शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

संमती पत्राअभावी अकरावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द, पालक विद्यार्थी आक्रमक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 11:09 IST

ऐनवेळी प्रवेश रद्द झाल्याने शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती 

ठळक मुद्देऐनवेळी प्रवेश रद्द झाल्याने शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती असं का झालं याचा खुलासा करावा, पालकांची मागणी

कन्सेंट फॉर्म (संमती पत्र) नसल्याने अकरावीच्या ६५ विद्यार्थ्यांचे निश्चित झालेले प्रवेश रद्द करण्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. अकरावी प्रवेशाच्या प्रक्रियेचा शेवटच्या टप्प्याचे अखेरचे ३ ते ४ दिवस शिल्लक असताना महाविद्यालयाने एकाएकी प्रवेश रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आल्याने सदर विद्यार्थी आणि त्यांचे पालक प्रचंड संभ्रमात आहेत व हवालदिल झाले आहेत. मुंबईतील चेंबूर येथील एनजी आचार्य आणि डी.के.मराठे कनिष्ठ महाविद्यालयात हा प्रकार घडला असून या ६५ विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून शालेय शिक्षण विभागाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.

अकरावी प्रवेशप्रक्रियेत अनेक नामांकित महाविद्यलयांत प्रवेश पूर्ण झाले आहेत. तर अनेक महाविद्यालयांत ७५ टक्क्यांहून अधिक प्रवेश होऊन त्यांचे ऑनलाईन वर्ग ही सुरु झाले आहेत. अशातच विद्यार्थ्यांची नावे गुणवत्ता यादीत येऊन  त्यांनी महाविद्यालयांत जाऊन शुल्क भरून प्रवेश निश्चिती केल्यावर आता अचानक ६५ विद्यार्थ्यांची यादी लावून या सदर विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाल्याचे महाविद्यालयाकडून पालक विद्यार्थ्यांना कळविण्यात आले आहे. महाविद्यालयाकडून प्रवेश प्रक्रिया राबवताना प्रवेश निश्चित करताना घोळ झाला असून आता विद्यार्थ्यांना शिक्षा भोगावी लागावी लागणार असल्याचे आरोप पालकांनी केले आहेत.  मुंबई उपसंचालक कार्यालयाअंतर्गत ८४३ कॉलेजांमध्ये ही प्रक्रिया राबविली गेली तेथे असे काहीच झाले नाही. नेमके याच कॉलेजमध्ये असे का झाले याबाबत योग्य तो खुलासा होणे आवश्यक आहे, अशी मागणी पालकांच्या वतीने स्वाती पाटील यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात उपसांचालक कार्यालयही पत्र लिहिले आहे.

महाविद्यालयांत अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश होत आहेत आणि संमतीपत्र हा प्रक्रियेचाच भाग आहे. मात्र वारंवार विद्यार्थ्यांना आठवण करूनही त्यांनी प्रवेश प्रक्रियेची ही पायरी वगळली असल्याने प्रवेश प्रक्रिया अपूर्णच राहिली असल्याची माहिती महाविद्यायच्या प्राचार्या डॉ. विद्यागौरी लेले यांनी स्पष्ट केले. दरम्यान अकरावीच्या इतर विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग व शिक्षण सुरु आहे. मात्र आक्रमक झालेले पालक अकरावीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रवेश अचानक रद्द होत असेल तर आम्ही प्रवेश नेमके आता कुठे घ्यायचे ? असा प्रश्न विचारत आहेत.

या ६५ विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान नेमके काय झाले हे जाणून घेत आहोत याबाबत योग्य ती छाननी करुन पुढील कार्यवाही केली जाईल.संदीप संगवे , उपसंचालक , मुंबई विभाग

टॅग्स :Studentविद्यार्थीTeacherशिक्षकcollegeमहाविद्यालयMumbaiमुंबईChemburचेंबूर