शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
2
Parvez Ansari: की-पॅड मोबाईल, आंतरराष्ट्रीय सीमकार्ड अन्...; अन्सारीच्या घरात 'एटीएस'ला काय काय मिळाले?
3
दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
4
Munbai Local: धावत्या लोकलमध्ये ३० वर्षीय महिलेसोबत घृणास्पद प्रकार, प्रवाशांमध्ये संताप!
5
Crime News : सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’सारखी हत्या! वाढदिवसाच्या दिवशीच रक्तरंजित शेवट; धक्कादायक कारण आले समोर
6
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
7
हळव्या मनाचा कणखर बाप! लेकीसाठी ९०० किमीचा प्रवास, युनिव्हर्सिटीबाहेर लावला 'घरच्या जेवणा'चा स्टॉल
8
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
9
एका रात्रीत 'नॅशनल क्रश' बनली मराठमोळी गिरीजा ओक, निळ्या साडीतील फोटो व्हायरल, अभिनेत्रीचं वय ऐकून बसेल धक्का
10
Vastu Tips: पोपटाला आकर्षून घेणे म्हणजे धन-सुखाला आमंत्रण; तो नियमित यावा म्हणून खास टिप्स!
11
"तुम्हा दोघांना टीम इंडियात खेळायचं असेल तर..." रोहित-विराटला BCCIनी दिली शेवटची 'वॉर्निंग'
12
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
13
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
14
६ हजार तपासणी मोहिमा, २ लाख प्रवाशांवर कारवाई; कोकण रेल्वेने वसूल केला १५ .२१ कोटींचा दंड
15
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
16
IPL 2026 : विराटच्या RCB वर बंगळुरुकरांना निरोप देण्याची वेळ; पुणेकर पाहुणचारासाठी नटले!
17
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
18
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
19
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
20
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?

संमती पत्राअभावी अकरावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द, पालक विद्यार्थी आक्रमक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 11:09 IST

ऐनवेळी प्रवेश रद्द झाल्याने शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती 

ठळक मुद्देऐनवेळी प्रवेश रद्द झाल्याने शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती असं का झालं याचा खुलासा करावा, पालकांची मागणी

कन्सेंट फॉर्म (संमती पत्र) नसल्याने अकरावीच्या ६५ विद्यार्थ्यांचे निश्चित झालेले प्रवेश रद्द करण्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. अकरावी प्रवेशाच्या प्रक्रियेचा शेवटच्या टप्प्याचे अखेरचे ३ ते ४ दिवस शिल्लक असताना महाविद्यालयाने एकाएकी प्रवेश रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आल्याने सदर विद्यार्थी आणि त्यांचे पालक प्रचंड संभ्रमात आहेत व हवालदिल झाले आहेत. मुंबईतील चेंबूर येथील एनजी आचार्य आणि डी.के.मराठे कनिष्ठ महाविद्यालयात हा प्रकार घडला असून या ६५ विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून शालेय शिक्षण विभागाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.

अकरावी प्रवेशप्रक्रियेत अनेक नामांकित महाविद्यलयांत प्रवेश पूर्ण झाले आहेत. तर अनेक महाविद्यालयांत ७५ टक्क्यांहून अधिक प्रवेश होऊन त्यांचे ऑनलाईन वर्ग ही सुरु झाले आहेत. अशातच विद्यार्थ्यांची नावे गुणवत्ता यादीत येऊन  त्यांनी महाविद्यालयांत जाऊन शुल्क भरून प्रवेश निश्चिती केल्यावर आता अचानक ६५ विद्यार्थ्यांची यादी लावून या सदर विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाल्याचे महाविद्यालयाकडून पालक विद्यार्थ्यांना कळविण्यात आले आहे. महाविद्यालयाकडून प्रवेश प्रक्रिया राबवताना प्रवेश निश्चित करताना घोळ झाला असून आता विद्यार्थ्यांना शिक्षा भोगावी लागावी लागणार असल्याचे आरोप पालकांनी केले आहेत.  मुंबई उपसंचालक कार्यालयाअंतर्गत ८४३ कॉलेजांमध्ये ही प्रक्रिया राबविली गेली तेथे असे काहीच झाले नाही. नेमके याच कॉलेजमध्ये असे का झाले याबाबत योग्य तो खुलासा होणे आवश्यक आहे, अशी मागणी पालकांच्या वतीने स्वाती पाटील यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात उपसांचालक कार्यालयही पत्र लिहिले आहे.

महाविद्यालयांत अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश होत आहेत आणि संमतीपत्र हा प्रक्रियेचाच भाग आहे. मात्र वारंवार विद्यार्थ्यांना आठवण करूनही त्यांनी प्रवेश प्रक्रियेची ही पायरी वगळली असल्याने प्रवेश प्रक्रिया अपूर्णच राहिली असल्याची माहिती महाविद्यायच्या प्राचार्या डॉ. विद्यागौरी लेले यांनी स्पष्ट केले. दरम्यान अकरावीच्या इतर विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग व शिक्षण सुरु आहे. मात्र आक्रमक झालेले पालक अकरावीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रवेश अचानक रद्द होत असेल तर आम्ही प्रवेश नेमके आता कुठे घ्यायचे ? असा प्रश्न विचारत आहेत.

या ६५ विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान नेमके काय झाले हे जाणून घेत आहोत याबाबत योग्य ती छाननी करुन पुढील कार्यवाही केली जाईल.संदीप संगवे , उपसंचालक , मुंबई विभाग

टॅग्स :Studentविद्यार्थीTeacherशिक्षकcollegeमहाविद्यालयMumbaiमुंबईChemburचेंबूर