शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

Ganesh Festival 2019 : मातीच्या मूर्तीत हव्या उपयुक्त झाडांच्या बिया !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 11:15 IST

मंगलमूर्ती गणरायाच्या आगमनासाठी प्रत्येक घरात उत्साहाचे वातावरण असते. संकटमोचक देवता कुटुंबातील सगळ्यांना एकत्र आणायचे काम करते.

डॉ. माधवी रायते

सोलापूर - मंगलमूर्ती गणरायाच्या आगमनासाठी प्रत्येक घरात उत्साहाचे वातावरण असते. संकटमोचक देवता कुटुंबातील सगळ्यांना एकत्र आणायचे काम करते. या उत्सवामुळे जिवाभावाच्या भेटी व्हायच्या, एका अपूर्व प्रासादिक वातावरणात गणेशपूजा व्हायची, मने बांधली जायची. टिळकांच्या या महान संकल्पनेला रचनात्मक आणि विधायक स्वरूप देणे, ही आजच्या काळाची गरज आहे. समाज प्रबोधनाचे हे शस्त्र संकट निवारणासाठी वापरायला हवे. 

सामूहिक उत्सव साजरे करण्यासाठी आदर्श नियमावली तयार करून तिची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज आहे. सर्वात प्रथम सार्वजनिक मंडळांकडून घेण्यात येणारी वर्गणी ही ऐच्छिक असायला हवी. शहरातील अनेक पेठांमधून अनेक गणेश मंडळे स्थापन करण्यापेक्षा ‘एक पेठ, एक गणपती’, ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना अमलात आणायला हवी. गणपतीच्या मूर्ती पर्यावरणपूरक बनवाव्यात. पाण्यात विरघळणाऱ्या मातीच्या अथवा शाडूच्या छोट्या मूर्ती विक्रीसाठी ठेवायला हव्यात. या मूर्तीमध्ये ‘सीड बॉल’ ठेवावेत. विसर्जनाच्या ठिकाणी पाण्यात उपयुक्त वनस्पतींची वाढ होऊ शकते. यासाठी मूर्तीमध्ये चिंचोके, सीताफळांच्या बिया, आंब्याच्या कोई, कडुनिंबाच्या निंबोळ्या, जांभळाच्या बिया ठेवाव्यात. मातीची मूर्ती तलावात किंवा इतर ठिकाणी विसर्जित केल्यानंतर त्याचे नुकसान होण्याऐवजी फायदा होईल, यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सुबुद्धी देवो हीच श्रीगणेशाच्या चरणी प्रार्थना.

चित्रप्रदर्शन, पोस्टर

गणेशोत्सवाचा मुख्य उद्देश प्रबोधन आणि जनसंघटन असल्याने प्रबोधनपर पोस्टर, चित्रप्रदर्शन यातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आवाहन करता येऊ शकते. लहान-लहान उपक्रमातून हा उत्सव आपण पर्यावरणपूरक करूशकतो. यासाठी प्रत्येकाने संकटमोचक गणपती होऊनच हा भगीरथाचा रथ ओढायचा आहे.

डीजे नकोच!

10 नंतर रात्री ध्वनिवर्धक बंद ठेवायला हवे. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत गुलाल उधळू नये. ध्वनिप्रदूषण होऊ नये यासाठी डीजेच्या वापरावर बंदी असायला हवी.

शाळा, रुग्णालय, वृद्धाश्रमाजवळ गणेशमूर्तीची स्थापना करू नये. निर्माल्य शक्यतो छोट्या खड्ड्यांमध्ये विसर्जित करावे. या खड्ड्यांवर माती टाकावी. याचा वापर पुढे सेंद्रिय खत म्हणून करता येऊ शकतो.

(लेखिका कुंभारी सोलापूर येथील अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या अधिष्ठाता आहेत.)

 

टॅग्स :environmentपर्यावरणGanesh Mahotsavगणेश महोत्सवpollutionप्रदूषण