शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

World Environment Day :  पर्यावरण संवर्धन काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 11:00 IST

पर्यावरणाकडे दुर्लक्ष होत गेल्याने ध्वनी, जल व वायू प्रदुषणाची समस्या निर्माण झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : समतोल निसर्गचक्रावरच आपले अस्तित्व असल्याच्या जाणीवेचा मानवाला विसर पडत चालल्याने पर्यावरणाचे ताळतंत्र बिघडत असल्याचा अनुभव जीवसृष्टी घेत आहे. भूमीच्या पोटात शिरून मानवाने अनेक धातू शोधून काढले, कृत्रिम पाऊस पाडला. काही प्रमाणात मानवाने निसर्गावर विजयही मिळविला. मात्र, असे करताना त्याचे पर्यावरणाकडे दुर्लक्ष होत गेल्याने ध्वनी, जल व वायू प्रदुषणाची समस्या निर्माण झाली.प्राचीन काळी निसर्ग नियमांच्या चौकटीत राहणाऱ्या मानवाने आता सदर चौकटी उद्ध्वस्त करण्याचा जणू सपाटाच लावला आहे. निसर्गावर नानाविध प्रयोग करीत वर्तमानाशी जुळवून घेताना त्याचे भविष्याकडे पार दुर्लक्ष होत गेले आणि येथूनच खºया अर्थाने पर्यावरण ºहासाची प्रक्रिया सुरू झाली. वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवी जीवनात अनेक चांगले बदल होत असले तरी त्याचे काही वाईट परिणामही मानवाला भोगावे लागत आहेत. वाशिम जिल्ह्यातील पर्यावरणाचा विचार करता जिल्ह्यात वायू आणि ध्वनी प्रदुषणात फारसी वाढ झाली नाही. कारण जिल्ह्यात औद्यगिकरण वाढलेले नाही. डिजेचा वापर वाढला असला तरी, ते प्रमाणही फारसे नाही. प्रामुख्याने जलप्रदुषणात मोठी वाढ झाली आहे. कृषीपद्धतीमधील बदलाने रासायनिक खते आणि किटकनाशकांचा वापर वाढला. त्यामुळे जमिनीतील कर्ब कमी झालेच शिवाय रासायनिक घटक नदी नाल्यांत मिसळू लागल्याने नद्या प्रदुषीत झाल्या. घरात वापरले जाणाºया काही पदार्थांमधील विषारी घटकही सांडपाण्यात मिसळून नदी, नाल्याद्वारे प्रकल्पांत जाऊ लागले. शिवाय हेच पाणी जमिनीत झिरपूर विहिरी आणि कूपनलिकांच्या पाण्यातही मिसळू लागल्याने पिण्याच्या पाण्यात आरोग्यास हानीकारक घटकांचे प्रमाण वाढल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालावरून दरवर्षी सिद्ध होत आहे.सन 2000 ची स्थिती1. २००० मध्ये नद्यांची स्थिती चांगली होती. त्यामुळे विविध जलचरांची संख्या लक्षणीय असल्याने जलप्रदुषणावर प्रभावी नियंत्रण मिळत होते.2. २००० पर्यंत वाशिम जिल्ह्यात पारंपरिक आणि सेंद्रीय शेतीचे प्रमाण अधिक होते. पूर्वी सेंद्रीय खतांचा वापर अधिक व्हायचा3. २००० मध्ये जंगलाचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे उष्णता जाणवत नव्हती. उष्ण लहरी कमी होत्या4. २००० मध्ये वाहनांची संख्या कमी होती. त्यामुळे ध्वनी प्रदुषण आणि वायू प्रदुषण नियंत्रित होते.5. जिल्ह्याची भुजल पातळी नियंत्रित होती. त्यामुळे पाणीटंचाईचे प्रमाण कमी होते.सध्याची स्थिती1. गेल्या २० वर्षात नद्यांमधील अधिवास संपले, नदीकाठचा झाडोरा नष्ट झाल्याने जलचर प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले.2. २०२० मध्ये शेतीत रासायनिक खते आणि औषधांचा वापर वाढला आहे. त्यामुळे विषारी द्रव्ये वाहून जलस्त्रोतात मिसळत आहेत.3. २०२० पर्यंत वनपरिक्षेत्र घटले व महामार्गांसाठी झाडांची कत्तलही झाली. त्यामुळे उष्णतेत वाढ झाली आणि उष्ण लहरी वाढल्या4. २०२० मध्ये वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे ध्वनी प्रदुषण काही प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे.5. आता भुगर्भातील पाण्याचा वापर वारेमाप वाढला आणि पावसाची अनियमिता वाढल्याने भुजल पातळी १ मिटरपर्यंत खालावली.जिल्ह्यात काही ठिकाणी वृृक्षतोड होत असल्याने जंगल विरळ होत असल्याचे दिसून येते तर दुसरीकडे वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन होत असल्याने शहरासह ्रग्रामीण भागात पर्यावरण संवर्धनाचे काम होत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील नदी, नाल्यांमध्ये जलप्रदुषण आहे. -अभिजित जोशीपर्यावरण तज्ज्ञ, वाशिमजिल्ह्यात ध्वनी, वायू प्रदुषणात फारसी वाढ झाली नाही; परंतु शेती पद्धतीमधील बदलामुळे रासायनिक द्रव्यांचा वापर वाढल्याने ही द्रव्ये नदी, नाल्यांसह जमिनीत झीरपून विहिरी, कूपनलिकांच्या पाण्यात मिसळत असल्याने प्रामुख्याने जलप्रदुषण वाढले आहे. -डॉ. निलेश हेडा,पर्यावरण तज्ज्ञ, तथा जलअभ्यासक

 

टॅग्स :washimवाशिमWorld Environment DayWorld Environment Day