शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

Ganesh Festival 2019 : ध्वनिप्रदूषणविरहित गणेशोत्सव साजरा करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 10:04 IST

केवळ गणेशोत्सव नाही, तर प्रत्येक सार्वजनिक उत्सव साजरा करताना सामाजिक भान जपत ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे.

सुमेरा अब्दुलअली

मुंबई - केवळ गणेशोत्सव नाही, तर प्रत्येक सार्वजनिक उत्सव साजरा करताना सामाजिक भान जपत ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे. शांतता क्षेत्र, रहिवासी क्षेत्र, अशा क्षेत्रांत ध्वनिप्रदूषण होणार नाही यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी खबरदारी घेतली पाहिजे. कारण ध्वनिप्रदूषणाचे दूरगामी परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असतात. या कारणात्सव आरोग्य जपत ध्वनिप्रदूषण होणार नाही यासाठी सर्वांनाच आर्त हाक देण्याची गरज आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात ज्या ज्या ठिकाणी शांतता क्षेत्र आहे, तेथे वाद्यवृंद वाजवू नका. रुग्णालयाच्या परिसरात वाद्यवृदांचा आवाज होणार नाही, याची काळजी घ्या. गणेशोत्सवाच्या काळात सातत्याने वाजविली जात असलेली वाद्यवृंद, ढोल-ताशे, नाशिक ढोल याचा लहान मुलांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्या. आपण उत्सव साजरे करताना प्रामुख्याने याच गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. परिणामी, ध्वनिप्रदूषणामुळे होणारे आजार हे आयुष्यभर जडतात. रहिवासी क्षेत्र जेथे मोठ्या संख्येने मानवी वस्ती आहे, अशा ठिकाणी ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्यावी.

मुंबईमध्ये गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी ‘आवाज फाऊंडेशन’च्या वतीने आवाजाची तीव्रता मोजली जाते. गेल्या वर्षी न्यायालयाने निर्देश दिल्याने मंडळांनी त्याचे पालन केले होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मोठमोठे आवाज करणारे साऊंड सिस्टीम वापरात आणले नव्हते. यावेळीही मंडळांनी ध्वनिप्रदूषण कमी करण्यावर भर दिला पाहिजे. केवळ सरकार सांगते आहे, सेवाभावी संस्था सांगत आहेत म्हणून ‘आवाज’ कमी करू नये, तर आपल्या पुढील पिढ्यांना त्याचा त्रास होणार नाही आणि सार्वजनिक उत्सव ध्वनिप्रदूषणविरहित साजरे होतील यासाठी कार्यरत राहावे.

(लेखिका आवाज फाऊंडेशनच्या सर्वेसर्वा आहेत.)

महोत्सवासोबत आरोग्यही महत्त्वाचे

सार्वजनिक उत्सव साजरा करताना आरोग्याचा विचार करा. जसा उत्सव महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आरोग्यही महत्त्वाचे आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ज्या पद्धतीने कानठाळ्या बसवीत असलेल्या ‘साऊंड सिस्टीम’वर गेल्या वर्षी बंदी घालण्यात आली. त्याच पद्धतीने ‘मेटल ड्रम’च्या आवाजावर बंदी घालण्याची गरज आहे.

मानवी आरोग्य, जीवन महत्त्वाचे आहे. गणेश विसर्जनाच्या वेळी साधारण 55 डेसिबल आवाजाची मर्यादा असली पाहिजे. मात्र, आवाजाच्या लहरी 112 डेसिबलपर्यंत गेल्याच्या नोंदी आहेत.

आवाजाची मर्यादा

रहिवासी क्षेत्रात

55 डेसिबल दिवसा

45 डेसिबल रात्री

व्यावसायिक क्षेत्रात

65 डेसिबल दिवसा

55 डेसिबल रात्री

(स्रोत - आवाज फाऊंडेशन)

(शब्दांकन - सचिन लुंगसे)

 

टॅग्स :environmentपर्यावरणGanesh Mahotsavगणेश महोत्सवpollutionप्रदूषण