शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
4
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
5
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
6
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
7
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
8
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
9
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
10
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
11
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
12
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
13
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
14
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
15
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
16
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
17
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
18
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
19
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
20
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...

अकरावी ॲडमिशन : एक लाख 17 हजार विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 08:58 IST

४८ हजार ७८८ जणांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय. पहिल्या फेरीत अलॉटमेंट झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये एक लाख पाच हजार ८६८ विद्यार्थी राज्य मंडळाचे आहेत. तसेच ८६ हजार १०९ विद्यार्थी खुल्या प्रवर्गातील आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विभागात अकरावी प्रवेशासाठी एकूण तीन लाख २० हजार ७१० जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी पहिल्या फेरीसाठी  एक लाख ९१ हजार ९३ जागा उपलब्ध झाल्या असून, त्यातील एक लाख १७ हजार ८८३ जागांवर विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली आहे.

पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ४८ हजार ७८८ असून, दुसऱ्या पसंतीचे महाविद्यालय १८ हजार ८०४ विद्यार्थ्यांना प्राप्त झाले. तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय बारा हजार ७९९ विद्यार्थ्यांना मिळाले. पहिल्या फेरीत अलॉटमेंट झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये एक लाख पाच हजार ८६८ विद्यार्थी राज्य मंडळाचे आहेत. तसेच ८६ हजार १०९ विद्यार्थी खुल्या प्रवर्गातील आहेत. 

अलॉट झालेल्या जागांमध्ये विज्ञान शाखेच्या ४० हजार ३५४, कला शाखेच्या ११ हजार ७६८ आणि वाणिज्य शाखेच्या ६५ हजार ०२८ जागांचा समावेश आहे. एचएसव्हीसीच्या ७३३ जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्यांमध्ये विज्ञान शाखेच्या १९ हजार १०६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. वाणिज्य शाखेच्या २२ हजार ६०० आणि कला शाखेच्या सहा हजार ३९८ विद्यार्थ्यांना पसंतीचे पहिल्या क्रमांकाचे महाविद्यालय प्राप्त झाले आहे. पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये प्रवेश मिळालेल्या मुलांची संख्या ५६ हजार ६१३, तर मुलींची संख्या ६१ हजार २६९ आहे. 

पहिल्या गुणवत्ता यादीत सीबीएसई मंडळाच्या तीन हजार ८१०, आयसीएसई मंडळाच्या सात हजार १६७, आयबी मंडळाच्या पाच, आयजीसीएसई मंडळाच्या ५७१, एनआयओएस मंडळाच्या १६४ व इतर मंडळाच्या २९८ जागा अलॉट झाल्या. इडब्ल्यूएससाठी १४ हजार ४४६ जागा असून, पहिल्या फेरीत २८१ अर्ज आले, त्यातील २७३ जागा अलॉट झाल्या. 

प्रवेश बंधनकारकपहिला पसंतीक्रम मिळालेल्या विद्यार्थ्याने निवडलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक आहे. जर प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश घेतला नाही अथवा नाकारला तर अशा विद्यार्थ्यांना पुढील नियमित फेऱ्यांमध्ये संधी दिली जाणार नाही. त्यांना विशेष फेरीपर्यंत थांबावे लागणार आहे. हे प्रवेश २७ ऑगस्ट ते ३० ऑगस्टच्या दरम्यान घेणे बंधनकारक आहे. 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल