शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

Plant Health Year 2020 : आपल्या आरोग्यासाठी जपा झाडांचेही आरोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 17:30 IST

मानव आणि पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी झाडांचे आरोग्य जपणे आवश्यक

ठळक मुद्दे२०२० हे वर्ष युनायटेड नेशन्सने ‘प्लान्ट हेल्थ ईअर’ म्हणून घोषित केले आहे.युनायटेड नेशन्सतर्फे  शाश्वत विकास हे ध्येय गाठण्यासाठी २०३० हे वर्ष ठरविण्यात आले आहे.

- रुचिका पालोदकर 

औरंगाबाद : कीटकनाशके, रासायनिक खतांचा सातत्याने होणारा वापर याचा झाडांवर विपरीत परिणाम होत आहे. वरवर पाहता सगळे आलबेल वाटत असले तरी यामुळे झाडांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अन्नासाठी मानवजात झाडांवर अवलंबून असल्यामुळे कळत-नकळत मानवी शरीरावरही याचा परिणाम होतो. त्यामुळे झाडांसाठी नाही, तर निदान स्वत:चे आरोग्य जपणे या स्वार्थी हेतूने तरी झाडांचे आरोग्य सांभाळा, असे आवाहन युनायटेड नेशन्सतर्फे जगभरातल्या लोकांना करण्यात आले आहे.

२०२० हे वर्ष युनायटेड नेशन्सने ‘प्लान्ट हेल्थ ईअर’ म्हणून घोषित केले आहे. मानव आणि पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी झाडांचे आरोग्य जपणे आवश्यक असून, त्यासाठी शाश्वत विकासाची गरज आहे. याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी यावर्षीची संकल्पना ‘झाडांचे आरोग्य’ याभोवती गुंफण्यात आली आहे. २०१७ साली संयुक्त राष्ट्राच्या सभेत ‘प्लान्ट हेल्थ’ विषयीचा ठराव मंजूर करण्यात आला. हा प्रस्ताव फिनलँड देशाने मांडला

युनायटेड नेशन्सतर्फे २०२० वर्ष ‘प्लान्ट हेल्थ ईअर’ म्हणून घोषित‘संयुक्त राष्टाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रकारचे दिन आणि वर्षाची थीम’ ठरविली जाते मात्र त्यावर जगभराच्या दृष्टीने व्यापक प्रमाणावर उपाययोजना होत आहे, असे चित्र दिसत नाही. हेल्थ प्लान्ट या विषयासंदर्भात भारतात वैज्ञानिक संस्था, केंद्र आणि राज्य सरकारे तसेच शेती, पर्यावरण आणि  जैवविविधतेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांमध्येही अद्याप या विषयाची चर्चा सुरु असल्याचे दिसत नाही. 

शाश्वत विकासयुनायटेड नेशन्सतर्फे  शाश्वत विकास हे ध्येय गाठण्यासाठी २०३० हे वर्ष ठरविण्यात आले आहे. यासोबतच दारिद्र्य निर्मूलन, आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीय विकास ही देखील आगामी काळातील उद्दिष्टे आहेत. या दिशेने जाण्यासाठीची सुरुवात अप्रत्यक्षपणे झाडांच्या आरोग्यातूनच होते. शाश्वत शेतीच्या माध्यमातूनच झाडांचे आरोग्य सांभाळता येईल. यासोबतच शाश्वत औद्योगिकीकरण,  शाश्वत जीवन, शाश्वत अन्न या संकल्पनाही महत्त्वाच्या आहेत. 

उद्देशसंयुक्त राष्ट्रसभेत ‘प्लान्ट हेल्थ’चा विषय चर्चेत आला त्यावेळी यासंबंधीच्या उद्देशांवरही चर्चा झाली. ‘प्लान्ट हेल्थ’ चा उद्देश काय असावा याचाही विचार झाला. केवळ रोपांचे जीवन एवढ्यापुरता हा विषय मर्यादित नाही तर ‘प्लान्ट हेल्थ’ म्हणत असताना संपूर्ण मानवी जीवनाचा विचार करण्यात आला आहे. ‘प्लान्ट हेल्थ’ मुळे माणसाची भूक मिटेल, गरीबी दूर होईल, पर्यावरणाचे संरक्षण होईल आणि अंतिमत: ही बाब मानवी आर्थिक विकासासाठी पूरक ठरेल. तज्ज्ञ म्हणतात...डॉ. रंजन गर्गे म्हणाले की, कीटकनाशकांच्या बेसुमार वापरामुळे मातीत विष कालविले जाते. हे विष फळ, धान्य, भाज्या या स्वरूपातून आपल्या शरीरात प्रवेश करते. यामुळेच कर्करोगाचे प्रमाण सध्या लक्षणीय वाढले आहे. यासोबतच रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मातीतील नत्र, सल्फर, कार्बन यांचे प्रमाण बिघडते. मातीतील परिसंस्थांचा नाश होत असून, जैवविविधतेला धोका होत आहे. ट्रान्सजेनिक प्लान्टस् जणुकीय बदलातून वनस्पतींचे वाण निर्माण करणारा प्रकारही धोकादायक असून, त्यामुळे काही वर्षांनंतर केवळ कृत्रिम अन्न खाण्याची वेळच आपल्यावर येईल आणि आहारातील सकसता निघून जाईल. यातून कॅन्सरचे प्रमाण तर वाढेलच; पण अन्य आजारांनाही निमंत्रण मिळेल. याशिवाय पेट्रोल, डिझेल यांचा अतिवापरही ग्लोबल वार्मिंगला कारणीभूत ठरतो आहे. हे सर्व रोखायचे असेल, तर शाश्वत जीवनाकडे मार्गक्रमण केले पाहिजे. हे साध्य करण्यासाठी शेती पद्धतीत आणि आपल्या आचरणात आमूलाग्र बदल करावा लागेल, असे गर्गे यांनी सांगितले. 

टॅग्स :environmentपर्यावरणEarthपृथ्वीpollutionप्रदूषणunited nationsसंयुक्त राष्ट्र संघAurangabadऔरंगाबाद