शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

Ganesh Festival 2019 : निर्माल्य, गणेशमूर्ती दान करूया, जलसाठे सुरक्षित ठेवूया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 08:19 IST

निर्माल्य केवळ गणेशोत्सवातच नव्हे तर कधीही नदीपात्रात अथवा अन्य जलसाठ्यांत सोडणे टाळावे.

महेंद्र दातरंगे

नाशिक - नैसर्गिक जलसाठे पुढच्या पिढीपर्यंत सुरक्षित टिकवून ठेवण्याची आपली नैतिक जबाबदारी आहे. पाण्याचे महत्त्व आपण लक्षात घेत धार्मिक सण-उत्सव काळातही त्याबाबत कृतिशील उपाययोजना करायला हव्यात. निर्माल्य केवळ गणेशोत्सवातच नव्हे तर कधीही नदीपात्रात अथवा अन्य जलसाठ्यांत सोडणे टाळावे.

गणेशोत्सवात निर्माल्याचे प्रमाण वाढलेले असते. दहा दिवस गणेशमूर्तीला वाहिलेली फुले, दूर्वा, फुलांचे हार, फळे, नैवेद्य आदी वस्तूंचा निर्माल्य स्वरूपातील साठा अनंतचतुर्दशीला नदीपात्रात सोडला जातो. यामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन नैसर्गिक जलसाठ्यांची अपरिमित हानी होते. राज्यात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकाच्या माध्यमातून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून मूर्ती दान आणि निर्माल्य संकलनाची मोहीम साधारणत: १९९२ साली सुरू केली गेली. सर्वप्रथम कोल्हापूर आणि नंतर नाशिकला या विवेकाचा आवाज बुलंद झाला.

१९९५ साली नाशिकला निर्माल्य संकलन मोहीम राबविण्यास सुरुवात ‘अंनिस’ने केली. गणेशोत्सवात जलप्रदूषण होते हे पटवून देण्यासाठी मोठे प्रयत्न केले गेले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचेही लक्ष वेधले आणि न्यायालयातदेखील याविषयी दाद मागितली. काळानुरूप आज चित्र बदलले असून निर्माल्य, गणेशमूर्ती संकलनाचे काम आता अंनिसला करायची गरज भासत नाही. कारण विविध सामाजिक, समविचारी संघटना यासाठी सरसावल्या आहेत. निर्माल्य पाण्यात टाकल्यानंतर ते कुजून सडते. त्यामुळे पाण्यात आपोआप रासायनिक प्रक्रिया होऊन पाण्यातील जैवविविधता धोक्यात येते. हे टाळायला हवे.

मानसिकता बदला 

पीओपीपासून मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. लाखो किलो पीओपी नदीपात्रात सोडली जाते. ते जलसाठ्यात विरघळत नाही त्यामुळे नैसर्गिक जलस्रोत व जलचर जैवविविधता संकटात सापडते. घातक रासायनिक द्रव्यांमुळे त्वचारोगापासून गंभीर व दुर्धर आजारदेखील ओढावण्याचा धोका असतो.

नदीचे वाहते पाणी पुढे शेतीला मिळाले तर जमिनी नापिकी होतात. शेती उत्पादनावर त्याचा गंभीर परिणाम होतो. त्यामुळे लोकांनी मानसिकता बदलणे देखील गरजेचे आहे.

तरुणांनी पुढाकार घ्यावा

तरुणाईने पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि नैसर्गिक जलसाठे सुरक्षित ठेवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आपण नद्यांना मनापासून पवित्र मानून त्यांचे पावित्र्य राखण्याची गरज आहे. वाहत्या पाण्यात मूर्ती विसर्जित कराव्या या नियमात कालसापेक्ष बदल करणे गरजेचे आहे.

1997 साली केवळ १०२ नाशिककरांनी त्यांच्या विसर्जित मूर्ती समितीकडे दान केल्या. तेव्हापासून संपूर्ण राज्याला एक वेगळा दृष्टिकोन मिळाला.

(लेखक महाराष्ट्र अंनिस नाशिक शाखेचे जिल्हा कार्यवाह आहेत.)

शब्दांकन : अझहर शेख

 

टॅग्स :environmentपर्यावरणGanesh Mahotsavगणेशोत्सवWaterपाणीpollutionप्रदूषण