शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
2
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
3
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
4
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
5
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
6
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
7
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
8
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
9
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
10
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
11
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
12
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
13
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
14
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
15
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
16
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
17
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
18
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
19
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
20
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग

Ganesh Festival 2019 : ध्वनिप्रदूषणविरहित गणेशोत्सव साजरा करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 10:04 IST

केवळ गणेशोत्सव नाही, तर प्रत्येक सार्वजनिक उत्सव साजरा करताना सामाजिक भान जपत ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे.

सुमेरा अब्दुलअली

मुंबई - केवळ गणेशोत्सव नाही, तर प्रत्येक सार्वजनिक उत्सव साजरा करताना सामाजिक भान जपत ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे. शांतता क्षेत्र, रहिवासी क्षेत्र, अशा क्षेत्रांत ध्वनिप्रदूषण होणार नाही यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी खबरदारी घेतली पाहिजे. कारण ध्वनिप्रदूषणाचे दूरगामी परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असतात. या कारणात्सव आरोग्य जपत ध्वनिप्रदूषण होणार नाही यासाठी सर्वांनाच आर्त हाक देण्याची गरज आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात ज्या ज्या ठिकाणी शांतता क्षेत्र आहे, तेथे वाद्यवृंद वाजवू नका. रुग्णालयाच्या परिसरात वाद्यवृदांचा आवाज होणार नाही, याची काळजी घ्या. गणेशोत्सवाच्या काळात सातत्याने वाजविली जात असलेली वाद्यवृंद, ढोल-ताशे, नाशिक ढोल याचा लहान मुलांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्या. आपण उत्सव साजरे करताना प्रामुख्याने याच गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. परिणामी, ध्वनिप्रदूषणामुळे होणारे आजार हे आयुष्यभर जडतात. रहिवासी क्षेत्र जेथे मोठ्या संख्येने मानवी वस्ती आहे, अशा ठिकाणी ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्यावी.

मुंबईमध्ये गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी ‘आवाज फाऊंडेशन’च्या वतीने आवाजाची तीव्रता मोजली जाते. गेल्या वर्षी न्यायालयाने निर्देश दिल्याने मंडळांनी त्याचे पालन केले होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मोठमोठे आवाज करणारे साऊंड सिस्टीम वापरात आणले नव्हते. यावेळीही मंडळांनी ध्वनिप्रदूषण कमी करण्यावर भर दिला पाहिजे. केवळ सरकार सांगते आहे, सेवाभावी संस्था सांगत आहेत म्हणून ‘आवाज’ कमी करू नये, तर आपल्या पुढील पिढ्यांना त्याचा त्रास होणार नाही आणि सार्वजनिक उत्सव ध्वनिप्रदूषणविरहित साजरे होतील यासाठी कार्यरत राहावे.

(लेखिका आवाज फाऊंडेशनच्या सर्वेसर्वा आहेत.)

महोत्सवासोबत आरोग्यही महत्त्वाचे

सार्वजनिक उत्सव साजरा करताना आरोग्याचा विचार करा. जसा उत्सव महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आरोग्यही महत्त्वाचे आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ज्या पद्धतीने कानठाळ्या बसवीत असलेल्या ‘साऊंड सिस्टीम’वर गेल्या वर्षी बंदी घालण्यात आली. त्याच पद्धतीने ‘मेटल ड्रम’च्या आवाजावर बंदी घालण्याची गरज आहे.

मानवी आरोग्य, जीवन महत्त्वाचे आहे. गणेश विसर्जनाच्या वेळी साधारण 55 डेसिबल आवाजाची मर्यादा असली पाहिजे. मात्र, आवाजाच्या लहरी 112 डेसिबलपर्यंत गेल्याच्या नोंदी आहेत.

आवाजाची मर्यादा

रहिवासी क्षेत्रात

55 डेसिबल दिवसा

45 डेसिबल रात्री

व्यावसायिक क्षेत्रात

65 डेसिबल दिवसा

55 डेसिबल रात्री

(स्रोत - आवाज फाऊंडेशन)

(शब्दांकन - सचिन लुंगसे)

 

टॅग्स :environmentपर्यावरणGanesh Mahotsavगणेश महोत्सवpollutionप्रदूषण