्याच्या 48व्या मिनिटाला भारताच्या महावीर सिंगने गोल करत भारताच्या गोलचे खाते उघडले. त्यानंतर पुन्हा एकदा महावीरने गोल करत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. सुमीत पासीने भारतासाठी तिसरा गोल करत संघाला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली. पण त्यानंतर पाकिस्तानच्या हसन बशिरने गोल केला. पाकिस्तानचा हा पहिला गोल होता आणि तरीही ते पिछाडीवर होते.

बांगलादेशच्या बंगबंधू स्टेडियम येथे हा सामना झाला. भारताला एकाही साखळी सामन्यात पराभव स्वीकारावा लागला नाही. 

साखळी सामन्यात अपराजित राहिल्यामुळे या स्पर्धेच्या 'ब' गटामध्ये भारतीय संघ अव्वल स्थानी होता. या गटामध्ये श्रीलंका आणि मालदीव या संघांचा सहभाग होता.

टॅग्स :FootballफुटबॉलIndiaभारतPakistanपाकिस्तान