शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांचा फोन येताच उमेदवारी घेतली मागे! बंडखोरी रोखण्यात भाजपला यश; उद्धवसेना मात्र अपयशी
2
तब्बल ६६ नगरसेवक बिनविरोध; भाजपचे सर्वाधिक ४३, शिंदेसेनेचे १९; ...तर आयोग करणार तपास
3
मनधरणी, तणाव अन् खून...! मुंबईत भाजप-शिंदेसेनेची ठाकरे बंधूंशी थेट लढत, ठाण्यात ७, कल्याण-डोंबिवलीत २०, भिवंडीत ६ उमेदवार बिनविरोध
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ जानेवारी २०२६ : दिवस अत्यंत आनंददायी, पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल!
5
सोलापूर हादरले : ‘बिनविरोध’साठी झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहराध्यक्षाचा भरदिवसा खून
6
बिनविरोधचे हसू अन् बंडखोरीचे आसू; महामुंबईतील मोजके बंडखोरही सत्ताधाऱ्यांचेच; अनेकांनी घेतली माघार
7
राज्यात फक्त अन् फक्त मराठीच सक्तीची! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी स्पष्टोक्ती  
8
धक्कादायक! नागपुरात १२ वर्षीय मुलाला आई-वडिलांनीच साखळी कुलपाने बांधून ठेवले 
9
मराठी दलित साहित्य हा भारतीय साहित्यविश्वाचा आधारस्तंभ - मृदुला गर्ग  
10
मराठी शाळा टिकव्यात, इथेच ज्ञानेश्वर-तुकोबा घडतील; विश्वास पाटील यांचे प्रशासकीय उदासीनतेवर बोट
11
कृतिशील, निर्मितीशील असणे हेच जीवनाचे इतिवृत्त - तारा भवाळकर
12
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
13
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
14
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
15
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
16
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
17
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
18
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
19
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
20
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपटात वापरलेले कपडे आणि वस्तु नंतर कुठे जातात ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 15:50 IST

चित्रपटात शुटींगदरम्यान वापरलेल्या वस्तु आणि कपडे नंतर नेमके कुठे जातात , हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे.

ठळक मुद्देचित्रपटांत कलाकरांनी घातलेल्या कपड्यांची चित्रपट प्रदर्शित झाल्यावर फॅशन बनते.त्यानंतर दुसरा चित्रपट आला की त्या चित्रपटातील फॅशन बाजारात इन होते. हे कपडे एकदा का कलाकारांनी वापरून झाले की त्यातील काही प्रोडक्शन हाऊसच्या गोदाममध्ये पडून राहतात.

मुंबई : बॉलिवूड चित्रपटातील भरजरी कपडे पाहून तुमचेही डोळे फिरत असतील ना. प्रत्येक चित्रपटांमधून एक वेगवेगळी फॅशन बाहेर येत असते. घूमरच्या गाण्यातील दिपीका पदुकोणचा लेहेंगाही आता फार प्रसिद्ध झालाय. अशा बिग बजेट चित्रपटातील हे उंची कपडे पुन्हा कोण वापरत असतील असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल. कारण हे कपडे पुन्हा कोणत्याच चित्रपटात किंवा कोणतीच अभिनेत्री पुन्हा परिधान करताना दिसत नाही. मग हे एवढ्या महागातले डिझायनर्स कपड्याचं होतं तरी काय? याच प्रश्नाचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. 

चित्रपटांत कलाकरांनी घातलेले कपडे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्याची फॅशन बनते. कलाकारांचे चाहते त्या चित्रपटातील फॅशनचं अनुकरण करतात. दुसरा चित्रपट आला की त्या चित्रपटातील फॅशन बाजारात इन होते. पण कलाकारांचे हे कपडे चित्रपट संपला की कुठे जात असेल? राज फिल्म्सच्या डिझायनर्स आएशा खन्ना यांनी ह्युमन बिंग या संकेतस्थळाने घेतलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, हे कपडे एकदा का कलाकारांनी वापरून झाले की ते प्रोडक्शन हाऊसच्या गोदाममध्ये पडून राहतात.

या कपड्यांवर ज्या नायिकेने कपडे परिधान केले होते  त्यांच्या नावाचं लेबल लावलं जातं. तसंच, मुख्य नायिका, सहाय्यक नायिका असंही लेबल त्यावर लावलं जातं. नंतर हेच कपडे प्रोडक्शन हाऊसच्या पुढच्या प्रकल्पात म्हणजेच पुढच्या चित्रपटात वापरली जातात. अर्थात या कपड्यांची थोडी फार डिझाइन्स बदलली जातात. जेणेकरून प्रेक्षकांना हे कपडे आधीच्या चित्रपटात वापरले आहेत याची कल्पनाही येत नाही. 

तुम्हाला ऐश्वर्या रायचा ‘कजरारे’ हे गाणं आठवतंय? या गाण्यावेळी तिने जे कॉस्च्यूम परिधान केले होते, तेच कपडे 2010 साली प्रदर्शित झालेला बँड बाजा बारात या चित्रपटातील एका गाण्यातील बॅकग्राऊंड नृत्यांगणाने परिधान केले होते, पण हे कोणाच्याच लक्षात आलं नाही. 

एखाद्या चित्रपटातील कपडे जर अभिनेत्रीला आवडली तर ते कोणालाही न विचारता सरळ घेऊनही जातात. बरं याचाही खर्च चित्रपटाच्या बजेटमधूनच केला जातो. कधी-कधी या कपड्यांचा लिलाव केला जातो आणि लिलावातून येणारे पैसे सामाजिक संस्थाना दिले जातात. 

‘जिने के है चार दिन’ या गाण्यात सलमान खानने जो टॉवेल वापरला होता, त्या टॉवेलचा लिलाव केल्यावर लाखो रुपये मिळाले होते.

त्यानंतर लगानमध्ये आमिर खानने जी बॅट वापरली होती, ती बॅटही लाखो रुपयात विकली गेली होती. हे सगळे पैसे सामाजिक संस्थाना दिले जातात असं सांगण्यात येतं. 

कपड्यांचा सार्वाजानिक लिलाव झाला पाहिजे अशी संकल्पना फार पूर्वीपासून आहे. त्यामुळे ही संकल्पना लवकरच प्रत्येक प्रोडक्शन हाऊसने प्रत्यक्षात आणली पाहिजे अशी अपेक्षा सगळ्याच डिझायनर्सकडून केली जातेय. 

आणखी वाचा - या मुलाकडे आहे १ मिलिअन डॉलर्सचं शूज् कलेक्शन

टॅग्स :bollywoodबॉलीवूडSalman Khanसलमान खानAamir Khanआमिर खानAishwarya Rai Bachchanऐश्वर्या राय बच्चनfashionफॅशन