शहरं
Join us  
Trending Stories
1
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
2
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
3
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
4
Pune Rape: तोंडावर स्प्रे फवारून तरुणीवर बलात्कार; डिलिव्हरी बॉयच्या कृत्यानं पुणे हादरलं
5
Mumbai Crime: शिक्षिका आधी कारमध्येच करायची बलात्कार, नंतर हॉटेलमध्ये...; वर्षभर केले विद्यार्थ्याचे शोषण; काय काय घडलं?
6
Bank of Baroda मध्ये जमा करा २,००,००० रुपये; मिळेल, ₹४७,०१५ चं फिक्स व्याज आणि हमीही, जाणून घ्या
7
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
8
आणखी एक मोठा अपघात, वैमानिकाचं नियंत्रण सुटलं, विमानतळाची भिंत तोडून विमान पुढे गेलं
9
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
10
कार खरेदीवर ४ लाखांपर्यंत डिस्काउंट; कंपन्या करत आहेत ‘स्टॉक’ क्लीअर
11
सिबिल स्कोअर खराब होता, स्टेट बँकेनं नोकरीच दिली नाही; कोर्टानंही म्हटलं, "पैशांच्या बाबतीत..."
12
भारताची पाकिस्तानवर आणखी एक कारवाई; सेलिब्रिटींबाबत घेतला 'असा' निर्णय!
13
पत्नीसोबत Post Office च्या स्कीममध्ये करा गुंतवणूक; दर महिन्याला मिळेल ₹९००० चं फिक्स व्याज
14
"अभिनेत्यांना सकाळी डाएट फुड अन् रात्री ड्रग्स हवे", पहलाज निहलानींचा खुलासा; अक्षयबद्दल म्हणाले...
15
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
16
बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!
17
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
18
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
19
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
20
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली

Ganesh Festival 2019 : ध्वनिप्रदूषणविरहित गणेशोत्सव साजरा करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 10:04 IST

केवळ गणेशोत्सव नाही, तर प्रत्येक सार्वजनिक उत्सव साजरा करताना सामाजिक भान जपत ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे.

सुमेरा अब्दुलअली

मुंबई - केवळ गणेशोत्सव नाही, तर प्रत्येक सार्वजनिक उत्सव साजरा करताना सामाजिक भान जपत ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे. शांतता क्षेत्र, रहिवासी क्षेत्र, अशा क्षेत्रांत ध्वनिप्रदूषण होणार नाही यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी खबरदारी घेतली पाहिजे. कारण ध्वनिप्रदूषणाचे दूरगामी परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असतात. या कारणात्सव आरोग्य जपत ध्वनिप्रदूषण होणार नाही यासाठी सर्वांनाच आर्त हाक देण्याची गरज आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात ज्या ज्या ठिकाणी शांतता क्षेत्र आहे, तेथे वाद्यवृंद वाजवू नका. रुग्णालयाच्या परिसरात वाद्यवृदांचा आवाज होणार नाही, याची काळजी घ्या. गणेशोत्सवाच्या काळात सातत्याने वाजविली जात असलेली वाद्यवृंद, ढोल-ताशे, नाशिक ढोल याचा लहान मुलांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्या. आपण उत्सव साजरे करताना प्रामुख्याने याच गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. परिणामी, ध्वनिप्रदूषणामुळे होणारे आजार हे आयुष्यभर जडतात. रहिवासी क्षेत्र जेथे मोठ्या संख्येने मानवी वस्ती आहे, अशा ठिकाणी ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्यावी.

मुंबईमध्ये गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी ‘आवाज फाऊंडेशन’च्या वतीने आवाजाची तीव्रता मोजली जाते. गेल्या वर्षी न्यायालयाने निर्देश दिल्याने मंडळांनी त्याचे पालन केले होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मोठमोठे आवाज करणारे साऊंड सिस्टीम वापरात आणले नव्हते. यावेळीही मंडळांनी ध्वनिप्रदूषण कमी करण्यावर भर दिला पाहिजे. केवळ सरकार सांगते आहे, सेवाभावी संस्था सांगत आहेत म्हणून ‘आवाज’ कमी करू नये, तर आपल्या पुढील पिढ्यांना त्याचा त्रास होणार नाही आणि सार्वजनिक उत्सव ध्वनिप्रदूषणविरहित साजरे होतील यासाठी कार्यरत राहावे.

(लेखिका आवाज फाऊंडेशनच्या सर्वेसर्वा आहेत.)

महोत्सवासोबत आरोग्यही महत्त्वाचे

सार्वजनिक उत्सव साजरा करताना आरोग्याचा विचार करा. जसा उत्सव महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आरोग्यही महत्त्वाचे आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ज्या पद्धतीने कानठाळ्या बसवीत असलेल्या ‘साऊंड सिस्टीम’वर गेल्या वर्षी बंदी घालण्यात आली. त्याच पद्धतीने ‘मेटल ड्रम’च्या आवाजावर बंदी घालण्याची गरज आहे.

मानवी आरोग्य, जीवन महत्त्वाचे आहे. गणेश विसर्जनाच्या वेळी साधारण 55 डेसिबल आवाजाची मर्यादा असली पाहिजे. मात्र, आवाजाच्या लहरी 112 डेसिबलपर्यंत गेल्याच्या नोंदी आहेत.

आवाजाची मर्यादा

रहिवासी क्षेत्रात

55 डेसिबल दिवसा

45 डेसिबल रात्री

व्यावसायिक क्षेत्रात

65 डेसिबल दिवसा

55 डेसिबल रात्री

(स्रोत - आवाज फाऊंडेशन)

(शब्दांकन - सचिन लुंगसे)

 

टॅग्स :environmentपर्यावरणGanesh Mahotsavगणेश महोत्सवpollutionप्रदूषण