शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

सहावीच्या फक्त ५३ टक्के विद्यार्थ्यांनाच येतात दहापर्यंतचे पाढे; राष्ट्रीय सर्वेक्षणातून आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 08:01 IST

केंद्र सरकारच्या शाळांमध्ये नववीतील विद्यार्थ्यांनी सर्व विषयांत सर्वोत्तम कामगिरी केली, तर तिसरी व सहावीमध्ये विद्यार्थी पिछाडीवर होते.

नवी दिल्ली : इयत्ता सहावीच्या केवळ ५३ टक्के विद्यार्थ्यांना दहापर्यंतचे पाढे म्हणता येतात, तर तिसरीतील ५५ टक्के विद्यार्थ्यांना ९९पर्यंतचे अंक चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडता येतात, असे शिक्षण मंत्रालयाच्या परफॉर्मन्स असेसमेंट, रिव्ह्यू अँड ॲनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट अर्थात - ‘परख’ (पीएआरएकेएच) राष्ट्रीय सर्वेक्षणातून समोर आले आहे.

‘परख’ (पूर्वीचे राष्ट्रीय उपलब्धी सर्वेक्षण - एनएएस) अंतर्गत ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ७८१ जिल्ह्यांमधील ७४,२२९ शाळांमधील तिसरी, सहावी व नववीच्या २१,१५,०२२ लाख विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये तिसरीतील केवळ ५८ टक्के विद्यार्थ्यांनाच दोन अंकी संख्यांची बेरीज आणि वजाबाकी करता येते, हेही स्पष्ट झाले. यासाठी इयत्ता तिसरीतील १,१५,०२२ विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात आले. केंद्र सरकारच्या शाळांमध्ये नववीतील विद्यार्थ्यांनी सर्व विषयांत सर्वोत्तम कामगिरी केली, तर तिसरी व सहावीमध्ये विद्यार्थी पिछाडीवर होते.

शिक्षण धोरणांमध्ये सुधारणा आवश्यकशिक्षणातील ही तफावत भरून काढण्यासाठी धोरण सुधारणा आणि अतिरिक्त शैक्षणिक साहाय्य देणे गरजेचे आहे, या निष्कर्षांच्या आधारे बहु-स्तरीय धोरणात्मक योजना आखण्यात येत आहे, असे शिक्षण सचिव संजय कुमार यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेत वाढ करण्यासाठी 'परख' संस्थेला राष्ट्रीय मूल्यांकनासाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरवण्याचे काम दिले गेले आहे.

अहवालात काय?तिसरीतील फक्त ५८ टक्के विद्यार्थ्यांना दोन-अंकी संख्यांची बेरीज-वजाबाकी करता येते.सहावीत अर्ध्याहून अधिक विद्यार्थ्यांना पाढे किंवा मूलभूत अंकगणित नीट समजत नाही.गणितात सर्वांत कमी गुण सहावीच्या विद्यार्थ्यांनी मिळविले - केवळ सरासरी ४६ टक्के.केंद्र सरकारी शाळांमधील नववीचे विद्यार्थी सर्व विषयांत सरस ठरले. ६ वी च्या बाबतीत सरकारी अनुदानित शाळांमध्ये गणितात गुण कमी होते.

टॅग्स :Educationशिक्षण