शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
4
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
5
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
6
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
7
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
8
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
9
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
10
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
11
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
12
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
13
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
14
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
15
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
16
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
17
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
18
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
19
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
20
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरित पक्ष्यांची अजूनही कोल्हापूरकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 11:21 IST

environment birdsweek, wildlife, kolhapur पश्चिम घाटातील सर्वांत समृद्ध भाग म्हणून ओळख असल्यामुळे कोल्हापुरात येणाऱ्या परदेशी स्थलांतरित पक्ष्यांची संख्या नैसर्गिक अधिवासांना धोका पोहोचत असल्यामुळे घटत चालली आहे. दरवर्षी ऑक्टोबरअखेरीस येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांनी यंदाही पाठ फिरवली आहे. ही लक्षणे म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने धोक्याची घंटा असल्याचे पक्षीप्रेमींचे मत आहे.

ठळक मुद्देनैसर्गिक अधिवासाला धोका पर्यावरणदृष्ट्या धोक्याची घंटा 

संदीप आडनाईककोल्हापूर : पश्चिम घाटातील सर्वांत समृद्ध भाग म्हणून ओळख असल्यामुळे कोल्हापुरात येणाऱ्या परदेशी स्थलांतरित पक्ष्यांची संख्या नैसर्गिक अधिवासांना धोका पोहोचत असल्यामुळे घटत चालली आहे. दरवर्षी ऑक्टोबरअखेरीस येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांनी यंदाही पाठ फिरवली आहे. ही लक्षणे म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने धोक्याची घंटा असल्याचे पक्षीप्रेमींचे मत आहे.पक्षीनिरीक्षक हिमांशू स्मार्त, सतपाल गंगलमाले यांच्या चमूने गेल्या चार दिवसांत कळंबा आणि रंकाळा परिसरात आलेल्या पक्ष्यांच्या नोंदी केल्या आहेत. त्यांना अनेक स्थलांतरित पक्षी यंदा आढळलेले नाहीत. २०१४ पासून हे पक्षीप्रेमी रंकाळ्यावरच्या नोंदी घेत आहेत. २०१९ पर्यंत सुमारे ३६ पक्ष्यांची नोंद त्यांच्याकडे आहे, परंतु यावेळी केवळ ११ प्रजातींचीच नोंद झालेली आहे.कोल्हापुरात येणाऱ्या पक्ष्यांमध्ये बहुसंख्येने युरोपियन, सैबेरियन पक्षी आहेत. याशिवाय पठारावर आढळणारे शिकारी पक्ष्यांचीही नोंद झालेली आहे, परंतु आता ही संख्याही कमी झाली आहे. मॉन्टीगिव्ह हारिण हा शिकारी पक्षी सध्या दिसतो, पण अजून काही पक्षी आढळलेले नाहीत.या ठिकाणी आहे पक्ष्यांचा अधिवास :कळंबा, रंकाळा, पन्हाळा, आंबा, राधानगरी, गगनबावडा, चांदोली, तिलारी, आंबोली या ठिकाणी स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास आहे.कोल्हापुरात नोंदवलेले स्थलांतरित पक्षीपाणपक्षी : पिवळा धोबी, पांढरा धोबी, करडा धोबी, भुवई बदक, साधी तुतारी, कैकर, युरेशियन दलदल हारिण.झुडूपवर्गीय पक्षी : वेळूतला दंगेखोर वटवट्या, ब्लिथचा वेळूतला वटवट्या, काळ्या डोक्याचा कहुआ, सायबेरियन स्टोन चॅट, सुलोही.ही आहेत कारणे...पाणवठ्याच्या आणि दलदलीच्या कमी झालेल्या जागा, पाण्यातील वाढते प्रदूषण, बेसुमार वृक्षतोड, रस्ते विकास प्रकल्प यामुळे या पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. मोठमोठी विकासकामे, मानवी हस्तक्षेप होऊ लागल्याने पक्ष्यांना ही ठिकाणे सुरक्षित वाटत नाहीत. शहरातील तळ्यांवर मानवी वावर वाढला आहे. रंकाळा, कळंबा येथे फिरायला येणाऱ्यांची संख्याही वाढलेली आहे.

रंकाळा आणि कळंबा या दोन तलावांमुळे जैवविविधता टिकून आहे. कोल्हापुरात येणारे बहुतेक पक्षी हे झाडांवर आढळणारे आणि पाण्यात विहरणारे आहेत, पण यंदा पावसाळा अजूनही पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे दलदलीच्या जागा आढळत नाहीत, त्यामुळे नियमित येणारे काही पक्षी आढळत नाहीत.- हिमांशू स्मार्त, पक्षीनिरीक्षक.

 

 

टॅग्स :environmentपर्यावरणbirds sanctuaryपक्षी अभयारण्यwildlifeवन्यजीवkolhapurकोल्हापूर