नाना संगे आमीरलाही शेतीची काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 01:58 IST2016-02-19T08:58:18+5:302016-02-19T01:58:18+5:30

पानी फाऊंडेशन’ मार्फत ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ ही मोहिम सुरू केली आहे.

Nana Sange Aamir is also concerned about agriculture | नाना संगे आमीरलाही शेतीची काळजी

नाना संगे आमीरलाही शेतीची काळजी

वेदनशील अभिनेता आमीर खानने महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त शेतकºयांना दिलासा देण्यासाठी आपल्या ‘पानी फाऊंडेशन’ मार्फत ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ ही मोहिम सुरू केली आहे. दुष्काळाने होरपळून निघालेल्या शेतकºयांना मदत आणि पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारच्या सहायाने त्याने ही मोहिम हाती घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित झालेल्या पत्रकार परिषद परिषदेत त्याने ही माहिती दिली.

यावेळी त्याने नाना पाटेकर ‘नाम फाऊंडेशन’मार्फत करत असलेल्या प्रयत्नांचे तोंडभरून कौतुक करताना म्हटले की, नानाच्या कार्यातून प्रेरित होऊन लवकरच मी सुद्धा शेतकºयांना मदत करण्याचे ठरविले आहे. समाजातील ज्वलंत प्रश्नांबद्दल त्याला असलेली जाणीव खरोखरच खूप प्रेरणादायी आहे. त्यातूनच ‘सत्यमेव जयेत वॉटर कप’ या प्रोजेक्टचा उगम झाला. 

तो पुढे म्हणाला, ‘आज नानाला भेटून मी याविषयी त्यांच्याशी बोलणार आहे. नुकताच त्यांच्या नटसम्राट चित्रपट मी पाहिले. अभिनयाचे सर्वोत्कृष्ट उदाहरण असेच मी त्याचे वर्णन करेन. पडद्यावर आणि रिअल लाईफमध्येही ते हीरो आहे. त्यांच्या या समाजपयोगी कार्यात आपण सर्वांना सहभागी झाले पाहिजे.’

Web Title: Nana Sange Aamir is also concerned about agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.