शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
2
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
3
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
4
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
5
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
6
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
7
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
8
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
9
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
10
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
11
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
12
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
13
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
14
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
15
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
16
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
17
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
18
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
19
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
20
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख - निसर्गाचा प्रकोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 02:12 IST

खासदार सुनील तटकरे यांनी पाच हजार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला आहे.

महाराष्ट्राच्या हिरव्यागार कोकण किनारपट्टीला गेल्या बुधवारी ‘निसर्ग’ चक्र ीवादळाचा फटका बसला. हवामान खात्याने पुरेशी पूर्वकल्पना दिली होती त्यामुळे सुदैवाने मनुष्यहानी टाळण्यात प्रशासनाला यश आले. तब्बल ४० हजारांहून अधिक लोकांचे सुरक्षित स्थानी स्थलांतर करण्यात आले होते. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. परंतु, या चक्र ीवादळाचे रूप इतके रौद्र होते की, अक्षरश: लाखो संसार उघड्यावर आले. छत्रपती शिवरायांच्या रायगड जिल्ह्याची पुरती वाताहात झाली. चक्र ीवादळ होऊन आता जवळपास आठवडा होईल, तरीही नुकसानीचे मोजमाप अद्याप पूर्ण झालेले नाही आणि येत्या काही दिवसांत हे पंचनामे संपतील अशी चिन्हे नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगेचच रायगड जिल्ह्याला भेट दिली. त्यांनी तातडीची १०० कोटींची मदत देऊन जखम थोडी भरण्याचा प्रयत्न केला. शरद पवारही कोकण दौऱ्यावर गेले.

खासदार सुनील तटकरे यांनी पाच हजार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला आहे. प्रशासकीय पातळीवर थोड्या वेगाने हालचाली सुरू आहेत. तरीही या किनारपट्टीवरील सौंदर्याने नटलेल्या जिल्ह्यांची जी भयंकर पडझड झाली. ती भरून निघण्यास मोठा कालावधी लागणार हे नक्की. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड तालुक्यांना मोठा फटका बसला, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही तालुके या चक्र ीवादळाच्या तडाख्यात सापडले. मात्र, रायगड जिल्ह्यातील मुरुड, रोहे, माणगाव, अलिबाग, म्हसळा, पेण, तळा, महाड, श्रीवर्धन, पोलादपूर या तालुक्यांची मोठी हानी झाल्याचे चित्र आहे. सुपारीच्या बागा, नारळाची झाडे, आंबा, काजूच्या बागा यांचे अतोनात नुकसान झाले. एकट्या रायगड जिल्ह्यात सुमारे एक लाखाहून अधिक घरांची पडझड झाली. १४ हजारांहून अधिक विजेचे खांब पडले. अनेक झाडे विजेच्या तारांवर पडल्याने वीजपुरवठा ठप्प झाला. गेला आठवडाभर अनेक गावांत वीजपुरवठा खंडित आहे. त्याचा प्रामुख्याने फटका पाणीपुरवठा यंत्रणेला बसला आहे. शेकडो गावांत पिण्याचे पाणी नाही. गावेच्या गावे तहानलेली आहेत. मोबाईल टॉवरही पडल्याने संपर्क यंत्रणा ठप्प आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने प्रशासकीय यंत्रणाही गावांपर्यंत पोहोचू शकत नाही, असे विदारक चित्र रायगड जिल्ह्याचे आहे. त्यामुळे नुकसानीचा नेमका आकडा समजू शकलेला नाही. मात्र, गेल्या कित्येक दशकांत इतक्या तीव्र अस्मानी संकटाचा भयावह अनुभव विशेषत: रायगड जिल्ह्याने घेतलेला नव्हता, असे ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले. त्यावरून या चक्रीवादळाची कल्पना यायला हरकत नाही. आधीच कोरोनाचे संकट घोंगावत असताना कोकणावर ‘निसर्ग’ चक्रीवादळाने जो आघात केला, त्यातून या जिल्ह्यांना सावरायला नक्की वेळ लागेल यात शंका नाही. परंतु, शासकीय पातळीवर जर गांभीर्याने दखल घेऊन हालचाली केल्या आणि नुकसान झालेल्यांच्या घरांपर्यंत मदत पोहोचविण्याची व्यवस्था सुयोग्य पार पडली, तर कोकण पुन्हा झटकन् उभे राहील. कोकणचे सुपुत्र सगळे महामुंबईत चाकरमानी आहेत. कोरोनामुळे काहीजण आधीच गावाकडे पोहोचले आहेत. काही स्वयंसेवी संघटनांनी मदतीचा हात पुढे केला आहे. परंतु, नुकसानीचे प्रमाण इतके अक्राळविक्राळ आहे की, या तुटपुंज्या मदतीने फारसा फरक पडणार नाही. शरद पवार कोकण दौºयावर आपतग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी आले आहेत. त्यांच्या दौºयामुळे कोकणी माणसांच्या अपेक्षा उंचावणे स्वाभाविक आहे. सबंध कोकणाचा नुकसानीचा आकडा मोठा असल्याने राज्य सरकारला केंद्राच्या मदतीवर अवलंबून राहावे लागणार आहे. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याने राज्याला केंद्राशिवाय पर्याय नाही. केंद्राने हात आखडता घेतल्यास त्यांच्याकडून मदत खेचून आणण्याची धमक राज्य सरकारला ठेवावी लागणार आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या या कोकण भूमीला पुन्हा उभे करण्यासाठी प्रसंगी केंद्राशी दोन हात करण्यास भाग पडले तरी चालेल. परंतु, पावसाळा तोंडावर असताना फार वेळ दवडून चालणार नाही. वेगाने होणाºया मदतकार्याच्या हालचालीच कोकणाला चक्रीवादळाच्या जखमेतून लवकर बाहेर काढतील हे मात्र नक्की.रायगड जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये आर्थिक संकटाबरोबर पाणीसंकटही उभे राहिले आहे. ते प्राधान्याने सोडवायला हवे. चक्रीवादळाने जोरदार आघात केल्याने कोकणी जनता मदतीच्या प्रतीक्षेत आहे. त्यांना मदतीचा हात मिळायला हवा.

टॅग्स :Lokmatलोकमतcycloneचक्रीवादळ