शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
2
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
3
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
4
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
5
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
6
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
7
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
8
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
9
Samudra Shastra: नुसत्या हसण्यावरून स्वभाव ओळखता येतो? समुद्र शास्त्रात मिळते उत्तर
10
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
11
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
12
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
13
Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
14
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
15
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा
16
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
17
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
18
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
19
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
20
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन

अकरावी ॲडमिशन : एक लाख 17 हजार विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 08:58 IST

४८ हजार ७८८ जणांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय. पहिल्या फेरीत अलॉटमेंट झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये एक लाख पाच हजार ८६८ विद्यार्थी राज्य मंडळाचे आहेत. तसेच ८६ हजार १०९ विद्यार्थी खुल्या प्रवर्गातील आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विभागात अकरावी प्रवेशासाठी एकूण तीन लाख २० हजार ७१० जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी पहिल्या फेरीसाठी  एक लाख ९१ हजार ९३ जागा उपलब्ध झाल्या असून, त्यातील एक लाख १७ हजार ८८३ जागांवर विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली आहे.

पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ४८ हजार ७८८ असून, दुसऱ्या पसंतीचे महाविद्यालय १८ हजार ८०४ विद्यार्थ्यांना प्राप्त झाले. तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय बारा हजार ७९९ विद्यार्थ्यांना मिळाले. पहिल्या फेरीत अलॉटमेंट झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये एक लाख पाच हजार ८६८ विद्यार्थी राज्य मंडळाचे आहेत. तसेच ८६ हजार १०९ विद्यार्थी खुल्या प्रवर्गातील आहेत. 

अलॉट झालेल्या जागांमध्ये विज्ञान शाखेच्या ४० हजार ३५४, कला शाखेच्या ११ हजार ७६८ आणि वाणिज्य शाखेच्या ६५ हजार ०२८ जागांचा समावेश आहे. एचएसव्हीसीच्या ७३३ जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्यांमध्ये विज्ञान शाखेच्या १९ हजार १०६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. वाणिज्य शाखेच्या २२ हजार ६०० आणि कला शाखेच्या सहा हजार ३९८ विद्यार्थ्यांना पसंतीचे पहिल्या क्रमांकाचे महाविद्यालय प्राप्त झाले आहे. पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये प्रवेश मिळालेल्या मुलांची संख्या ५६ हजार ६१३, तर मुलींची संख्या ६१ हजार २६९ आहे. 

पहिल्या गुणवत्ता यादीत सीबीएसई मंडळाच्या तीन हजार ८१०, आयसीएसई मंडळाच्या सात हजार १६७, आयबी मंडळाच्या पाच, आयजीसीएसई मंडळाच्या ५७१, एनआयओएस मंडळाच्या १६४ व इतर मंडळाच्या २९८ जागा अलॉट झाल्या. इडब्ल्यूएससाठी १४ हजार ४४६ जागा असून, पहिल्या फेरीत २८१ अर्ज आले, त्यातील २७३ जागा अलॉट झाल्या. 

प्रवेश बंधनकारकपहिला पसंतीक्रम मिळालेल्या विद्यार्थ्याने निवडलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक आहे. जर प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश घेतला नाही अथवा नाकारला तर अशा विद्यार्थ्यांना पुढील नियमित फेऱ्यांमध्ये संधी दिली जाणार नाही. त्यांना विशेष फेरीपर्यंत थांबावे लागणार आहे. हे प्रवेश २७ ऑगस्ट ते ३० ऑगस्टच्या दरम्यान घेणे बंधनकारक आहे. 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल