शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

चुकीचे पायंडे घातक ठरतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 06:52 IST

मागील काही वर्षांपासून इथल्या काही पक्षांनी निवडणुकांपूर्वीच आपला पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरविण्याची किंवा तो जाहीर करण्याची पद्धत सुरू केली आहे.

द्रमुक पक्षाचे प्रमुख एम. के. स्टॅलीन यांनी त्यांच्या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवावे, असा प्रस्ताव ठेवला. राहुल गांधी यांनी तो अद्याप स्वीकारला नसला, तरी खरे पाहता देशाचा पंतप्रधान कोण, हे ठरविण्याचा विशेष अधिकार केवळ लोकसभेतील लोकनियुक्त प्रतिनिधींचाच असतो. इतरांनी त्यात हस्तक्षेप करणे, ही बाब संसदीय लोकशाहीच्या संकेतांशी व अपेक्षांशी सुसंगत नाही.

मागील काही वर्षांपासून इथल्या काही पक्षांनी निवडणुकांपूर्वीच आपला पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरविण्याची किंवा तो जाहीर करण्याची पद्धत सुरू केली आहे. ही प्रथा आपल्या संसदीय लोकशाहीच्या विरोधात जाणारी आहे. लोकशाही संकेतांना पायदळी तुडविणाऱ्या या बाबीकडे अक्षम्य स्वरूपाचे दुर्लक्ष झाल्यामुळे, इतर राजकीय पक्षही आता या बाबीचे अंधानुकरण करू लागले आहेत. स्टॅलीन यांनी भावी पंतप्रधानपदासाठी काँग्रेस अध्यक्षांचे नाव सुचविणे, हा या अंधानुकरणाचाच एक भाग आहे. भारताने १९५० साली आपल्या देशासाठी संसदीय लोकशाहीचा स्वीकार केलेला असला, तरी देशातील काही मंडळींंना संसदीय लोकशाही नको असून, त्यांना इथे अध्यक्षीय लोकशाही आणण्याची घाई झालेली आहे, ही बाब आता लपून राहिलेली नाही. भारतातील संसदीय लोकशाहीच्या अनेक संकेतांना पायदळी तुडविण्याचा प्रयत्न त्यामुळेच ते सातत्याने करत असतात. भारतातील काही राजकीय पक्षांनी अशा मंडळींच्या सुप्त मनसुब्यांना कळत-नकळत मोठ्या प्रमाणात खतपाणी घातलेले आहे किंवा निदान त्यांना फोफावू दिलेले आहे. अशा परिस्थितीत संसदीय लोकशाहीचेही अनेक पाठीराखे समज-गैरसमजातून, कळत-नकळत किंवा अज्ञानातून अशा गोष्टींमागे फरफटत जाऊ लागले आहेत व अशा चुकीच्या प्रथांचे अंधानुकरण करत आहेत, असे दिसते.

देशातील जनमत जर जागृत, संयमी आणि संतुलित भूमिकेपासून क्षणभर जरी ढळले, तरी अशा ठिकाणच्या लोकशाहीचे हुकूमशाहीत परिवर्तन होण्यास वेळ लागत नाही. जर्मनीचा हुकूमशाहा हिटलर हा अशाच प्रकारे लोकशाही मार्गाने सत्तेवर आला होता व त्यानंतर घटनादुरुस्ती करून तो जर्मनीचा सर्वसत्ताधीश झाला होता. वंशश्रेष्ठत्वासारख्या विध्वंसक कल्पनांच्या आहारी जाऊन, त्याने कालांतराने स्वत:च्याच देशाची राखरांगोळी करून घेतली होती. भारतीय संविधानकारांच्या नजरेसमोर अशी अनेक उदाहरणे असल्यामुळे, तसेच भारतातील मिश्र संस्कृतीच्या उपस्थितीत कोणती गोष्ट या देशाला एकसंध ठेवू शकेल, याची चांगली जाण असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता आपल्या देशात संसदीय लोकशाही प्रस्थापित करण्यात आलेली आहे. तिच्या संकेतांना पायदळी तुडविणाºया प्रथांना त्यामुळेच भारतीय जनतेने कायमचे हद्दपार करण्याची गरज आहे.

भारतात हिंदू, मुस्लीम, बौद्ध, जैन, शीख, ख्रिश्चन अशा विविध धर्मांचे लोक आजवर एकोप्याने राहात आलेले आहेत. मात्र, या एकोप्याला धार्मिक ध्रुवीकरणामुळे अलीकडच्या काळात तडा जात आहे. भारत हा सर्वधर्मियांचा देश आहे. इथल्या शासकीय व्यवहारात कुठल्याही एकाच धर्माला थारा नाही. विशेषत: हिंदू धर्माच्या प्रभावाखाली इथल्या करोडोंच्या जनसमूहाचा मरणांतिक छळ झालेला आहे. हा छळ थांबविण्याचे काम केवळ भारतीय संविधानाने आजवर केलेले आहे. अशा स्थितीत कोणत्याही एका धर्माचे वर्चस्व भारतात पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे छळवादाला पुन्हा आमंत्रण देण्यासारखे आहे.

भारतीय संविधानाने सर्व भारतीयांच्या धर्मस्वातंत्र्याला आता मूलभूत अधिकार म्हणून प्रस्थापित केलेले आहे व संविधानाच्या पहिल्याच कलमाने आपल्या या प्राणप्रिय देशाला ‘भारत’ असे नाव दिलेले आहे. या नावाला अनुल्लेखाने मारत एका धर्माशी जवळीक साधणारा व इतर धर्मियांबाबत दुरावा निर्माण करणारा उल्लेख महत्त्वपूर्ण संविधानिक पदांवर बसलेले लोकही आज करत आहेत. यातून एक अत्यंत चुकीचा पायंडा ते पाडत आहेत व देशाला चुकीचा संदेशही ते कळत-नकळत देत आहेत. हे त्यांनी ताबडतोब बंद केले पाहिजे.भारतातील अनेक लोकप्रतिनिधी जरी आपापल्या राजकीय पक्षांच्या दबावामुळे कदाचित अशा गोष्टींविरुद्ध आवाज उठविण्यात कमी पडत असतील, तरी सर्वसामान्य भारतीय लोकांनी मात्र अशा गोष्टींंविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे. शेवटी लोकशाही ही लोकांच्या हितासाठी आहे आणि तिचे संरक्षण करण्याची अंतिम जबाबदारी लोकांचीच आहे. धर्म आणि जातींच्या मुद्द्यांवरून जर आपल्या देशात पुन्हा तणाव निर्माण झाला किंवा देश मानसिकदृष्ट्या दुभंगला, तर त्याची फळे शेवटी सर्वसामान्य लोकांनाच भोगावी लागतात. त्यामुळे भारतीय लोकांनी संतुलित भूमिका घेऊन सर्व प्रकारच्या संकुचित प्रेरणा व संकुचित आदर्शांचा त्याग केला पाहिजे. यापुढे चुकीचे पायंडे पडणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. कारण शेवटी स्वत:विरूद्धच दुभंगलेले घर फार काळ तग धरू शकत नसते, यात काहीच शंका नाही.डॉ. रविनंद नामदेव होवाळ( प्रवर्तक, संविधान जनजागृती अभियान )

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस