विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक दुफळी नुकसानकारक ठरेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 04:03 IST2016-02-18T11:03:02+5:302016-02-18T04:03:02+5:30
दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात देशविरोधी घोषणा कोणी दिल्या याबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अर्थात एबीव्हीपी विरुद्ध अन्य विद्यार्थी संघटना यांच्यात वाद रंगला आहे. जेएनयू वादाचे पडसाद आता देशभर उमटायला लागले आहेत. विद्यार्थी घडविणाºया संस्थेत असे राजकारणाचे डावपेच खेळले जात आहेत. हा घाणेरडा प्रकार बघून विद्यार्थीही स्तब्ध झाले आहेत. या प्रकरणात कुणी दोषी असेल तर त्याला खुशाल शिक्षा करावी. परंतु पुर्वाग्रह ठेवून वा सुडापोटी विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळू नये, असा एक मतप्रवाह आहे. तर देशात राहून देशविरोधी कारवाया कशा खपवून घ्यायच्या, अशा प्रश्न काहींनी उपस्थित केला आहे. या निमित्ताने सीएनएक्सने शहरातील विद्यार्थ्यांशी चर्चा केली. यावेळी या विद्यार्थ्यांनी अगदी सडेतोड प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या आंदोलनावरून देशभरात राजकीय, सामाजिक पातळीवर चर्चा सुरू आहेत, पण आता एका तपास संस्थेने याबाबत दिलेली माहिती जरा वेगळी आहे. ज्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो विद्यार्थी नेता कन्हैयाने देशविरोधी नारे लावलेच नाहीत असे यात म्हटले आहे. यावरून हा वाद आणखी चिघळला असून या विषयावरून देशातील माहोल बिघडवला जात असल्याचा आरोप करीत देशभरातील विद्यार्थी संघटना मैदानात उतरल्या आहेत. यावरून विद्यार्थ्यांमध्येही वैचारिक दुफळी निर्माण होत असून ती देशहिताची नाही, याकडे शहरातील तरुणाईने लक्ष वेधले आहे. विद्यार्थ्यांचे करिअर बिघडू नये जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी घोषणा कुणी दिल्या असतील असे मला वाटत नाही. यात काही तरी षडयंत्र आहे. नाही तर हा वाद इतका चिघळलाच नसता. परंतु अजूनही स्थिती हाताबाहेर गेलेली नाही. त्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण जर हा वाद अधिक चिघळला तर याचे परिणाम नक्कीच वाईट असतील. विद्यार्थ्यांच्या करिअरवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. - नताशा पाटील याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य कसे म्हणणार? काही विद्यार्थ्यांनी खरचं देशविरोधी नारे लावले असतील तर हे योग्य नाही. याकूब मेमन व अफजल गुरूच्या फाशीला विरोध करीत ते भारताच्या संविधानाचा अपमान करीत आहेत. याला अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणता येणार नाही. अशी विचारसरणी कायद्याचा भंग करणारी आहे. कुठल्याही परिस्थिीत कायद्याचे पालन झालेच पाहिजे. ते झाले नाही तर सामाजिक आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होईल. - निलम काकडे आपल्या सोयीने विरोध करणे योग्य नाही ेजेएनयूमध्ये अनेकदा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा व आंदोलने होत असल्याचे आपण बघत असतो. यापूर्वी काहींनी नक्षलवाद्यांचे समर्थन केल्याच्या बातम्या आल्या होत्या. येथे कधी २६/११ वा पठाणकोट हल्ल्याच्या विरोधात आंदोलने झाल्याचे ऐकिवात नाही. अशी दुहेरी भूमिका नको. जी गोष्ट चूक आहे तिला विरोध व्हायलाच हवा. आपल्या सोयीने विरोध करणे योग्य नाही. - अंजलि कोडवानी प्रत्येकाला विचार मांडण्याचा अधिकार या प्रकरणी कुलगुरूंनी पुढाकार घेऊन प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचे सोडून दबावाखाली येऊन पूर्वग्रहाने कारवाई केली जात असल्याचे चित्र दिसत आहे. देशविरोधी नाºयाचे मी समर्थन