शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला हायकाेर्टात आव्हान, साेमवारी हाेणाऱ्या सुनावणीकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 06:19 IST

राज्य सरकारने दहावीची परीक्षा रद्द करण्याबाबत एप्रिलमध्ये निर्णय घेतला. या निर्णयाला पुण्याचे रहिवासी  व प्राध्यापक असलेले धनंजय कुलकर्णी यांनी ॲड. उदय वारुंजीकर यांच्याद्वारे उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.

मुंबई : राज्यात कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याने राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाची इयत्ता दहावीचीपरीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. राज्य सरकार अकरावीसाठी प्रवेश देताना सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेऊ शकते, तर दहावीच्या परीक्षा का घेऊ शकत नाही? असा सवाल याचिकेद्वारे उपस्थित करण्यात आला आहे. या याचिकेवर येत्या सोमवारी सुनावणी ठेवण्यात आली आहे.राज्य सरकारने दहावीची परीक्षा रद्द करण्याबाबत एप्रिलमध्ये निर्णय घेतला. या निर्णयाला पुण्याचे रहिवासी  व प्राध्यापक असलेले धनंजय कुलकर्णी यांनी ॲड. उदय वारुंजीकर यांच्याद्वारे उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.  या याचिकेवर गुरुवारी न्या. के. के. तातेड व न्या. अभय अहुजा यांच्या खंडपीठापुढे गुरुवारी सुनावणी होती. सुनावणीवेळी वारुंजीकर यांनी दहावीची परीक्षा रद्द करण्यासंदर्भात सरकारने १२ मे रोजी शासन निर्णय जारी केल्याने आम्हाला त्यास आव्हान द्यायचे आहे. त्यामुळे याचिकेत सुधारणा करण्याची परवानगी द्या, असे न्यायालयाला सांगितले. वारुंजीकर यांचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने याचिकेत सुधारणा करण्याची परवानगी त्यांना दिली. त्यामुळे या याचिकेवर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता असून या सुनावणीकडे दहावीचे विद्यार्थी, पालक, शिक्षकांचेही लक्ष लागले आहे.

यासाठी घेतली काेर्टात धावकोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आधी सीबीएसई बोर्डाने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ राज्य सरकार व आयसीएसई बोर्डाने परीक्षा रद्दचा निर्णय घेतला. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे यंदा १६ लाख विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसणार होते. आधी दहावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या, त्यानंतर त्या रद्द करण्यात आल्या. शिक्षणमंत्र्यांनी अकरावीसाठी प्रवेश देताना सीईटी घेणार असल्याचे म्हटले. दहावीची परीक्षा रद्द करून अकरावी प्रवेशासाठी सीईटी कशी काय घेणार, असा सवाल करत सरकारच्या निर्णयाला कुलकर्णी यांनी न्यायालयात आव्हान दिले.

अकरावीसाठी सीईटी हाेणार असेल तर दहावीची परीक्षा का शक्य नाही?- राज्य सरकार जर बारावीच्या १४ लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेणार असले आणि अकरावीसाठी सीईटी घेणार असेल तर दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या १६ लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे शक्य का नाही? एसएससी, सीबीएसई आणि आयसीएसई अशा वेगवेगळ्या बोर्डांनी दहावीचे निकाल वेगवेगळ्या फॉर्म्युल्याने लावले तर आणखी गोंधळ वाढेल.- एकंदरीत शैक्षणिक क्षेत्रातच गोंधळ उडेल. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेऊन सरकारच्या या निर्णयात उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अशी विनंती याचिकेद्वारे करण्यात आली आहे.- सर्व बोर्डांनी आपत्कालीन कायद्यांतर्गत हा निर्णय घेतलेला नाही. मुळात दहावीची परीक्षा झाली नाही तर अनेक डिप्लोमा कोर्सेसच्या जागा भरल्या जाणार नाहीत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने बोर्डाचा निर्णय योग्य नाही. त्यामुळे राज्य सरकारचा हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

टॅग्स :examपरीक्षाSchoolशाळाTeacherशिक्षकssc examदहावी