शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

वन संपदा राखतायत धरणातील पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 11:37 IST

पश्चिम घाट प्रदेश हा दऱ्याखोऱ्यांचा आणि घळींचा प्रदेश आहे. अशा प्रदेशांतच धरणांची निर्मिती झाली आहे. या धरणांच्या दोन्ही बाजुला वनाच्छादन असल्याने जमिनीची धुप झाली नाही. ही झाडं या परिसरात नसती तर प्रत्येक पावसात धरणांत माती साठून शंभर टीएसमी क्षमता असणारं धरणं गाळाने भरून गेलं असतं. हे वनांनी केलेलं सर्वात महत्वाचं आणि मोठं काम असल्याचं पर्यावरण तज्ज्ञ सांगतात.

ठळक मुद्देवन संपदा राखतायत धरणातील पाणी! जमिनीची धूप होण्यापासून मिळतेय रक्षण

प्रगती जाधव-पाटीलसातारा : पश्चिम घाट प्रदेश हा दऱ्याखोऱ्यांचा आणि घळींचा प्रदेश आहे. अशा प्रदेशांतच धरणांची निर्मिती झाली आहे. या धरणांच्या दोन्ही बाजुला वनाच्छादन असल्याने जमिनीची धुप झाली नाही. ही झाडं या परिसरात नसती तर प्रत्येक पावसात धरणांत माती साठून शंभर टीएसमी क्षमता असणारं धरणं गाळाने भरून गेलं असतं. हे वनांनी केलेलं सर्वात महत्वाचं आणि मोठं काम असल्याचं पर्यावरण तज्ज्ञ सांगतात.राज्यात साताऱ्याची समृध्द ओळख ही येथील धरणं आणि त्यातील पाणी यामुळे आहे. महाराष्ट्रासह कर्नाटकाला पाणी पुरवठा करणारे मोठे कोयना धरण सातारा जिल्ह्यात आहे. याबरोबरीने अन्य छोटी मोठी धरणंही जिल्ह्याचा पिण्याचा, सिंचनाचा आणि विज निर्मितीचा भार उचलत आहेत.

पावसाचं पाणी धरणांपर्यंत जाण्यापूर्वी ते वनक्षेत्रातून जाते. वनक्षेत्रातून गाळून आलेलं पाणी धरणात साठत असल्यामुळे वाहून आलेल्या पाण्यातून मातीचा अंश फारसा आढळत नाही. परिणामी धरणांमध्ये गाळ साठण्याचं प्रमाण कमी असून त्याचं श्रेय धरण परिसरातील वनक्षेत्राला जाते.जिल्ह्याच्या वनक्षेत्रांत वाघाटी, चिंच, उंबर, बारें, सिताफळ, रामफळ, भोकरं, जांभूळ, करवंद ही फळं तर हेरडा, बेहडा, ऐन, किंजळ, नाना, शेर, अंजनी, डाका, पुमा अशा वनौषधीही येथे मोठ्या प्रमाणात आढळून येते. सदा हरित, शुष्क भागासह निमसदा हरित भागही वनक्षेत्रांमध्ये आढळून येतो. इतकी वैविधतपूर्ण समृध्दता अन्य कुठेही आढळून येत नाही, हे विशेष.झाड तेच रूप वेगळं!सातारा जिल्ह्यात पठारावर आणि सपाटीला येणाऱ्या झाडांमध्ये मोठा फरक आढळतो. कास पठारावर असणारी जांभळांची झाडं ही खुजी आहेत तर सपाटीवर येणारी झाडं उंच आहेत. पठारावर असणाऱ्या झाडांना उन आणि पाऊस याबरोबरचं वाऱ्याचा सामना करावा लागत असल्यामुळे त्यांची उंची कमीच राहते. या उलट डोंगराच्या आडून येणाऱ्या वाऱ्याचा फारसा वेग सपाटीच्या झाडांना लागत नसल्यामुळे तिथली झाडं उंच होतात.

आपल्याकडे वनक्षेत्रात मुबलक प्रमाणात वनौषधी आणि वनउपज असलेली फळझाडंही आहेत. वनांमध्ये मुबलक असणाऱ्या या समृध्दीचा उपयोग अद्यापही आपल्याकडे होताना आढळत नाही. यासाठी प्रयत्न होणं आवश्यक आहे.- सुनिल भोईटे,पर्यावरण अभ्यासक

टॅग्स :DamधरणWaterपाणीSatara areaसातारा परिसरenvironmentपर्यावरण