शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पिवळ्या 'कॉसमॉस'चा प्रसार जैवविविधतेला घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 13:48 IST

Biodiversity in Danger कॉसमॉसच्या फुलांमुळे खामगाव व परिसरात पिवळ्या रंगाचा गालिचा पसरल्यासारखा भासत आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : दिसायला सुंदर, टवटवित; कोणालाही सेल्फी काढण्याचा मोह व्हावा, अशा कॉसमॉसच्या फुलांमुळे खामगाव व परिसरात पिवळ्या रंगाचा गालिचा पसरल्यासारखा भासत आहे. रंगावरून मोहात पडू नका, कॉसमॉस हे एक विदेशी तण आहे. अमर्याद पसारा वाढवून ते स्थानिक प्रजातींना प्रतिबंध घालते. त्याने येथील जैवविविधता धोक्यात येण्याचा सावधानतेचा इशारा वनस्पती तज्ज्ञांनी दिला आहे.खामगाव येथून बुलडाणा कडे जाताना बोथा घाटात, दरीच्या बाजुला तसेच मेहकर आणि चिखली तालुक्यातील महामार्गावर दुतर्फा, जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेत  आणि खामगाव तालुक्यातील जागृती आश्रमात  सर्वत्र सध्या पिवळ्या रंगांच्या फुलांचा जणू गालिचा टाकल्याचा भास होतो. सुर्यफुलाच्या कुळातील ही कॉसमॉसवनस्पतीची फुलं चटकन लक्ष वेधून घेतात.  बोथा घाटातील हिरवागार निसर्ग, पावसाळी हवा, डोंगररांगेच्या दुतर्फा धरणांची सिनरी, विकेंडची उत्साही मानसिकता आणि त्यात टवटवीत, डोलणारी पिवळीधम्मक फुलं पाहून पर्यटकांचा उत्साह द्विगुणित होतो. काही लोक या फुलझाडाच्या बिया, रोपं आपल्या घराकडे लावण्यासाठी सोबत नेतात. मात्र, वनस्पती तज्ज्ञांनी अशा उत्साही लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. चमकणारी प्रत्येक गोष्ट सोनं नसते, या उक्तीप्रमाणे ही कॉसमॉसची पुष्पवनस्पती एक विदेशी तण आहे. त्याचा प्रसार झपाट्याने होतो. स्थानिक वनस्पतींच्या वाढीला मारक आहे, असे मत जाणकारांनी नोंदवले आहे.

मूळ मेक्सिकोमधील वनस्पती

खामगावातील पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते रविंद्र गुरव यांनी या तनाच्या प्रसाराबाबत सांगितले, सुर्यफुलाच्या कुळातील या वनस्पतीला भरपूर फळे येतात. त्याच्या बिया वाºयाबरोबर वाहून नेल्या जातात. या वनस्पती वाढलेल्या दिसतात, मूळ वनस्पती मेक्सिकोमधील आहे. त्यामुळे परदेशातून झाडे आणताना काळजी घ्यावी.माळरानावर फुलतात झाडे ही वनस्पती कमी पाण्यात येते. खडकाळ, माळरान, डोंगर उतार अशा कोणत्याही जमिनीत उगवते. या वनस्पतीचे बीज दिर्घकाळ सुप्तावस्थेत राहू शकते. विजाची उगवण क्षमता जवळपास १०० टक्के इतकी आहे. अंगभुत गुणांमुळे या वनस्पतीला किडीचा प्रादुर्भाव होत नाही. या वनस्पती स्थानिक झाडोरा, गवत यांना उगवू. वाढू देत नाहीत. त्यामुळे तेथील जैवसाखळी धोक्यात येते.

 

गांजर गवताप्रमाणेच कॉसमास वनस्पती आपल्या सावलीत दुसरी वनस्पती वाढू देत नाही. उग्रवासामुळे जनावरेही या वनस्पतीला खात नाहीत. दोन्ही वनस्पती नष्ट करण्यासाठी तरोटा हा रामबाण उपाय आहे. - रविंद्र गुरव, ज्येष्ठ वनस्पती अभ्यासक,खामगाव. 

टॅग्स :environmentपर्यावरणkhamgaonखामगाव