शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

सारांश लेख: झाड कापताना त्यातून रक्त सांडतं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2023 11:35 AM

सरकारनेच गांभीर्याने झाडांच्या पुनर्वसनाचा विचार करावा.

सयाजी शिंदे, अभिनेते - वृक्षप्रेमी

आपल्याकडे अनेक ठिकाणी महामार्गांच्या बांधणीचे आणि रुंदीकरणाचे काम सुरू आहे; पण या सर्वात मोठ्या प्रमाणावर बळी जातोय तो आपल्याला अखंड ऑक्सिजन देणाऱ्या झाडांचा. नुकतीच पुणे-बंगळुरू रस्त्यावर काही झाडे कापली गेली. त्यातही एक मोठे किमान २०० वर्षे जुने वडाचे झाड देखील पाडले. वड हा आपला राष्ट्रीय वृक्ष आहे. आता या झाडाने गेल्या २०० वर्षांत जो ऑक्सिजन दिला, त्याच्या सानिध्यात वाढलेल्या अन्य झाडांना-वेलींना जीवदान दिले, झाडावर बसणाऱ्या पक्ष्यांचा आसरा दिला, त्यांचा एक अधिवास पाडण्यात आला, त्याची किंमत आपण कशी मोजणार आहोत?

आपण  याचा कधीतरी गांभीर्याने विचार करणार आहोत की नाही? कुठे चाललो आहोत आपण? आपल्याला भविष्यात याची काय व किती किंमत मोजावी लागेल, याची काही कल्पना आहे का? अलीकडेच पुणे-बंगळुरू रस्त्यावर पाडलेल्या या वडाच्या झाडाची माहिती मिळाल्यावर मी माझ्या टीमसह तिथे पोहोचलो. तिथे कायतर म्हणे मधमाश्यांनी आमच्यावर हल्ला केला. अरे, त्यांनी हल्ला नाही केला. त्या झाडाला पाडल्यावर आम्ही तिथे पाहायला गेलो. आम्ही त्यांच्या अधिवासात प्रवेश केला. तेव्हा त्यांची ती प्रतिक्रिया होती, असे म्हणायला हवे. आज त्या रस्त्यावर जी झाडे पडली आहेत, त्या झाडांच्या फांद्यांवर झालेल्या वाऱ्यामुळे त्यातून पांढरा चिक गळतो आहे. हा पांढरा चिक म्हणजे त्या झाडांचे रक्त आहे हो ! ही भळभळती जखम आपल्याला कधी समजणार? किती बदललो आपण! गावात एखादा सरपंच वारला तर आपण मोठी शोकसभा घेतो. गाव धाय मोकलून रडतो. त्या सरपंचाची महती सांगतो. अरे पण तो सरपंच होता पाच वर्षे. त्यातही दोन पक्षांची इकडची-तिकडची कामे त्याने केली. पण ही झाडे तब्बल २०० वर्षे इथे आहेत.

ज्या झाडाने २०० वर्षे तुम्हाला निरपेक्षपणे निर्मळ श्वास दिला, सावली दिली आणि मोजण्यापलीकडचे उपकार तुमच्यावर केले, ते उन्मळल्यावर त्याची शोकसभा व्हायला नको?, एवढी आपली संवेदनशीलता हरपली का? तुमच्या सरणावर रचले जाण्यासाठी या झाडांनी आज स्वतःचा जीव गमावला आहे, असे मला राहून राहून वाटते.

- विकासकामे करताना वृक्षतोड केली जाते; पण अशावेळी झाडांची कत्तल करण्यापूर्वी जरा नियोजन करा. या झाडांना अन्यत्र हलवून तिथे त्यांचे पुनर्वसन करा. ते करणे सहज शक्य आहे. निसर्गाची स्वतःची एक जैवसाखळी आहे. - ती अशा पद्धतीने नष्ट करणे भविष्यात मानव जातीच्या मुळावर बेतू शकते, याचा किमान विचार होणे ही काळाची गरज आहे. - औरंगाबाद, परभणी येथील रस्त्यांची कामे सुरू असताना आम्ही ४०० पैकी ४० झाडे वाचवली. त्यांचे प्रत्यारोपण केले; पण माझ्यासारख्या एका माणसाच्या क्षमतेला मर्यादा आहेत.

सरकारनेच जर गांभीर्याने याचा विचार करून झाडांच्या पुनर्वसनाचा विचार करून कृती करत, मग विस्ताराची आणि विकासाची कामे केली तर निसर्गाचा तोलही सांभाळला जाईल. या गोष्टीचा गांभीर्याने विचार करण्याचे माझे सरकारला नम्र आवाहन आहे.

टॅग्स :sayaji shindeसयाजी शिंदेforestजंगलenvironmentपर्यावरण