शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

आजचा अग्रलेख - निसर्गाचा प्रकोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 02:12 IST

खासदार सुनील तटकरे यांनी पाच हजार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला आहे.

महाराष्ट्राच्या हिरव्यागार कोकण किनारपट्टीला गेल्या बुधवारी ‘निसर्ग’ चक्र ीवादळाचा फटका बसला. हवामान खात्याने पुरेशी पूर्वकल्पना दिली होती त्यामुळे सुदैवाने मनुष्यहानी टाळण्यात प्रशासनाला यश आले. तब्बल ४० हजारांहून अधिक लोकांचे सुरक्षित स्थानी स्थलांतर करण्यात आले होते. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. परंतु, या चक्र ीवादळाचे रूप इतके रौद्र होते की, अक्षरश: लाखो संसार उघड्यावर आले. छत्रपती शिवरायांच्या रायगड जिल्ह्याची पुरती वाताहात झाली. चक्र ीवादळ होऊन आता जवळपास आठवडा होईल, तरीही नुकसानीचे मोजमाप अद्याप पूर्ण झालेले नाही आणि येत्या काही दिवसांत हे पंचनामे संपतील अशी चिन्हे नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगेचच रायगड जिल्ह्याला भेट दिली. त्यांनी तातडीची १०० कोटींची मदत देऊन जखम थोडी भरण्याचा प्रयत्न केला. शरद पवारही कोकण दौऱ्यावर गेले.

खासदार सुनील तटकरे यांनी पाच हजार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला आहे. प्रशासकीय पातळीवर थोड्या वेगाने हालचाली सुरू आहेत. तरीही या किनारपट्टीवरील सौंदर्याने नटलेल्या जिल्ह्यांची जी भयंकर पडझड झाली. ती भरून निघण्यास मोठा कालावधी लागणार हे नक्की. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड तालुक्यांना मोठा फटका बसला, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही तालुके या चक्र ीवादळाच्या तडाख्यात सापडले. मात्र, रायगड जिल्ह्यातील मुरुड, रोहे, माणगाव, अलिबाग, म्हसळा, पेण, तळा, महाड, श्रीवर्धन, पोलादपूर या तालुक्यांची मोठी हानी झाल्याचे चित्र आहे. सुपारीच्या बागा, नारळाची झाडे, आंबा, काजूच्या बागा यांचे अतोनात नुकसान झाले. एकट्या रायगड जिल्ह्यात सुमारे एक लाखाहून अधिक घरांची पडझड झाली. १४ हजारांहून अधिक विजेचे खांब पडले. अनेक झाडे विजेच्या तारांवर पडल्याने वीजपुरवठा ठप्प झाला. गेला आठवडाभर अनेक गावांत वीजपुरवठा खंडित आहे. त्याचा प्रामुख्याने फटका पाणीपुरवठा यंत्रणेला बसला आहे. शेकडो गावांत पिण्याचे पाणी नाही. गावेच्या गावे तहानलेली आहेत. मोबाईल टॉवरही पडल्याने संपर्क यंत्रणा ठप्प आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने प्रशासकीय यंत्रणाही गावांपर्यंत पोहोचू शकत नाही, असे विदारक चित्र रायगड जिल्ह्याचे आहे. त्यामुळे नुकसानीचा नेमका आकडा समजू शकलेला नाही. मात्र, गेल्या कित्येक दशकांत इतक्या तीव्र अस्मानी संकटाचा भयावह अनुभव विशेषत: रायगड जिल्ह्याने घेतलेला नव्हता, असे ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले. त्यावरून या चक्रीवादळाची कल्पना यायला हरकत नाही. आधीच कोरोनाचे संकट घोंगावत असताना कोकणावर ‘निसर्ग’ चक्रीवादळाने जो आघात केला, त्यातून या जिल्ह्यांना सावरायला नक्की वेळ लागेल यात शंका नाही. परंतु, शासकीय पातळीवर जर गांभीर्याने दखल घेऊन हालचाली केल्या आणि नुकसान झालेल्यांच्या घरांपर्यंत मदत पोहोचविण्याची व्यवस्था सुयोग्य पार पडली, तर कोकण पुन्हा झटकन् उभे राहील. कोकणचे सुपुत्र सगळे महामुंबईत चाकरमानी आहेत. कोरोनामुळे काहीजण आधीच गावाकडे पोहोचले आहेत. काही स्वयंसेवी संघटनांनी मदतीचा हात पुढे केला आहे. परंतु, नुकसानीचे प्रमाण इतके अक्राळविक्राळ आहे की, या तुटपुंज्या मदतीने फारसा फरक पडणार नाही. शरद पवार कोकण दौºयावर आपतग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी आले आहेत. त्यांच्या दौºयामुळे कोकणी माणसांच्या अपेक्षा उंचावणे स्वाभाविक आहे. सबंध कोकणाचा नुकसानीचा आकडा मोठा असल्याने राज्य सरकारला केंद्राच्या मदतीवर अवलंबून राहावे लागणार आहे. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याने राज्याला केंद्राशिवाय पर्याय नाही. केंद्राने हात आखडता घेतल्यास त्यांच्याकडून मदत खेचून आणण्याची धमक राज्य सरकारला ठेवावी लागणार आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या या कोकण भूमीला पुन्हा उभे करण्यासाठी प्रसंगी केंद्राशी दोन हात करण्यास भाग पडले तरी चालेल. परंतु, पावसाळा तोंडावर असताना फार वेळ दवडून चालणार नाही. वेगाने होणाºया मदतकार्याच्या हालचालीच कोकणाला चक्रीवादळाच्या जखमेतून लवकर बाहेर काढतील हे मात्र नक्की.रायगड जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये आर्थिक संकटाबरोबर पाणीसंकटही उभे राहिले आहे. ते प्राधान्याने सोडवायला हवे. चक्रीवादळाने जोरदार आघात केल्याने कोकणी जनता मदतीच्या प्रतीक्षेत आहे. त्यांना मदतीचा हात मिळायला हवा.

टॅग्स :Lokmatलोकमतcycloneचक्रीवादळ