करीत नाही. परंतु प्रत्येक नागरिकाला आपले विचार मांडण्याचा हक्क आहे. जेएनयूचे विद्यार्थी जर काही विधायक बाबींकडे लक्ष वेधत असतील तर कोणतेही सरकार विद्यार्थ्यांना त्यांची मते मांडण्यापासून रोखू शकत नाही. विद्यार्थी संघटनांच्या राजकारण, संवाद व वैचारिक वादातूनच तरुणांमध्ये लोकशाही मूल्ये रुजत असतात. - अनुपम करांगळे उद्याच्या स्वर्णिम भारताच्या स्वप्नाचे काय? जेएनयूमध्ये सध्या जे काही घडत आहे ते फारच वाईट आहे. जेएनयूच्या काही विशिष्ट विद्यार्थ्यांना निशाण्यावर धरले जात आहे. हे योग्य नाही. विद्यापीठातील या वादाचे कुणी राजकारण करू नये. या प्रकरणाला वेगळे वळण का देण्यात येत आहे हे कळत नाही. शिकायच्या वयात विद्यार्थी असे कारागृहात जाणार असतील तर या देशाने पाहिलेल्या स्वर्णिम भारताचे स्वप्न कसे साकार होईल? - शुभम मानकर त्वरित निपटारा होणे गरजेचे या प्रकरणात आतापर्यंत दोषी आढळलेल्या विद्यार्थांवर कारवाई होऊन याचा निपटारा होणे आवश्यक होते. विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खेळ होऊ नये. लवकारत लवकर या प्रकरणावर तोडगा निघायला हवा. विद्यार्थी घडविणाºया संस्थेत जर अशा प्रकारे घाणेरडे राजकारण होत असेल तर त्याचा परिणाम इतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर देखील पडू शकतो. हे राजकारण करणाºयांनी लक्षात घ्यायला हवे. - तेजस बन्सोड

विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक दुफळी नुकसानकारक ठरेल
िल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात देशविरोधी घोषणा कोणी दिल्या याबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अर्थात एबीव्हीपी विरुद्ध अन्य विद्यार्थी संघटना यांच्यात वाद रंगला आहे. जेएनयू वादाचे पडसाद आता देशभर उमटायला लागले आहेत. विद्यार्थी घडविणाºया संस्थेत असे राजकारणाचे डावपेच खेळले जात आहेत. हा घाणेरडा प्रकार बघून विद्यार्थीही स्तब्ध झाले आहेत. या प्रकरणात कुणी दोषी असेल तर त्याला खुशाल शिक्षा करावी. परंतु पुर्वाग्रह ठेवून वा सुडापोटी विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळू नये, असा एक मतप्रवाह आहे. तर देशात राहून देशविरोधी कारवाया कशा खपवून घ्यायच्या, अशा प्रश्न काहींनी उपस्थित केला आहे. या निमित्ताने सीएनएक्सने शहरातील विद्यार्थ्यांशी चर्चा केली. यावेळी या विद्यार्थ्यांनी अगदी सडेतोड प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
या आंदोलनावरून देशभरात राजकीय, सामाजिक पातळीवर चर्चा सुरू आहेत, पण आता एका तपास संस्थेने याबाबत दिलेली माहिती जरा वेगळी आहे. ज्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो विद्यार्थी नेता कन्हैयाने देशविरोधी नारे लावलेच नाहीत असे यात म्हटले आहे. यावरून हा वाद आणखी चिघळला असून या विषयावरून देशातील माहोल बिघडवला जात असल्याचा आरोप करीत देशभरातील विद्यार्थी संघटना मैदानात उतरल्या आहेत. यावरून विद्यार्थ्यांमध्येही वैचारिक दुफळी निर्माण होत असून ती देशहिताची नाही, याकडे शहरातील तरुणाईने लक्ष वेधले आहे.
विद्यार्थ्यांचे करिअर बिघडू नये
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी घोषणा कुणी दिल्या असतील असे मला वाटत नाही. यात काही तरी षडयंत्र आहे. नाही तर हा वाद इतका चिघळलाच नसता. परंतु अजूनही स्थिती हाताबाहेर गेलेली नाही. त्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण जर हा वाद अधिक चिघळला तर याचे परिणाम नक्कीच वाईट असतील. विद्यार्थ्यांच्या करिअरवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. - नताशा पाटील
याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य कसे म्हणणार?
