शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
2
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
3
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
4
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
5
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
6
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
7
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
8
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
9
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
10
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
11
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
12
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
13
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
14
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
15
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
16
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
17
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
18
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
19
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
20
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग

Ganesh Festival 2019 : मातीच्या मूर्तीत हव्या उपयुक्त झाडांच्या बिया !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 11:15 IST

मंगलमूर्ती गणरायाच्या आगमनासाठी प्रत्येक घरात उत्साहाचे वातावरण असते. संकटमोचक देवता कुटुंबातील सगळ्यांना एकत्र आणायचे काम करते.

डॉ. माधवी रायते

सोलापूर - मंगलमूर्ती गणरायाच्या आगमनासाठी प्रत्येक घरात उत्साहाचे वातावरण असते. संकटमोचक देवता कुटुंबातील सगळ्यांना एकत्र आणायचे काम करते. या उत्सवामुळे जिवाभावाच्या भेटी व्हायच्या, एका अपूर्व प्रासादिक वातावरणात गणेशपूजा व्हायची, मने बांधली जायची. टिळकांच्या या महान संकल्पनेला रचनात्मक आणि विधायक स्वरूप देणे, ही आजच्या काळाची गरज आहे. समाज प्रबोधनाचे हे शस्त्र संकट निवारणासाठी वापरायला हवे. 

सामूहिक उत्सव साजरे करण्यासाठी आदर्श नियमावली तयार करून तिची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज आहे. सर्वात प्रथम सार्वजनिक मंडळांकडून घेण्यात येणारी वर्गणी ही ऐच्छिक असायला हवी. शहरातील अनेक पेठांमधून अनेक गणेश मंडळे स्थापन करण्यापेक्षा ‘एक पेठ, एक गणपती’, ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना अमलात आणायला हवी. गणपतीच्या मूर्ती पर्यावरणपूरक बनवाव्यात. पाण्यात विरघळणाऱ्या मातीच्या अथवा शाडूच्या छोट्या मूर्ती विक्रीसाठी ठेवायला हव्यात. या मूर्तीमध्ये ‘सीड बॉल’ ठेवावेत. विसर्जनाच्या ठिकाणी पाण्यात उपयुक्त वनस्पतींची वाढ होऊ शकते. यासाठी मूर्तीमध्ये चिंचोके, सीताफळांच्या बिया, आंब्याच्या कोई, कडुनिंबाच्या निंबोळ्या, जांभळाच्या बिया ठेवाव्यात. मातीची मूर्ती तलावात किंवा इतर ठिकाणी विसर्जित केल्यानंतर त्याचे नुकसान होण्याऐवजी फायदा होईल, यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सुबुद्धी देवो हीच श्रीगणेशाच्या चरणी प्रार्थना.

चित्रप्रदर्शन, पोस्टर

गणेशोत्सवाचा मुख्य उद्देश प्रबोधन आणि जनसंघटन असल्याने प्रबोधनपर पोस्टर, चित्रप्रदर्शन यातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आवाहन करता येऊ शकते. लहान-लहान उपक्रमातून हा उत्सव आपण पर्यावरणपूरक करूशकतो. यासाठी प्रत्येकाने संकटमोचक गणपती होऊनच हा भगीरथाचा रथ ओढायचा आहे.

डीजे नकोच!

10 नंतर रात्री ध्वनिवर्धक बंद ठेवायला हवे. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत गुलाल उधळू नये. ध्वनिप्रदूषण होऊ नये यासाठी डीजेच्या वापरावर बंदी असायला हवी.

शाळा, रुग्णालय, वृद्धाश्रमाजवळ गणेशमूर्तीची स्थापना करू नये. निर्माल्य शक्यतो छोट्या खड्ड्यांमध्ये विसर्जित करावे. या खड्ड्यांवर माती टाकावी. याचा वापर पुढे सेंद्रिय खत म्हणून करता येऊ शकतो.

(लेखिका कुंभारी सोलापूर येथील अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या अधिष्ठाता आहेत.)

 

टॅग्स :environmentपर्यावरणGanesh Mahotsavगणेश महोत्सवpollutionप्रदूषण