शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख - निसर्गाचा प्रकोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 02:12 IST

खासदार सुनील तटकरे यांनी पाच हजार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला आहे.

महाराष्ट्राच्या हिरव्यागार कोकण किनारपट्टीला गेल्या बुधवारी ‘निसर्ग’ चक्र ीवादळाचा फटका बसला. हवामान खात्याने पुरेशी पूर्वकल्पना दिली होती त्यामुळे सुदैवाने मनुष्यहानी टाळण्यात प्रशासनाला यश आले. तब्बल ४० हजारांहून अधिक लोकांचे सुरक्षित स्थानी स्थलांतर करण्यात आले होते. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. परंतु, या चक्र ीवादळाचे रूप इतके रौद्र होते की, अक्षरश: लाखो संसार उघड्यावर आले. छत्रपती शिवरायांच्या रायगड जिल्ह्याची पुरती वाताहात झाली. चक्र ीवादळ होऊन आता जवळपास आठवडा होईल, तरीही नुकसानीचे मोजमाप अद्याप पूर्ण झालेले नाही आणि येत्या काही दिवसांत हे पंचनामे संपतील अशी चिन्हे नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगेचच रायगड जिल्ह्याला भेट दिली. त्यांनी तातडीची १०० कोटींची मदत देऊन जखम थोडी भरण्याचा प्रयत्न केला. शरद पवारही कोकण दौऱ्यावर गेले.

खासदार सुनील तटकरे यांनी पाच हजार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला आहे. प्रशासकीय पातळीवर थोड्या वेगाने हालचाली सुरू आहेत. तरीही या किनारपट्टीवरील सौंदर्याने नटलेल्या जिल्ह्यांची जी भयंकर पडझड झाली. ती भरून निघण्यास मोठा कालावधी लागणार हे नक्की. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड तालुक्यांना मोठा फटका बसला, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही तालुके या चक्र ीवादळाच्या तडाख्यात सापडले. मात्र, रायगड जिल्ह्यातील मुरुड, रोहे, माणगाव, अलिबाग, म्हसळा, पेण, तळा, महाड, श्रीवर्धन, पोलादपूर या तालुक्यांची मोठी हानी झाल्याचे चित्र आहे. सुपारीच्या बागा, नारळाची झाडे, आंबा, काजूच्या बागा यांचे अतोनात नुकसान झाले. एकट्या रायगड जिल्ह्यात सुमारे एक लाखाहून अधिक घरांची पडझड झाली. १४ हजारांहून अधिक विजेचे खांब पडले. अनेक झाडे विजेच्या तारांवर पडल्याने वीजपुरवठा ठप्प झाला. गेला आठवडाभर अनेक गावांत वीजपुरवठा खंडित आहे. त्याचा प्रामुख्याने फटका पाणीपुरवठा यंत्रणेला बसला आहे. शेकडो गावांत पिण्याचे पाणी नाही. गावेच्या गावे तहानलेली आहेत. मोबाईल टॉवरही पडल्याने संपर्क यंत्रणा ठप्प आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने प्रशासकीय यंत्रणाही गावांपर्यंत पोहोचू शकत नाही, असे विदारक चित्र रायगड जिल्ह्याचे आहे. त्यामुळे नुकसानीचा नेमका आकडा समजू शकलेला नाही. मात्र, गेल्या कित्येक दशकांत इतक्या तीव्र अस्मानी संकटाचा भयावह अनुभव विशेषत: रायगड जिल्ह्याने घेतलेला नव्हता, असे ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले. त्यावरून या चक्रीवादळाची कल्पना यायला हरकत नाही. आधीच कोरोनाचे संकट घोंगावत असताना कोकणावर ‘निसर्ग’ चक्रीवादळाने जो आघात केला, त्यातून या जिल्ह्यांना सावरायला नक्की वेळ लागेल यात शंका नाही. परंतु, शासकीय पातळीवर जर गांभीर्याने दखल घेऊन हालचाली केल्या आणि नुकसान झालेल्यांच्या घरांपर्यंत मदत पोहोचविण्याची व्यवस्था सुयोग्य पार पडली, तर कोकण पुन्हा झटकन् उभे राहील. कोकणचे सुपुत्र सगळे महामुंबईत चाकरमानी आहेत. कोरोनामुळे काहीजण आधीच गावाकडे पोहोचले आहेत. काही स्वयंसेवी संघटनांनी मदतीचा हात पुढे केला आहे. परंतु, नुकसानीचे प्रमाण इतके अक्राळविक्राळ आहे की, या तुटपुंज्या मदतीने फारसा फरक पडणार नाही. शरद पवार कोकण दौºयावर आपतग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी आले आहेत. त्यांच्या दौºयामुळे कोकणी माणसांच्या अपेक्षा उंचावणे स्वाभाविक आहे. सबंध कोकणाचा नुकसानीचा आकडा मोठा असल्याने राज्य सरकारला केंद्राच्या मदतीवर अवलंबून राहावे लागणार आहे. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याने राज्याला केंद्राशिवाय पर्याय नाही. केंद्राने हात आखडता घेतल्यास त्यांच्याकडून मदत खेचून आणण्याची धमक राज्य सरकारला ठेवावी लागणार आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या या कोकण भूमीला पुन्हा उभे करण्यासाठी प्रसंगी केंद्राशी दोन हात करण्यास भाग पडले तरी चालेल. परंतु, पावसाळा तोंडावर असताना फार वेळ दवडून चालणार नाही. वेगाने होणाºया मदतकार्याच्या हालचालीच कोकणाला चक्रीवादळाच्या जखमेतून लवकर बाहेर काढतील हे मात्र नक्की.रायगड जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये आर्थिक संकटाबरोबर पाणीसंकटही उभे राहिले आहे. ते प्राधान्याने सोडवायला हवे. चक्रीवादळाने जोरदार आघात केल्याने कोकणी जनता मदतीच्या प्रतीक्षेत आहे. त्यांना मदतीचा हात मिळायला हवा.

टॅग्स :Lokmatलोकमतcycloneचक्रीवादळ