शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
2
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
3
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
4
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
5
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
6
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
7
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
8
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
9
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
10
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
11
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
12
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
13
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
14
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
15
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
16
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
17
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
18
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
19
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
20
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )

Ganesh Festival 2019 : मातीच्या मूर्तीत हव्या उपयुक्त झाडांच्या बिया !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 11:15 IST

मंगलमूर्ती गणरायाच्या आगमनासाठी प्रत्येक घरात उत्साहाचे वातावरण असते. संकटमोचक देवता कुटुंबातील सगळ्यांना एकत्र आणायचे काम करते.

डॉ. माधवी रायते

सोलापूर - मंगलमूर्ती गणरायाच्या आगमनासाठी प्रत्येक घरात उत्साहाचे वातावरण असते. संकटमोचक देवता कुटुंबातील सगळ्यांना एकत्र आणायचे काम करते. या उत्सवामुळे जिवाभावाच्या भेटी व्हायच्या, एका अपूर्व प्रासादिक वातावरणात गणेशपूजा व्हायची, मने बांधली जायची. टिळकांच्या या महान संकल्पनेला रचनात्मक आणि विधायक स्वरूप देणे, ही आजच्या काळाची गरज आहे. समाज प्रबोधनाचे हे शस्त्र संकट निवारणासाठी वापरायला हवे. 

सामूहिक उत्सव साजरे करण्यासाठी आदर्श नियमावली तयार करून तिची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज आहे. सर्वात प्रथम सार्वजनिक मंडळांकडून घेण्यात येणारी वर्गणी ही ऐच्छिक असायला हवी. शहरातील अनेक पेठांमधून अनेक गणेश मंडळे स्थापन करण्यापेक्षा ‘एक पेठ, एक गणपती’, ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना अमलात आणायला हवी. गणपतीच्या मूर्ती पर्यावरणपूरक बनवाव्यात. पाण्यात विरघळणाऱ्या मातीच्या अथवा शाडूच्या छोट्या मूर्ती विक्रीसाठी ठेवायला हव्यात. या मूर्तीमध्ये ‘सीड बॉल’ ठेवावेत. विसर्जनाच्या ठिकाणी पाण्यात उपयुक्त वनस्पतींची वाढ होऊ शकते. यासाठी मूर्तीमध्ये चिंचोके, सीताफळांच्या बिया, आंब्याच्या कोई, कडुनिंबाच्या निंबोळ्या, जांभळाच्या बिया ठेवाव्यात. मातीची मूर्ती तलावात किंवा इतर ठिकाणी विसर्जित केल्यानंतर त्याचे नुकसान होण्याऐवजी फायदा होईल, यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सुबुद्धी देवो हीच श्रीगणेशाच्या चरणी प्रार्थना.

चित्रप्रदर्शन, पोस्टर

गणेशोत्सवाचा मुख्य उद्देश प्रबोधन आणि जनसंघटन असल्याने प्रबोधनपर पोस्टर, चित्रप्रदर्शन यातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आवाहन करता येऊ शकते. लहान-लहान उपक्रमातून हा उत्सव आपण पर्यावरणपूरक करूशकतो. यासाठी प्रत्येकाने संकटमोचक गणपती होऊनच हा भगीरथाचा रथ ओढायचा आहे.

डीजे नकोच!

10 नंतर रात्री ध्वनिवर्धक बंद ठेवायला हवे. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत गुलाल उधळू नये. ध्वनिप्रदूषण होऊ नये यासाठी डीजेच्या वापरावर बंदी असायला हवी.

शाळा, रुग्णालय, वृद्धाश्रमाजवळ गणेशमूर्तीची स्थापना करू नये. निर्माल्य शक्यतो छोट्या खड्ड्यांमध्ये विसर्जित करावे. या खड्ड्यांवर माती टाकावी. याचा वापर पुढे सेंद्रिय खत म्हणून करता येऊ शकतो.

(लेखिका कुंभारी सोलापूर येथील अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या अधिष्ठाता आहेत.)

 

टॅग्स :environmentपर्यावरणGanesh Mahotsavगणेश महोत्सवpollutionप्रदूषण