शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

जास्त पाव खाणं पडू शकतं महागात, जाणून घ्या होणाऱ्या समस्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 11:35 AM

देशभरातील प्रत्येक शहरात आणि गावागावात वडापाव, भुर्जीपाव किंवा आणखी काही पाव असलेले पदार्थ चवीने खाल्ले जातात.

वडापाव म्हटलं की मुंबई हे चित्र आता बदललं आहे. देशभरातील प्रत्येक शहरात आणि गावागावात वडापाव, भुर्जीपाव किंवा आणखी काही पाव असलेले पदार्थ चवीने खाल्ले जातात. याची चव चांगली असली आणि याने भूक भागवली जात असली तरी पावाचे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम बघायला मिळतात. हे दुष्परिणाम सुरुवातील जरी दिसले नाही तरी नंतर ते दिसू लागतात. पाव खाल्लाने कोणत्या समस्या होतात, हे खालीलप्रमाणे जाणून घेता येईल.  

रक्तातील शुगर वाढते – पावामधील रिफाईन्ड साखर मेटॅबॉलिझमच्या कार्यावर परिणाम करते. तसेच स्वादूपिंडातून अधिक इन्सुलिन शोषले जाते. त्यामुळे रक्तातील साखर एकाएकी वाढते.

गॅसची समस्या – वडापाव किंवा यासारखे जंकफूडमध्ये लॅक्टोज अधिक असल्याने ब्लोटींगचा त्रास किंवा गॅसची समस्या होण्याचा धोका अधिक असतो. यामधील ग्ल्युटेन असल्याने ते पचायलाही जड असते. पावाचे पदार्थ खाल्ल्याने ते पचायला काही वेळेस तीन दिवसही लागू शकतात.

वजन वाढतं – पावामध्ये अतिप्रमाणात साखर किंवा फ्रुक्टोज कॉर्न सिरप असतं. यामुळे कॅलरीज वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे नेहमी पावासओबत वडा, समोसा खाण्याची सवय तुम्हांला लठ्ठ बनवू शकते. 

पोषणद्रव्यांचा अभाव – पावामधून पोषणद्रव्य मिळण्याची शक्यता कमी असते. पावामधून फायबर, व्हिटॅमिन किंवा मिनरल्स मिळत नाहीत. अधिक हेल्दी बनवण्यासाठी वडापाव किंवा भुर्जीपाव घरीच तयार करा. पावाऐवजी गव्हाचा ब्रेड किंवा मल्टीग्रेन पावासोबत खा.

अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन वाढते – पाव बनवताना त्यामध्ये काही एन्झाईम्स मिसळली जातात. यामुळे पाव अधिक दिवस टिकतो तसेच तो मऊ राहतो. मात्र यामुळे अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शनचा धोका वाढतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य