शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

विश्वचषक पात्रता स्पर्धा; ‘त्या’ वादग्रस्त गोलची चौकशी करा! भारतीय फुटबॉल महासंघाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 06:25 IST

Football World Cup Qualifiers: कतारविरुद्ध मंगळवारी दोहा येथे भारतीय संघ फिफा विश्वचषक फुटबॉलच्या पात्रता फेरीच्या निर्णायक सामन्यात १-२ ने पराभूत झाला. सामन्यादरम्यान दक्षिण कोरियाचे रेफ्री किम वू सुंग यांनी एक वादग्रस्त गोल यजमान संंघाच्या बाजूने योग्य ठरविला होता.

नवी दिल्ली - कतारविरुद्ध मंगळवारी दोहा येथे भारतीय संघ फिफा विश्वचषक फुटबॉलच्या पात्रता फेरीच्या निर्णायक सामन्यात १-२ ने पराभूत झाला. सामन्यादरम्यान दक्षिण कोरियाचे रेफ्री किम वू सुंग यांनी एक वादग्रस्त गोल यजमान संंघाच्या बाजूने योग्य ठरविला होता. याविरुद्ध अखिल भारतीयफुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) अध्यक्ष कल्याण चौबे यांनी बुधवारी सविस्तर तपास करण्याची मागणी केली. 

‘संबंधित अधिकाऱ्यांनी या अन्यायावर तोडगा काढावा,’ असे चौबे म्हणाले. ते पुढे म्हणाले, ‘जय- पराजय खेळाचा भाग आहेत. आम्ही तो नम्रपणे स्वीकारतो. पण कालच्या गोलवर बराच वाद झाला. यामुळे २०२६ च्या स्पर्धेसाठी भारत तिसऱ्या पात्रता फेरीपासून वंचित राहणार आहे. अन्यायाविरुद्ध मी फिफा पात्रता फेरी प्रमुख, एएफसी रेफ्री समिती प्रमुख व सामना आयुक्तांना रेफ्रीच्या गंभीर चुकीबाबत लिहिले. सर्वांनी वादग्रस्त गोलची चौकशी करायला हवी. फिफा व एएफसी योग्य पाऊल उचलतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे.’

नेमके काय घडले...७३ व्या मिनिटाला अब्दुल्लाह अलाहरकच्या फ्री किकवर युसेफ आयमेन याने हेडरचा प्रयत्न केला. हा प्रयत्न भारतीय कर्णधार व गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधूने हाणून पाडला. यावेळी गुरप्रीत खाली पडला, तर चेंडू मैदानाबाहेर गेला. हाशमी हुसेनने किक मारून चेंडू पुन्हा मैदानात आणला. त्यावर आयमेनने गोल नोंदविला. गुरप्रीतचा संपर्क झाल्यानंतर चेंडू मैदानाबाहेर गेल्यामुळे खेळ थांबवून कतारला कॉर्नर किक मिळणे अपेक्षित होते. पण रेफ्रीने असे केले नाही.

नियम काय सांगतो...नियमानुसार चेंडू ‘गोल लाइन किंवा टचलाइन’पासून बाहेर गेल्यास मैदानाबाहेर गेल्याचे मानले जाते. भारतीय संघाचे ५६ वर्षांचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमक यांनी हा निर्णय पक्षपाती असल्याची टीका केली. हा अन्याय असून यामुळे आमचा स्वप्नभंग झाला, असेही ते म्हणाले. कर्णधार गुरप्रीतनेही रेफ्रीचा हा निर्णय अतिशय दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :FootballफुटबॉलIndiaभारतQatarकतार