शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Good News : गेल्या चार वर्षांत विस्तारले देशातील वृक्ष आणि वनक्षेत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 14:05 IST

जगात ज्या देशांमध्ये गेल्या काही काळात वनक्षेत्राममध्ये वाढ झाली आहे, अशा देशांमध्ये भारताचाही समावेश आहे.

नवी दिल्ली - गेल्या काही वर्षांमध्ये घटत जाणारे वनक्षेत्र ही पर्यावरणाच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरलेली आहे. मात्र भारतासाठी या आघाडीवर चांगली बातमी आली असून, गेल्या चार वर्षांमध्ये देशातील वनक्षेत्रामध्ये सुमारे 13 हजार चौरस किमी एवढी वाढ झाल्याचे एका अहवालामधून समोर आले आहे. भारतातीलजंगलांच्या स्थितीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या ''इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2019'' मध्ये याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या अहवालानुसार जगात ज्या देशांमध्ये गेल्या काही काळात वनक्षेत्राममध्ये वाढ झाली आहे, अशा देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. दिल्लीसारख्या शहरी परिसरातही वनक्षेत्र वाढले असून, सागरी क्षेत्रामध्येही वनांचा विस्तार झाला आहे.  भारतात 2017 च्या तुलनेत 5 हजार 199 चौरस किमी परिसरात जंगल आणि वृक्षांचा विस्तार वाढला आहे. त्यामध्ये सुमारे  9 हजार 976 चौकिमी क्षेत्रात वनाच्छादन वाढले आहे. तर 1212 चौकिमी क्षेत्रात वृक्षांचा विस्तार झाला आहे.  यासंदर्भातील अहवाल  दर दोन वर्षांनी प्रसिद्ध होत असतो.  या अहवालानुसार देशातील एकूण सात लाख 12 हजार 249 चौकिमी एवढा भूभाग वनाच्छादित आहे. ही आकडेवारी देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या 21.67 टक्के एवढे आहे. पूर्वोत्तर भागातील पाच राज्यांमध्ये वनक्षेत्र घटले आहे. येथे आधीच्या काळात बऱ्यापैकी घनदाट जंगले होती.  पूर्वोत्तर भारतातील वनक्षेत्रात 765 चौकिमी एवढी घट झाली आहे. याबाबत असे सांगण्यात आले की येथो अजूनही 70 ते 80 टक्के एवढे वनक्षेत्र कायम आहे. विशेष बाब म्हणजे प्रदूषणाचा सामना करत असलेल्या राजधानी दिल्लीमध्येही वनक्षेत्र विस्तारले आहे. यापूर्वी दिल्लीतील वनक्षेत्र हे 305.41 चौकिमी होते. त्यात आता वाढ होऊन ते 324.44 चौकिमी एवढे झाले आहे. दक्षिण दिल्ली परिसरात विशेष करून वनक्षेत्राची वाढ झाली आहे. 

 समुद्राजवळ असलेल्या किनारी भागातही वनक्षेत्र विस्तारले आहे. खारफुटीच्या वनांमध्ये गेल्या दोन वर्षांत 54 चौकिमी एवढी वाढ झाली आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि ओदिशा या राज्यांमध्ये खारफुटीच्या वनांमध्ये वाढ झाली आहे. देशातील एकूण 6.5 लाख गावांपैकी सुमारे 1.7 लाख गाव हे वनांजवळ वसलेले आहेत. तसेच देशात वृक्षारोपनाबाबत वाढत असलेल्या जागरुकतेमुळे शहर आणि ग्रामीण भागांत वनक्षेत्राबाहेरही वनक्षेत्र विस्तारत आहे. 2017 मध्ये वनक्षेत्राबाहेर सुमारे एक लाख 94 हजार 507 चौकिमी एवढे वनक्षेत्र होते. आता त्यात वाढ होऊन ते एक लाख 98 हजार 813 चौकिमी पर्यंत पोहोचले आहे.  तसेच गेल्या काही वर्षांत जंगलांमध्ये लागणाऱ्या आगींमध्येही मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये वनक्षेत्राचा लक्षणीय विस्तार झाला आहे. 

टॅग्स :forestजंगलIndiaभारतenvironmentपर्यावरण