शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

मुक्तबाजार व करारपद्धतीमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2020 1:51 AM

प्रश्न पाचवा

मुलाखत - डॉ. गिरधर पाटील, कृषी-अर्थशास्राचे अभ्यासक

शेतमालाच्या व्यापारात आता ज्या सुधारणा केल्या ते काही पहिल्यांदा घडलेले नाही. २००३ साली काँग्रेसने जो मॉडेल अ‍ॅक्ट आणला त्यातही शेतकºयाला बाजार समितीच्या बाहेर माल विकता येईल, करार शेती करता येईल या तरतुदी होत्या. पण, प्रत्यक्षात त्याचा काहीच फायदा झालेला दिसत नाही.मॉडेल अ‍ॅक्ट आणण्यामागे जागतिक व्यापार कराराचा एक रेटा होता. आपण जागतिक व्यापार संस्थेचे सभासद असल्याने भारतीय शेतमाल निदान कागदावर नियमन मुक्त व्हावा असा दबाव होता. त्या गरजेपोटी तो कायदा झाला.

भाजप सरकारने आता तीन कृषी विधेयके आणली. कारण, कोरोना पश्चात अर्थव्यवस्थेत उद्योग व गुंतवणुकीचे पर्याय हे औद्योगिक व सेवा या दोन्ही क्षेत्रात कमी होणार आहेत. त्याऐवजी अन्न व अन्नप्रक्रिया उद्योगांत गुंतवणुकीला अधिक संधी निर्माण होणार आहेत. अशा गुंतवणुकीसाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कायद्याचा अडथळा येतो. कारण या कायद्यामुळे ज्याच्याकडे परवाना नाही त्याला थेट शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करता येत नाही. त्यामुळे शेतमाल मुक्त करून कुणालाही तो खरेदी करण्याची परवानगी दिली.

शेतकरी मुक्तपणे कोठेही माल विकू शकतो असे सरकार म्हणते. पण, शेतकरी कोठेही जाऊन माल विकणार कसा? कोणाला विकणार? खरेदीदाराची ऐपत शेतकºयाला कशी समजणार? मालाची प्रत व भाव ठरविण्याची पद्धत काय असेल? शेतकºयाला दळणवळण खर्च परवडेल का? या सर्व बाबींचा विचार अगोदर सरकारने केला असता व तशा सुविधा निर्माण करून कायदा केला असता तर शेतकºयांचा फायदा झाला असता.महाराष्टÑ सरकारने यापूर्वी नियमन मुक्ती करत ४५ प्रकारच्या भाज्या व फळे बाजार समितीच्या बाहेर विकण्याची मुभा दिली. जेव्हा अंमलबजावणीची वेळ आली तेव्हा बाजार समित्यांनी विरोध करत बंद पाळला. त्यात शेतकºयांचेच नुकसान झाले. त्यानंतर राज्य सरकारने झुकते घेत नियमन मुक्ती बाजूला ठेवली. त्यामुळे केवळ मुक्तव्यापार कायदा करून फायदा नाही. अंमलबजावणी चांगली झाली तरच फायदा आहे.शेतमालाबाबत करार करण्याची मुभा असली तरी देशात अशा करार शेतीला आज वाव नाही. कारण, कंपन्या व शेतकºयांकडे तशा सुविधा नाहीत. बँकांचेही पाठबळ नाही. पोलीस कायद्याने संरक्षण नाही. काही तंटे झाल्यास कृषीसाठी स्वतंत्र न्यायालये नाहीत. नवीन कायद्यात हे तंटे प्रांताधिकाºयांनी मिटवावे, असे म्हटले आहे. जेथे न्याय मिळण्याची शक्यता कमी आहे. मध्यंतरी नाशिकमध्ये वायनरी कंपन्यांनी द्राक्ष उत्पादकांशी करार केले. मात्र बाजारात करारापेक्षा स्वस्त दरात द्राक्ष उपलब्ध असल्याचे पाहून या कंपन्यांनी शेतकºयांची द्राक्ष नाकारली. शेतकरी जेव्हा न्यायालयात गेले तेव्हा लक्षात आले की करार शेतीच्या अटीत शेतकºयांच्या बाजूने काहीच तरतुदी नाहीत. आजही तीच परिस्थिती आहे.

बाजार समित्यांमध्येही लिलावाची पद्धत पारदर्शक नाही. हमाल, मापाडीही अडवणूक करतात. काही बाजार समित्यांत दहशतही आहे. सरकार ही व्यवस्था तशीच ठेवून नवा कायदा राबवू पाहत आहे. नवीन मुक्त व्यापारातही पारदर्शकता कशी असणार? याबाबत अद्याप स्पष्टता नाही.नवीन विधेयकांमुळे शेतकºयांना मिळणाºया भावात फारसा फरक पडणार नाही. केवळ बाजार समितीच्या बाहेर माल विकल्यास बाजार समितीला द्यावा लागणारा कर वाचेल. व्यापारी जरी शेतावर आला तरी तो हाताळणी व वाहतूक खर्च धरूनच भाव काढेल.सरकारने लोकसभा, राज्यसभेत या विधेयकांवर चर्चाच होऊ न देता ती मंजूर करणे हे वैध नाही. नवीन शेतकरी विधेयकांतील तरतुदी शेतकºयाच्या हिताच्या वाटतात. पण त्याची अंमलबजावणी कशी होणार?(शब्दांकन : सुधीर लंके)मुलाखत - डॉ. गिरधर पाटील, कृषी-अर्थशास्राचे अभ्यासक

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या