शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

चित्रपटात वापरलेले कपडे आणि वस्तु नंतर कुठे जातात ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 15:50 IST

चित्रपटात शुटींगदरम्यान वापरलेल्या वस्तु आणि कपडे नंतर नेमके कुठे जातात , हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे.

ठळक मुद्देचित्रपटांत कलाकरांनी घातलेल्या कपड्यांची चित्रपट प्रदर्शित झाल्यावर फॅशन बनते.त्यानंतर दुसरा चित्रपट आला की त्या चित्रपटातील फॅशन बाजारात इन होते. हे कपडे एकदा का कलाकारांनी वापरून झाले की त्यातील काही प्रोडक्शन हाऊसच्या गोदाममध्ये पडून राहतात.

मुंबई : बॉलिवूड चित्रपटातील भरजरी कपडे पाहून तुमचेही डोळे फिरत असतील ना. प्रत्येक चित्रपटांमधून एक वेगवेगळी फॅशन बाहेर येत असते. घूमरच्या गाण्यातील दिपीका पदुकोणचा लेहेंगाही आता फार प्रसिद्ध झालाय. अशा बिग बजेट चित्रपटातील हे उंची कपडे पुन्हा कोण वापरत असतील असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल. कारण हे कपडे पुन्हा कोणत्याच चित्रपटात किंवा कोणतीच अभिनेत्री पुन्हा परिधान करताना दिसत नाही. मग हे एवढ्या महागातले डिझायनर्स कपड्याचं होतं तरी काय? याच प्रश्नाचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. 

चित्रपटांत कलाकरांनी घातलेले कपडे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्याची फॅशन बनते. कलाकारांचे चाहते त्या चित्रपटातील फॅशनचं अनुकरण करतात. दुसरा चित्रपट आला की त्या चित्रपटातील फॅशन बाजारात इन होते. पण कलाकारांचे हे कपडे चित्रपट संपला की कुठे जात असेल? राज फिल्म्सच्या डिझायनर्स आएशा खन्ना यांनी ह्युमन बिंग या संकेतस्थळाने घेतलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, हे कपडे एकदा का कलाकारांनी वापरून झाले की ते प्रोडक्शन हाऊसच्या गोदाममध्ये पडून राहतात.

या कपड्यांवर ज्या नायिकेने कपडे परिधान केले होते  त्यांच्या नावाचं लेबल लावलं जातं. तसंच, मुख्य नायिका, सहाय्यक नायिका असंही लेबल त्यावर लावलं जातं. नंतर हेच कपडे प्रोडक्शन हाऊसच्या पुढच्या प्रकल्पात म्हणजेच पुढच्या चित्रपटात वापरली जातात. अर्थात या कपड्यांची थोडी फार डिझाइन्स बदलली जातात. जेणेकरून प्रेक्षकांना हे कपडे आधीच्या चित्रपटात वापरले आहेत याची कल्पनाही येत नाही. 

तुम्हाला ऐश्वर्या रायचा ‘कजरारे’ हे गाणं आठवतंय? या गाण्यावेळी तिने जे कॉस्च्यूम परिधान केले होते, तेच कपडे 2010 साली प्रदर्शित झालेला बँड बाजा बारात या चित्रपटातील एका गाण्यातील बॅकग्राऊंड नृत्यांगणाने परिधान केले होते, पण हे कोणाच्याच लक्षात आलं नाही. 

एखाद्या चित्रपटातील कपडे जर अभिनेत्रीला आवडली तर ते कोणालाही न विचारता सरळ घेऊनही जातात. बरं याचाही खर्च चित्रपटाच्या बजेटमधूनच केला जातो. कधी-कधी या कपड्यांचा लिलाव केला जातो आणि लिलावातून येणारे पैसे सामाजिक संस्थाना दिले जातात. 

‘जिने के है चार दिन’ या गाण्यात सलमान खानने जो टॉवेल वापरला होता, त्या टॉवेलचा लिलाव केल्यावर लाखो रुपये मिळाले होते.

त्यानंतर लगानमध्ये आमिर खानने जी बॅट वापरली होती, ती बॅटही लाखो रुपयात विकली गेली होती. हे सगळे पैसे सामाजिक संस्थाना दिले जातात असं सांगण्यात येतं. 

कपड्यांचा सार्वाजानिक लिलाव झाला पाहिजे अशी संकल्पना फार पूर्वीपासून आहे. त्यामुळे ही संकल्पना लवकरच प्रत्येक प्रोडक्शन हाऊसने प्रत्यक्षात आणली पाहिजे अशी अपेक्षा सगळ्याच डिझायनर्सकडून केली जातेय. 

आणखी वाचा - या मुलाकडे आहे १ मिलिअन डॉलर्सचं शूज् कलेक्शन

टॅग्स :bollywoodबॉलीवूडSalman Khanसलमान खानAamir Khanआमिर खानAishwarya Rai Bachchanऐश्वर्या राय बच्चनfashionफॅशन