शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

वाहनचालकांना हवा लगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:48 AM

आम्हा भारतीयांना स्वच्छतेचे जसे वावडे आहे तसेच वाहतूक नियमांचेही! त्यामुळे येथील रस्त्यांवर वाहतूक नियमांचे पालन करणाºयांपेक्षा ते तोडणारेच अधिक दिसतील. सिग्नल तोडून सुसाट वेगाने गाडी पळविणे हा तर आम्ही आमचा जन्मसिद्ध अधिकारच मानतो.

आम्हा भारतीयांना स्वच्छतेचे जसे वावडे आहे तसेच वाहतूक नियमांचेही! त्यामुळे येथील रस्त्यांवर वाहतूक नियमांचे पालन करणाºयांपेक्षा ते तोडणारेच अधिक दिसतील. सिग्नल तोडून सुसाट वेगाने गाडी पळविणे हा तर आम्ही आमचा जन्मसिद्ध अधिकारच मानतो. तसेच दुचाकीवर ट्रिपल सीट किंवा अगदी चारचार जणही बसून जाताना आम्हाला फार मोठा पराक्रम गाजवित असल्याचा अभिमान वाटतो. संपूर्ण देशात वाहतूक नियमांची अशी थट्टा होत असताना महाराष्ट्राची उपराजधानी समजले जाणारे नागपूर शहर तरी त्यापासून कसे अलिप्त राहणार? या शहरातील नागरिक वाहतुकीच्या नियमानुसार गाड्या चालविण्यात पुढाकार घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे. माहितीच्या अधिकारातून समोर आलेले हे वास्तव नागरिकांचा बेजबाबदारपणा, स्वत:च्या आणि इतरांच्या जीवाची त्यांना नसलेली पर्वा आणि ‘हम करे सो कायदा’ ही वृत्ती अधोरेखित करणारे आहे. यावर्षी आतापर्यंत हेल्मेट न घालणाºया ४० हजार नागरिकांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय मद्यपी वाहनचालकांना लगाम घालण्यासाठी पोलिसांनी ‘ड्रंकन ड्रायव्हिंग’विरुद्ध युद्धपातळीवर मोहीम सुरु केली आहे. त्याअंतर्गत १८ हजारावर वाहनचालकांना पकडण्यात आले. याशिवाय अतिवेगात गाडी चालविणारे, सिग्नल तोडणारे तसेच गाडी चालविताना मोबाईलवर बोलणारेही हजारो बहाद्दर पोलिसांच्या रडारवर आले. स्टंटबाजी करणाºयांचा एक मोठा वर्ग सध्या नागपुरात जन्मास आला आहे. अशा १८६६ स्टंटबाजांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. विदर्भातील अन्य भागातही वाहतूक नियमांबाबत यापेक्षा फारशी वेगळी स्थिती नाही. सर्वत्र वाहनचालकांची एकच तºहा आहे. खरे तर वाहतूक पोलीस शाखेतर्फे वाहतूक नियमांबाबत नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याच्या दृष्टीने वेळोवेळी विविध उपक्रम राबविले जात असतात. परंतु ‘पालथ्या घडावर पाणी’ अशी अवस्था आहे. नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे प्रशासनाचे ‘अपघातमुक्त’ शहराचे स्वप्न भविष्यात कधी पूर्णत्वास येईल अशी आशा नाही. नागपूरचा विचार केल्यास यंदा जानेवारी ते सप्टेंबर या काळात शहरात ९०० वर अपघात झाले. यातील १८ टक्के अपघात प्राणांतिक ठरले. अपघातात बळी जाणाºयांमध्ये तरुणाईचे प्रमाण अधिक आहे. एकंदरीतच वाहतूक नियमांबाबत कुणीही फारसे गंभीर नाही. काही दिवस हवा असते मग परिस्थिती जैसे थे होते. हेल्मेट सक्तीबाबत हा अनुभव सर्वांनी घेतला आहे. सातत्य असल्याशिवाय सार्वजनिक शिस्त लागत नाही. प्रत्येक व्यक्तीने वाहतूक नियमांचे पालन केले तरच अपघातांना आळा बसेल आणि लाखो जीव वाचतील.

टॅग्स :carकारhighwayमहामार्गnagpurनागपूर