जत तालुक्याच्या वाट्याला आलेले दुष्काळाचे संकट संपण्याचे नाव घेत नाही. तीव्र पाणीटंचाईमुळे पाण्यावाचून जिथे माणसं तहानली तेथे जनावरांसाठी पाणी आणायचे कोठून? अशी स्थिती आहे. पाण्यावाचून दावणीला बांधलेली जनावरे तहानलेली आहेत. ...
शेळी-मेंढीपालन हा उद्योग यशस्वी होण्यासाठी या पशुंच्या जातीची योग्य निवड आवश्यक असते. आपल्या देशात एकूण सुमारे २० शेळ्यांच्या जाती तसेच ४ मेंढ्याच्या जाती आहेत. ...
शेळ्या-मेंढ्यांना चाऱ्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. तरीसुद्धा चारा-पाणी मिळेनासा झाला आहे. त्यामुळे मेंढपाळ चाऱ्यासाठी भीमानदी काठी स्थलांतर करू लागले आहेत. तालुक्यात शेती व्यवसायाबरोबरच पशुपालनाचा व्यवसाय केला जातो. ...
बेदाण्याची प्रतवारी ग्रीडिंग करण्यासाठी इस्रायलच्या तंत्रज्ञानाचे नेटिंग मशीन उभा केलेले आहेत. बेदाण्यासाठी यांत्रिकीकरणाचा वापर होऊ लागला आहे. बेदाण्याची प्रतवारी, ग्रीडिंग करणे, स्वच्छता करणे सोपे झाले आहे. ...
विकतचे पाणी परवडत नाही म्हणून शेतकऱ्यांनी बागा सोडून दिल्या आहेत. काहींनी थोड्या थोड्या पाण्यावर बागा जगविण्याचा प्रयत्न केला आहे. पाणी कमी पडल्याने झाडांची प्रतिकार शक्ती कमी झाली आहे पुढील हंगामात किती उत्पादन देतील ही एक शंका आहे. ...
कायम दुष्काळी तालुका अशी जतची ओळख आहे. पण, याच जत तालुक्यात प्रयोगशील शेतकऱ्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जत येथील प्रगतशील शेतकरी सिकंदर पटाईत यांनी सिडलेस क्रिमसन वाणाची द्राक्ष लागण करून विक्रमी उत्पादन घेतले आहे. ...
प्रतिकूल हवामान, पाणीटंचाई, अवकाळी पाऊस, दुष्काळी परिस्थिती यामुळे जत तालुक्यात बेदाणा उत्पादनात कमालीची घट झाली आहे. प्रतिएकरी एक टनाचा उतारा कमी झाला. ...