शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
7
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
8
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
9
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
10
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
11
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
12
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
13
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
14
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
15
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
17
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
18
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
19
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी

शाळेची फी भरु न शकल्यानं आत्महत्येचा प्रयत्न करणारी विद्यार्थिनी १० च्या परीक्षेत पहिली!; शिक्षण मंत्री म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 19:46 IST

आर्थिक चणचणीमुळे शिक्षण घेता येत नसल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या इयत्ता १० वीच्या विद्यार्थिनीनं बोर्डाच्या पुरवणी परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावला ...

आर्थिक चणचणीमुळे शिक्षण घेता येत नसल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या इयत्ता १० वीच्या विद्यार्थिनीनं बोर्डाच्या पुरवणी परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावला आहे. शाळेची फी भरू न शकल्यानं शाळेच्या व्यवस्थापनानं हॉल तिकीट देण्यास विद्यार्थिनीला नकार दिला होता. कर्नाटकच्या तुमकुरू जिल्ह्यातील कोराटागेरे शहरातील १६ वर्षीय ग्रीष्मा नायक हिच्यासोबत ही घटना घडली होती. ग्रीष्मा हिनं हॉल तिकीट न मिळाल्यानं आत्महत्येचा विचार केला होता. पण या घटनेवर मात करुन ग्रीष्मा नायक हिनं इयत्ता १० वीच्या पुरवणी परीक्षेत टॉप केलं आहे. 

ग्रीष्मा नायक शेतकरी कुटुंबातील मुलगी असून तिला आता चांगल्या महाविद्यालयात विज्ञान शाखेत (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी) प्रवेश घ्यायचा आहे. इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार ग्रीष्मानं यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच बोर्डाची तयारी सुरू केली होती. "कोरोना संकटामुळे शाळेची फी भरणं शक्य नव्हतं. त्यामुळे शाळेनं वर्गात बसवण्यास नकार दिला. पण माझी मोठी बहिण कार्थाना हिनं मुख्य विषयांचा अभ्यास करण्यासाठी मला खूप मदत केली. परीक्षेच्या तीन महिन्यांआधीपासूनच भाषेच्या अभ्यासाला सुरुवात केली होती. पण फी न भरल्यामुळे शाळेकडून आपलं नाव रजिस्टर न केल्याचं लक्षात आल्यानंतर मी खूप खचले होते", असं ग्रीष्मानं सांगितलं. 

डॉक्टर होण्याचं ग्रीष्माचं स्वप्नग्रीष्माचं डॉक्टर होण्याचं स्वप्न ती नक्की पूर्ण करेल अशी खात्री तिच्या आई-वडिलांना आहे. ग्रीष्मा इयत्ता ९ वीपर्यंत दक्षिण कन्नड जिल्ह्यातील अल्वा येथील इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होती. शाळेची फी न भरल्यामुळे तिला शाळेत येण्यास बंदी घालण्यात आली होती. इतकंच नव्हे, तर दहावीच्या परीक्षेसाठी तिच्या नावाची देखील शाळेनं नोंदणी केली नाही. शाळेनं तिला हॉल तिकीट देण्यास नकार दिला होता. 

शिक्षण मंत्र्यांनी दखल घेतल्यानंतर मिळाली परीक्षेला परवानगीग्रीष्माच्या आई-वडिलांनी शाळेविरोधात थेट पब्लिक इंस्ट्रक्शन विभागातील उप-संचालकांकडे धाव घेतली. त्यानंतर हे प्रकरण थेट तत्कालीन प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री एस सुरेश कुमार यांच्यापर्यंत पोहोचलं. राज्यभरातून अनेक ठिकाणी अशा घटना समोर आल्यानंतर शाळेची फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना हॉल तिकीट नाकारण्याच्या घटना होणार नाहीत याची काळजी शाळेनं घेण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले. इतकंच नव्हे, तर मंत्री सुरेश कुमार यांनी थेट ग्रीष्माची राहत्या घरी भेट घेऊन तिला पुरवणी परीक्षेला बसण्याची संधी देण्याचं आश्वासन दिलं होतं. 

ग्रीष्मानं मिळालेल्या संधीचं सोनं करत परीक्षेत अव्वल क्रमांक प्राप्त केला. याची माहिती एस कुमार यांना मिळताच ग्रीष्मा आता इतर विद्यार्थ्यांसाठी आदर्श बनली आहे, असं वक्तव्य केलं आहे. 

टॅग्स :ssc examदहावीKarnatakकर्नाटक