शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

अकरावी ॲडमिशन : एक लाख 17 हजार विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 08:58 IST

४८ हजार ७८८ जणांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय. पहिल्या फेरीत अलॉटमेंट झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये एक लाख पाच हजार ८६८ विद्यार्थी राज्य मंडळाचे आहेत. तसेच ८६ हजार १०९ विद्यार्थी खुल्या प्रवर्गातील आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विभागात अकरावी प्रवेशासाठी एकूण तीन लाख २० हजार ७१० जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी पहिल्या फेरीसाठी  एक लाख ९१ हजार ९३ जागा उपलब्ध झाल्या असून, त्यातील एक लाख १७ हजार ८८३ जागांवर विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली आहे.

पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ४८ हजार ७८८ असून, दुसऱ्या पसंतीचे महाविद्यालय १८ हजार ८०४ विद्यार्थ्यांना प्राप्त झाले. तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय बारा हजार ७९९ विद्यार्थ्यांना मिळाले. पहिल्या फेरीत अलॉटमेंट झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये एक लाख पाच हजार ८६८ विद्यार्थी राज्य मंडळाचे आहेत. तसेच ८६ हजार १०९ विद्यार्थी खुल्या प्रवर्गातील आहेत. 

अलॉट झालेल्या जागांमध्ये विज्ञान शाखेच्या ४० हजार ३५४, कला शाखेच्या ११ हजार ७६८ आणि वाणिज्य शाखेच्या ६५ हजार ०२८ जागांचा समावेश आहे. एचएसव्हीसीच्या ७३३ जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्यांमध्ये विज्ञान शाखेच्या १९ हजार १०६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. वाणिज्य शाखेच्या २२ हजार ६०० आणि कला शाखेच्या सहा हजार ३९८ विद्यार्थ्यांना पसंतीचे पहिल्या क्रमांकाचे महाविद्यालय प्राप्त झाले आहे. पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये प्रवेश मिळालेल्या मुलांची संख्या ५६ हजार ६१३, तर मुलींची संख्या ६१ हजार २६९ आहे. 

पहिल्या गुणवत्ता यादीत सीबीएसई मंडळाच्या तीन हजार ८१०, आयसीएसई मंडळाच्या सात हजार १६७, आयबी मंडळाच्या पाच, आयजीसीएसई मंडळाच्या ५७१, एनआयओएस मंडळाच्या १६४ व इतर मंडळाच्या २९८ जागा अलॉट झाल्या. इडब्ल्यूएससाठी १४ हजार ४४६ जागा असून, पहिल्या फेरीत २८१ अर्ज आले, त्यातील २७३ जागा अलॉट झाल्या. 

प्रवेश बंधनकारकपहिला पसंतीक्रम मिळालेल्या विद्यार्थ्याने निवडलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक आहे. जर प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश घेतला नाही अथवा नाकारला तर अशा विद्यार्थ्यांना पुढील नियमित फेऱ्यांमध्ये संधी दिली जाणार नाही. त्यांना विशेष फेरीपर्यंत थांबावे लागणार आहे. हे प्रवेश २७ ऑगस्ट ते ३० ऑगस्टच्या दरम्यान घेणे बंधनकारक आहे. 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल