शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

जि.प.चा औरंगाबाद पॅटर्न

By गजानन दिवाण | Published: July 31, 2018 11:55 AM

ज्ञानरचनावाद, हसत-खेळत शिक्षणासह विद्यार्थ्यांना इंग्रजीचे ज्ञान देण्यासाठी विविध उपक्रम या शाळांमधून राबविले गेले. त्यातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला. ग्रामीण भागातील विद्यार्थीही चमकू लागले. विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना शाळांकडून आणखी काय हवे? म्हणूनच औरंगाबाद जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांना चांगले दिवस आले.

पाल्याला इंग्रजी शाळेत टाकण्याची ऐपत नाही, त्यांचीच शाळा म्हणजे जिल्हा परिषदेची शाळा, अशीच काहीशी समजूत आम्ही करून घेतली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा ओस आणि इंग्रजी शाळांमध्ये प्रवेशासाठी रांगा ‘कोस-कोस’ असे चित्र जून महिन्यात सर्वत्र दिसते. याला जबाबदार जितकी पालकांची वृत्ती, तेवढीच किंबहुना त्यापेक्षा जास्त जबाबदार जिल्हा परिषद शाळा आणि प्रशासनाची वृत्ती.

स्पर्धेच्या युगात कोणी कितीही पळाले तरी आम्ही बदलणार नाही, असाच जणू चंग जि.प. शाळा आणि प्रशासनाने बांधलेला दिसतो. फुकटातले शिक्षण नाकारून वर्षाला हजारो रुपये खर्च करण्याएवढा मराठी पालक उधळखोर नक्कीच नाही. शिक्षणावर एवढा पैसा उधळावा एवढी त्याची परिस्थितीही नाही. मग तो असे का करतो, याचा विचार व्हायला हवा. माझे पाल्य इंग्रजी शाळेत शिकते या एकमेव सामाजिक ‘स्टेटस’साठीच हे घडते असे म्हणणे म्हणजे जि.प. शाळा आणि राज्य शासनाच्या उणिवांना झाकण्यासारखे आहे.

वाढत्या स्पर्धेची गती ओळखून जि.प. शाळांनीही स्वत: बदल घडवून आणला असता, तर हे दिवस आलेच नसते. अजूनही जि.प. शाळांनी हा बदल स्वीकारलेला नाही. त्याला अपवाद ठरली ती औरंगाबाद जिल्हा परिषद. आहे त्या परिस्थितीत जिल्हा परिषद आणि राज्य शासनाने ठरविल्यास हा बदल अगदी सहज शक्य आहे हे औरंगाबाद जिल्हा परिषदेने दाखवून दिले आहे. इंग्रजी शाळांप्रमाणेच किंवा त्यापेक्षा अधिक गुणवान शिक्षक जिल्हा परिषदेकडे आहेत. अतिरिक्त कामांचा ताण कमी करताना या शिक्षकांना केवळ दिशा देण्याची गरज आहे.

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाकडे आलेल्या अहवालानुसार, जिल्ह्यात नऊ तालुक्यांमधील ३६९ शाळांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षात दोन हजार ७३३ विद्यार्थी वाढल्याची नोंद झाली आहे. यात इंग्रजी शाळांतून आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ६४७, तर खाजगी शाळेतून आलेल्यांची संख्या ८२० इतकी आहे. एकीकडे राज्यभरात जिल्हा परिषद शाळांची स्थिती चिंताजनक असताना असे औरंगाबाद जिल्ह्यात काय घडले? कशामुळे या शाळांमध्ये विद्यार्थी वाढले?

ज्ञानरचनावाद, हसत-खेळत शिक्षणासह विद्यार्थ्यांना इंग्रजीचे ज्ञान देण्यासाठी विविध उपक्रम या शाळांमधून राबविले गेले. त्यातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला. ग्रामीण भागातील विद्यार्थीही चमकू लागले. विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना शाळांकडून आणखी काय हवे? म्हणूनच औरंगाबाद जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांना चांगले दिवस आले.

राज्याची परिस्थिती काय? सध्या महाराष्टÑात जिल्हा परिषदेची एकही इंग्रजी शाळा नाही. २०१६-१७ मध्ये राज्यभरात १२.८२ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. यात तब्बल ८.६२ लाख विद्यार्थी इंग्रजी माध्यमातले होते. उर्वरित विद्यार्थ्यांमध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्यांची संख्या किती? हे असेच सुरू राहिले, तर जिल्हा परिषद शाळांचे भविष्य सांगण्यासाठी कुठल्या मोठ्या भविष्यकाराची गरज लागणार नाही. मग काय करायचे? प्रत्येक जिल्हा परिषदांनी ‘औरंगाबाद पॅटर्न’ राबवायचा.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदEducationशिक्षणStudentविद्यार्थी