शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तानविरुद्ध भारताला विजयाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 04:17 IST

फिफा विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरीत महत्वाच्या सामन्यात भारतीय संघ गुरुवारी अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजय नोंदविण्याच्या प्रतिक्षेत आहे.

दुशाम्बे (ताजिकिस्तान): फिफा विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरीत महत्वाच्या सामन्यात भारतीय संघ गुरुवारी अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजय नोंदविण्याच्या प्रतिक्षेत आहे. ई गटात समावेश असलेल्या भारताकडे केवळ दोन गुण असून गुणतालिकेत चौथ्या स्थानी असलेल्या संघाला अद्याप विजयाची चव चाखता आलेली नाही. पुढील फेरी गाठण्यासाठी संघाला विजयाची गरज असेल. पराभव झाला तर मात्र पुढील फेरीची आशा संपुष्टात येईल. युद्धजन्य अफगाणने मायदेशातील सामन्यासाठी ताजाकिस्तानच्या दुशाम्बे शहराची निवड केली हे विशेष.भारताने पात्रता फेरीची सुरुवात ओमानविरुद्ध मिळालेल्या १-२ या पराभवासह केली होती. त्यानंतर सप्टेंबरमध्ये दोहा येथे आशियाई चॅम्पियन कतारला गोलशून्यने बरोबरीत रोखले. दोन्ही सामन्यातील कामगिरीमुळे भारतीय संघाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, तथापि १५ आॅक्टोबर रोजी कोलकाता येथे शेजारी बांगला देशविरुद्धचा सामना १-१ असा बरोबरीत सुटताच उत्साहावर विरजण पडले. प्रतिस्पर्धी संघाकडून आदिलखान याने ८८ व्या मिनिटाला हेडरवर गोल नोंदवून सॉल्टलेकवर उपस्थित भारतीय चाहत्यांच्या उत्साहावर पाणी फेरले होते. अफगाण संघ फिफा क्रमवारीत १४९ व्या तर भारत १०६ व्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानने गटात एक विजय आणि दोन पराभवांसह तिसरे स्थान पटकावले.भारतीय प्रशिक्षक इगोर स्टीमक कुठल्याही स्थितीत सामना गमविण्याच्या विचारात नाहीत. स्टीमक म्हणाले, ‘संघाने कामगिरीच्या बळावर कुठल्याही स्थितीत येथे विजय मिळवायलाच हवा.’ हा सामना अत्यंत थंड वातावरणात कृत्रिम टर्फवर खेळला जाणार असल्याने स्टीमक यांच्या अडचणीत भर पडली. भारतीय खेळाडू अशा परिस्थितीश्ी एकरुप नाहीत. येथील तापमान शून्यापर्यंत असते. (वृत्तसंस्था)>रेकॉर्ड भारताच्या बाजूने...रेकॉर्डवर नजर टाकल्यास भारताचे पारडे अफगाणिस्तावर जड आहे. उभय संघ ८ वेळा परस्परांविरुद्ध खेळले. त्यातील ६ सामने भारताने जिंकले. एक सामना अफगाणिस्तानने जिंकला तर एक सामना अनिर्णीत राहीला होता. उभय संघ २०१३ च्या सॅफ गेममध्ये अखेरचा सामना खेळले. त्यावेळी अफगाणिस्तान संघ २-० ने विजयी ठरला होता. अफगाण संघाने मागच्या गटातील सामन्यात बांगला देशवर १-० ने मात केली होती. तथापि ओमानकडून त्यांचा ०-३ ने आणि कतारकडून ०-६ ने पराभव झाला होता. अफगाणिस्तानकडून सर्वाधिक ४८ आंतरराष्टÑीय सामने खेळणारा हारुन आमिरी हा भारतीय खेळाडूंसाठी परिचित आहे. तो इंडियन सुपर लीगसाठी २०१४ मध्ये गोव्याकडून खेळला. यंदा तो आय लीगमध्ये गोकुलम केरळ एफसीचा खेळाडू होता.>बांगला देशविरुद्ध ज्या चुका झाल्या त्या टाळून सहकाऱ्यांना संधीचा लाभ घ्यावा लागेल. भारताचा बचाव फळीतील खेळाडू अनस इडाथेडिका याच्या आईचे निधन झाल्यामुळे तो भारतात परतला आहे. याश्विाय रॉलिन बोंर्जेस हा जखमी आहे. - सुनील छेत्री