काही विद्यार्थ्यांनी खरचं देशविरोधी नारे लावले असतील तर हे योग्य नाही. याकूब मेमन व अफजल गुरूच्या फाशीला विरोध करीत ते भारताच्या संविधानाचा अपमान करीत आहेत. याला अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणता येणार नाही. अशी विचारसरणी कायद्याचा भंग करणारी आहे. कुठल्याही परिस्थिीत कायद्याचे पालन झालेच पाहिजे. ते झाले नाही तर सामाजिक आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होईल. - निलम काकडे
आपल्या सोयीने विरोध करणे योग्य नाही ेजेएनयूमध्ये अनेकदा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा व आंदोलने होत असल्याचे आपण बघत असतो. यापूर्वी काहींनी नक्षलवाद्यांचे समर्थन केल्याच्या बातम्या आल्या होत्या. येथे कधी २६/११ वा पठाणकोट हल्ल्याच्या विरोधात आंदोलने झाल्याचे ऐकिवात नाही. अशी दुहेरी भूमिका नको. जी गोष्ट चूक आहे तिला विरोध व्हायलाच हवा. आपल्या सोयीने विरोध करणे योग्य नाही. - अंजलि कोडवानी
प्रत्येकाला विचार मांडण्याचा अधिकार
या प्रकरणी कुलगुरूंनी पुढाकार घेऊन प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचे सोडून दबावाखाली येऊन पूर्वग्रहाने कारवाई केली जात असल्याचे चित्र दिसत आहे. देशविरोधी नाºयाचे मी समर्थन करीत नाही. परंतु प्रत्येक नागरिकाला आपले विचार मांडण्याचा हक्क आहे. जेएनयूचे विद्यार्थी जर काही विधायक बाबींकडे लक्ष वेधत असतील तर कोणतेही सरकार विद्यार्थ्यांना त्यांची मते मांडण्यापासून रोखू शकत नाही. विद्यार्थी संघटनांच्या राजकारण, संवाद व वैचारिक वादातूनच तरुणांमध्ये लोकशाही मूल्ये रुजत असतात. - अनुपम करांगळे
उद्याच्या स्वर्णिम भारताच्या स्वप्नाचे काय?
जेएनयूमध्ये सध्या जे काही घडत आहे ते फारच वाईट आहे. जेएनयूच्या काही विशिष्ट विद्यार्थ्यांना निशाण्यावर धरले जात आहे. हे योग्य नाही. विद्यापीठातील या वादाचे कुणी राजकारण करू नये. या प्रकरणाला वेगळे वळण का देण्यात येत आहे हे कळत नाही. शिकायच्या वयात विद्यार्थी असे कारागृहात जाणार असतील तर या देशाने पाहिलेल्या स्वर्णिम भारताचे स्वप्न कसे साकार होईल?
- शुभम मानकर
त्वरित निपटारा होणे गरजेचे
या प्रकरणात आतापर्यंत दोषी आढळलेल्या विद्यार्थांवर कारवाई होऊन याचा निपटारा होणे आवश्यक होते. विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खेळ होऊ नये. लवकारत लवकर या प्रकरणावर तोडगा निघायला हवा. विद्यार्थी घडविणाºया संस्थेत जर अशा प्रकारे घाणेरडे राजकारण होत असेल तर त्याचा परिणाम इतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर देखील पडू शकतो. हे राजकारण करणाºयांनी लक्षात घ्यायला हवे. - तेजस बन्सोड
या आंदोलनावरून देशभरात राजकीय, सामाजिक पातळीवर चर्चा सुरू आहेत, पण आता एका तपास संस्थेने याबाबत दिलेली माहिती जरा वेगळी आहे. ज्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो विद्यार्थी नेता कन्हैयाने देशविरोधी नारे लावलेच नाहीत असे यात म्हटले आहे. यावरून हा वाद आणखी चिघळला असून या विषयावरून देशातील माहोल बिघडवला जात असल्याचा आरोप करीत देशभरातील विद्यार्थी संघटना मैदानात उतरल्या आहेत. यावरून विद्यार्थ्यांमध्येही वैचारिक दुफळी निर्माण होत असून ती देशहिताची नाही, याकडे शहरातील तरुणाईने लक्ष वेधले आहे.
