शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

रिकाम्यापोटी 'ही' फळं खाणं शरीरासाठी ठरतं घातक!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 2:21 PM

हेल्दी राहण्यासाठी आहारामध्ये फळांचा समावेश करा असे आपल्याला नेहमी सांगण्यात येत. परंतु, फळं नेमकी कधी खावीत याबाबत सावधानता राखणं गरजेचं आहे.  असे न केल्यानं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.

हेल्दी राहण्यासाठी आहारामध्ये फळांचा समावेश करा असे आपल्याला नेहमी सांगण्यात येत. परंतु, फळं नेमकी कधी खावीत याबाबत सावधानता राखणं गरजेचं आहे.  असे न केल्यानं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. सगळ्या फळांमध्ये मोठया प्रमाणात शरीरासाठी आवश्यक असे पोषक घटक असतात. पण अशीही काही फळं आहेत जी अनोशापोटी खाल्यानं त्यातील पोषक घटक शरीरासाठी हानिकारक ठरतात. गोड फळं जर अनोशापोटी खाल्ली तर शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. यामुळे मधुमेहाचा धोका संभवतो. जाणून घेऊयात अशा फळांबाबत जी सकाळी अनोशापोटी खाल्यानं शरीराला नुकसान पोहोचवतात. 

आंबा

आहारतज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, कधीही रिकाम्या पोटी आंबा खाणं महागात पडू शकतं. आंब्यामध्ये साखरेचं प्रमाण मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे अनोशापोटी आंबा खाल्यानं साखर थेट रक्तात मिसळते. 

पेर

पेर या फळामध्ये कच्च्या फायबरचे प्रमाण जास्त असते. रिकाम्यापोटी पेर खाल्यानं पोटातील नाजूक अवयवांवर याचा परिणाम होऊन त्यांना इजा पोहचू शकते. त्यामुळे पचनक्रियेवर परिणाम होऊ सकतो. 

केळं 

केळीचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. परंतु केळी अनोशापोटी खाल्यानं शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकते. केळ्यामध्ये मॅग्नेशिअमचे प्रमाण अधिक असते. ते थेट रक्तामध्ये मिसळते. असे होणे हृदयासाठी घातक असते.

द्राक्ष

द्राक्ष एक सायट्रस फळ आहे. यामध्ये अॅसिडची मात्रा अधिक असते. अॅसिड असलेली फळं अधिक प्रमाणात खाल्यानं जठराचा अल्सर आणि पोटात जळजळ सारख्या समस्या होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोटात गॅससारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर हार्ट अटॅकचाही धोका संभवतो.

लिची 

लिची हे शरीरासाठी अत्यंत लाभदायक पदार्थ आहे. पण जर याचे सेवन रिकाम्यापोटी केलं तर शरीरातील साखरेचं प्रमाण वाढते. त्यामुळे पोटात गॅसची समस्या वाढते. त्यामुळे पोटात वेदना होऊ शकतात. 

टॉमेटो

टॉमेटोमध्ये मोठ्या प्रमाणावर टॅनिक अॅसिड आढळते. रिकाम्या पोटी टॉमोटो खाल्यानं पोटातील आम्लाचं प्रमाण वाढतं. त्यामुळे पोटात अल्सर होण्याची शक्यता वाढते. 

टॅग्स :foodअन्नHealthआरोग्य