शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
4
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
5
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
6
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 
7
Stock Markets Today: वीकली एक्स्पायरीच्या दिवशी शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, निफ्टी ३० अंकांनी वाढून उघडला; ऑटो स्टॉक्समध्ये गुंतवणूकदारांची खरेदी
8
कंपनी मालकीन कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली, घटस्फोटासाठी कोट्यवधि रुपये मोजले; प्रकरण न्यायालयात पोहोचले
9
VIRAL : धडकी भरवणारी 'सफर'! अफगाणिस्तानातून विमानाच्या चाकात लपून भारतात पोहोचला १३ वर्षांचा मुलगा
10
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
11
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
12
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
13
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
14
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
15
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
16
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
17
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
18
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
19
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
20
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर

संमती पत्राअभावी अकरावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द, पालक विद्यार्थी आक्रमक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 11:09 IST

ऐनवेळी प्रवेश रद्द झाल्याने शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती 

ठळक मुद्देऐनवेळी प्रवेश रद्द झाल्याने शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती असं का झालं याचा खुलासा करावा, पालकांची मागणी

कन्सेंट फॉर्म (संमती पत्र) नसल्याने अकरावीच्या ६५ विद्यार्थ्यांचे निश्चित झालेले प्रवेश रद्द करण्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. अकरावी प्रवेशाच्या प्रक्रियेचा शेवटच्या टप्प्याचे अखेरचे ३ ते ४ दिवस शिल्लक असताना महाविद्यालयाने एकाएकी प्रवेश रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आल्याने सदर विद्यार्थी आणि त्यांचे पालक प्रचंड संभ्रमात आहेत व हवालदिल झाले आहेत. मुंबईतील चेंबूर येथील एनजी आचार्य आणि डी.के.मराठे कनिष्ठ महाविद्यालयात हा प्रकार घडला असून या ६५ विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून शालेय शिक्षण विभागाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.

अकरावी प्रवेशप्रक्रियेत अनेक नामांकित महाविद्यलयांत प्रवेश पूर्ण झाले आहेत. तर अनेक महाविद्यालयांत ७५ टक्क्यांहून अधिक प्रवेश होऊन त्यांचे ऑनलाईन वर्ग ही सुरु झाले आहेत. अशातच विद्यार्थ्यांची नावे गुणवत्ता यादीत येऊन  त्यांनी महाविद्यालयांत जाऊन शुल्क भरून प्रवेश निश्चिती केल्यावर आता अचानक ६५ विद्यार्थ्यांची यादी लावून या सदर विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाल्याचे महाविद्यालयाकडून पालक विद्यार्थ्यांना कळविण्यात आले आहे. महाविद्यालयाकडून प्रवेश प्रक्रिया राबवताना प्रवेश निश्चित करताना घोळ झाला असून आता विद्यार्थ्यांना शिक्षा भोगावी लागावी लागणार असल्याचे आरोप पालकांनी केले आहेत.  मुंबई उपसंचालक कार्यालयाअंतर्गत ८४३ कॉलेजांमध्ये ही प्रक्रिया राबविली गेली तेथे असे काहीच झाले नाही. नेमके याच कॉलेजमध्ये असे का झाले याबाबत योग्य तो खुलासा होणे आवश्यक आहे, अशी मागणी पालकांच्या वतीने स्वाती पाटील यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात उपसांचालक कार्यालयही पत्र लिहिले आहे.

महाविद्यालयांत अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश होत आहेत आणि संमतीपत्र हा प्रक्रियेचाच भाग आहे. मात्र वारंवार विद्यार्थ्यांना आठवण करूनही त्यांनी प्रवेश प्रक्रियेची ही पायरी वगळली असल्याने प्रवेश प्रक्रिया अपूर्णच राहिली असल्याची माहिती महाविद्यायच्या प्राचार्या डॉ. विद्यागौरी लेले यांनी स्पष्ट केले. दरम्यान अकरावीच्या इतर विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग व शिक्षण सुरु आहे. मात्र आक्रमक झालेले पालक अकरावीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रवेश अचानक रद्द होत असेल तर आम्ही प्रवेश नेमके आता कुठे घ्यायचे ? असा प्रश्न विचारत आहेत.

या ६५ विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान नेमके काय झाले हे जाणून घेत आहोत याबाबत योग्य ती छाननी करुन पुढील कार्यवाही केली जाईल.संदीप संगवे , उपसंचालक , मुंबई विभाग

टॅग्स :Studentविद्यार्थीTeacherशिक्षकcollegeमहाविद्यालयMumbaiमुंबईChemburचेंबूर