विद्यार्थ्यांचे करिअर बिघडू नये
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी घोषणा कुणी दिल्या असतील असे मला वाटत नाही. यात काही तरी षडयंत्र आहे. नाही तर हा वाद इतका चिघळलाच नसता. परंतु अजूनही स्थिती हाताबाहेर गेलेली नाही. त्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण जर हा वाद अधिक चिघळला तर याचे परिणाम नक्कीच वाईट असतील. विद्यार्थ्यांच्या करिअरवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. - नताशा पाटील
याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य कसे म्हणणार?
काही विद्यार्थ्यांनी खरचं देशविरोधी नारे लावले असतील तर हे योग्य नाही. याकूब मेमन व अफजल गुरूच्या फाशीला विरोध करीत ते भारताच्या संविधानाचा अपमान करीत आहेत. याला अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणता येणार नाही. अशी विचारसरणी कायद्याचा भंग करणारी आहे. कुठल्याही परिस्थिीत कायद्याचे पालन झालेच पाहिजे. ते झाले नाही तर सामाजिक आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होईल. - निलम काकडे
आपल्या सोयीने विरोध करणे योग्य नाही ेजेएनयूमध्ये अनेकदा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा व आंदोलने होत असल्याचे आपण बघत असतो. यापूर्वी काहींनी नक्षलवाद्यांचे समर्थन केल्याच्या बातम्या आल्या होत्या. येथे कधी २६/११ वा पठाणकोट हल्ल्याच्या विरोधात आंदोलने झाल्याचे ऐकिवात नाही. अशी दुहेरी भूमिका नको. जी गोष्ट चूक आहे तिला विरोध व्हायलाच हवा. आपल्या सोयीने विरोध करणे योग्य नाही. - अंजलि कोडवानी
प्रत्येकाला विचार मांडण्याचा अधिकार
या प्रकरणी कुलगुरूंनी पुढाकार घेऊन प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचे सोडून दबावाखाली येऊन पूर्वग्रहाने कारवाई केली जात असल्याचे चित्र दिसत आहे. देशविरोधी नाºयाचे मी समर्थन करीत नाही. परंतु प्रत्येक नागरिकाला आपले विचार मांडण्याचा हक्क आहे. जेएनयूचे विद्यार्थी जर काही विधायक बाबींकडे लक्ष वेधत असतील तर कोणतेही सरकार विद्यार्थ्यांना त्यांची मते मांडण्यापासून रोखू शकत नाही. विद्यार्थी संघटनांच्या राजकारण, संवाद व वैचारिक वादातूनच तरुणांमध्ये लोकशाही मूल्ये रुजत असतात. - अनुपम करांगळे
उद्याच्या स्वर्णिम भारताच्या स्वप्नाचे काय?
जेएनयूमध्ये सध्या जे काही घडत आहे ते फारच वाईट आहे. जेएनयूच्या काही विशिष्ट विद्यार्थ्यांना निशाण्यावर धरले जात आहे. हे योग्य नाही. विद्यापीठातील या वादाचे कुणी राजकारण करू नये. या प्रकरणाला वेगळे वळण का देण्यात येत आहे हे कळत नाही. शिकायच्या वयात विद्यार्थी असे कारागृहात जाणार असतील तर या देशाने पाहिलेल्या स्वर्णिम भारताचे स्वप्न कसे साकार होईल?
- शुभम मानकर
त्वरित निपटारा होणे गरजेचे
या प्रकरणात आतापर्यंत दोषी आढळलेल्या विद्यार्थांवर कारवाई होऊन याचा निपटारा होणे आवश्यक होते. विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खेळ होऊ नये. लवकारत लवकर या प्रकरणावर तोडगा निघायला हवा. विद्यार्थी घडविणाºया संस्थेत जर अशा प्रकारे घाणेरडे राजकारण होत असेल तर त्याचा परिणाम इतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर देखील पडू शकतो. हे राजकारण करणाºयांनी लक्षात घ्यायला हवे. - तेजस बन्सोड