शहरं
Join us  
Trending Stories
1
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
2
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
3
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
4
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्सला भिडण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
5
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
6
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
7
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
8
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
9
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
10
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
11
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
12
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
13
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
14
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
15
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
16
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
17
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
18
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
19
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
20
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 

आजचा अग्रलेख - निसर्गाचा प्रकोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 02:12 IST

खासदार सुनील तटकरे यांनी पाच हजार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला आहे.

महाराष्ट्राच्या हिरव्यागार कोकण किनारपट्टीला गेल्या बुधवारी ‘निसर्ग’ चक्र ीवादळाचा फटका बसला. हवामान खात्याने पुरेशी पूर्वकल्पना दिली होती त्यामुळे सुदैवाने मनुष्यहानी टाळण्यात प्रशासनाला यश आले. तब्बल ४० हजारांहून अधिक लोकांचे सुरक्षित स्थानी स्थलांतर करण्यात आले होते. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. परंतु, या चक्र ीवादळाचे रूप इतके रौद्र होते की, अक्षरश: लाखो संसार उघड्यावर आले. छत्रपती शिवरायांच्या रायगड जिल्ह्याची पुरती वाताहात झाली. चक्र ीवादळ होऊन आता जवळपास आठवडा होईल, तरीही नुकसानीचे मोजमाप अद्याप पूर्ण झालेले नाही आणि येत्या काही दिवसांत हे पंचनामे संपतील अशी चिन्हे नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगेचच रायगड जिल्ह्याला भेट दिली. त्यांनी तातडीची १०० कोटींची मदत देऊन जखम थोडी भरण्याचा प्रयत्न केला. शरद पवारही कोकण दौऱ्यावर गेले.

खासदार सुनील तटकरे यांनी पाच हजार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला आहे. प्रशासकीय पातळीवर थोड्या वेगाने हालचाली सुरू आहेत. तरीही या किनारपट्टीवरील सौंदर्याने नटलेल्या जिल्ह्यांची जी भयंकर पडझड झाली. ती भरून निघण्यास मोठा कालावधी लागणार हे नक्की. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड तालुक्यांना मोठा फटका बसला, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही तालुके या चक्र ीवादळाच्या तडाख्यात सापडले. मात्र, रायगड जिल्ह्यातील मुरुड, रोहे, माणगाव, अलिबाग, म्हसळा, पेण, तळा, महाड, श्रीवर्धन, पोलादपूर या तालुक्यांची मोठी हानी झाल्याचे चित्र आहे. सुपारीच्या बागा, नारळाची झाडे, आंबा, काजूच्या बागा यांचे अतोनात नुकसान झाले. एकट्या रायगड जिल्ह्यात सुमारे एक लाखाहून अधिक घरांची पडझड झाली. १४ हजारांहून अधिक विजेचे खांब पडले. अनेक झाडे विजेच्या तारांवर पडल्याने वीजपुरवठा ठप्प झाला. गेला आठवडाभर अनेक गावांत वीजपुरवठा खंडित आहे. त्याचा प्रामुख्याने फटका पाणीपुरवठा यंत्रणेला बसला आहे. शेकडो गावांत पिण्याचे पाणी नाही. गावेच्या गावे तहानलेली आहेत. मोबाईल टॉवरही पडल्याने संपर्क यंत्रणा ठप्प आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने प्रशासकीय यंत्रणाही गावांपर्यंत पोहोचू शकत नाही, असे विदारक चित्र रायगड जिल्ह्याचे आहे. त्यामुळे नुकसानीचा नेमका आकडा समजू शकलेला नाही. मात्र, गेल्या कित्येक दशकांत इतक्या तीव्र अस्मानी संकटाचा भयावह अनुभव विशेषत: रायगड जिल्ह्याने घेतलेला नव्हता, असे ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले. त्यावरून या चक्रीवादळाची कल्पना यायला हरकत नाही. आधीच कोरोनाचे संकट घोंगावत असताना कोकणावर ‘निसर्ग’ चक्रीवादळाने जो आघात केला, त्यातून या जिल्ह्यांना सावरायला नक्की वेळ लागेल यात शंका नाही. परंतु, शासकीय पातळीवर जर गांभीर्याने दखल घेऊन हालचाली केल्या आणि नुकसान झालेल्यांच्या घरांपर्यंत मदत पोहोचविण्याची व्यवस्था सुयोग्य पार पडली, तर कोकण पुन्हा झटकन् उभे राहील. कोकणचे सुपुत्र सगळे महामुंबईत चाकरमानी आहेत. कोरोनामुळे काहीजण आधीच गावाकडे पोहोचले आहेत. काही स्वयंसेवी संघटनांनी मदतीचा हात पुढे केला आहे. परंतु, नुकसानीचे प्रमाण इतके अक्राळविक्राळ आहे की, या तुटपुंज्या मदतीने फारसा फरक पडणार नाही. शरद पवार कोकण दौºयावर आपतग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी आले आहेत. त्यांच्या दौºयामुळे कोकणी माणसांच्या अपेक्षा उंचावणे स्वाभाविक आहे. सबंध कोकणाचा नुकसानीचा आकडा मोठा असल्याने राज्य सरकारला केंद्राच्या मदतीवर अवलंबून राहावे लागणार आहे. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याने राज्याला केंद्राशिवाय पर्याय नाही. केंद्राने हात आखडता घेतल्यास त्यांच्याकडून मदत खेचून आणण्याची धमक राज्य सरकारला ठेवावी लागणार आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या या कोकण भूमीला पुन्हा उभे करण्यासाठी प्रसंगी केंद्राशी दोन हात करण्यास भाग पडले तरी चालेल. परंतु, पावसाळा तोंडावर असताना फार वेळ दवडून चालणार नाही. वेगाने होणाºया मदतकार्याच्या हालचालीच कोकणाला चक्रीवादळाच्या जखमेतून लवकर बाहेर काढतील हे मात्र नक्की.रायगड जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये आर्थिक संकटाबरोबर पाणीसंकटही उभे राहिले आहे. ते प्राधान्याने सोडवायला हवे. चक्रीवादळाने जोरदार आघात केल्याने कोकणी जनता मदतीच्या प्रतीक्षेत आहे. त्यांना मदतीचा हात मिळायला हवा.

टॅग्स :Lokmatलोकमतcycloneचक्रीवादळ