शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
2
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
3
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
4
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
5
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
6
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
7
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
8
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
9
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
10
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
11
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
12
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
13
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
14
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
15
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
16
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
17
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
18
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
19
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
20
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान

Union Budget 2022: महामारीचा फटका बसलेल्या शिक्षणाला डिजिटल बूस्टर, केल्या विशेष तरतुदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 06:49 IST

Union Budget 2022 For Education : महामारीचा फटका बसलेल्या शिक्षणाला बूस्टर डोस देत केंद्रीय अर्थसंकल्पात डिजिटल विद्यापीठाची घोषणा झाली आहे.

 नवी दिल्ली / लातूर : कोरोना महामारीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे गेल्या दोन वर्षांत अपरिमित नुकसान झाले आहे. विशेषत: अनुसूचित जाती-जमाती आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना पुन्हा शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी डिजिटल शिक्षण व्यवस्था मजबूत करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केली.जागतिक दर्जाच्या डिजिटल विद्यापीठातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल. त्यासाठी दर्जेदार ई-शैक्षणिक साहित्य निर्मितीवर अधिक भर दिला जाणार आहे. देशभरातील नामांकित विद्यापीठे आणि शिक्षण संस्थांना जोडून शैक्षणिक विकास कार्यक्रम राबविला जाणार आहे. एकूणच डिजिटल शिक्षणाला चालना देणाऱ्या आणि आधीपासून अस्तित्वात असलेल्या सुविधांचा विस्तार करणाऱ्या घोषणाही केल्या. 

शैक्षणिक अर्थसंकल्प  १ लाख ४२७८ कोटींचा २०२२-२३ मध्ये शालेय आणि उच्च शिक्षणासाठी एकूण तरतूद १ लाख ४ हजार २७८ कोटींची असणार आहे. त्यात राष्ट्रीय शिक्षण मिशनसाठी ३९ हजार ५५३ कोटींची तरतूद आहे. मात्र मध्यान्ह भोजन योजनेसाठी तरतूद दिसत नाही.शहरी क्षेत्रांसाठी ५ सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन केले जाणार असून, त्यांच्यासाठी प्रत्येकी अडीचशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कौशल्य विकास कार्यक्रमांना नवे रूप दिले जाईल. २ लाख अंगणवाड्या सुधारित श्रेणीत येतील. त्यासाठी २०२६३ कोटींची तरतूद आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन केंद्र उघडण्याची घोषणा करण्यात आली आहे. कृषी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात संशोधनाला वाव दिला जाणार आहे. 

कोरोना काळात विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांच्यासाठी पूरक शिक्षण व्यवस्था उभी करण्याचे अर्थसंकल्पातील भाष्य समाधानकारक आहे. डिजिटल विद्यापीठ, शैक्षणिक वाहिन्यांची घोषणा पारंपरिक शिक्षणाला मदत ठरेल, अशी अपेक्षा आहे. परंतु, नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी कोणत्या व काय तरतुदी केल्या आहेत, हे अजून स्पष्ट नाही. नव्या धोरणाचा जितका गाजावाजा केला तितक्या प्रमाणात अंमलबजावणीसाठी तरतुदी दिसत नाहीत. जीडीपीच्या किती टक्के शिक्षणावर खर्च याची तर चर्चाच नाही.                   - प्राचार्य अनिरुद्ध जाधव, शिक्षण तज्ज्ञ

डिजिटल विद्यापीठ आणि शैक्षणिक वाहिन्या या दोन बाबी सोडल्या तर अर्थसंकल्पात नवीन काही नाही. नवीन शैक्षणिक धोरणाला प्रोत्साहन मिळेल, असे काही अर्थसंकल्पात दिसून येत नाही. महाराष्ट्रातही डिजिटल विद्यापीठ स्थापनेबाबतच्या यापूर्वीच हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे तेही नाविन्य नाही. परदेशातील विद्यापीठांना भारतात येण्यास परवानगी दिली असली, तरी ती विद्यापीठे ठराविक शहरांमध्येच येणार आहेत. त्याचा लाभ इतर प्रदेश विभागातील विद्यार्थ्यांना होण्यासाठी नियोजन आवश्यक आहे.- प्रा. नंदकुमार निकम, शिक्षण तज्ज्ञ

२०० शैक्षणिक वाहिन्या येणारएक वर्ग-एक वाहिनी धर्तीवर पहिली ते बारावीसाठी सध्या १२ शैक्षणिक वाहिन्या सुरू आहेत. दरम्यान, डिजिटल शिक्षणाला अधिक महत्व देेत देशभरातील प्रादेशिक भाषांमध्ये २०० शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. उत्कृष्ट ई-शैक्षणिक साहित्य निर्मिती करीत शिक्षकांना डिजिटल शिक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सर्व प्रादेशिक भाषांमध्ये दर्जेदार ई-पाठ्यक्रम तयार केला जाणार आहे. शैक्षणिक नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांना पूरक शिक्षण देण्याची सोय केली जाणार आहे. 

 

टॅग्स :Educationशिक्षणUnion Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019